शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांचा आनंद गगनात मावेना; लेक दिविजाला दहावीत 92.60% गुण...
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
4
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
5
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
6
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
7
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
8
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
9
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
10
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
11
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
12
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
13
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
14
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
15
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
16
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
17
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
18
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
19
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
20
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार

ऐन पावसाळ्यात उन्हापासून रोपे वाचवण्याची कसरत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:11 IST

पेठ : जुलै महिना मध्यावर आला असताना भात व नागलीची रोपे उगवणीला पावसाने दडी मारल्याने पेठ तालुक्यातील खरिपाची कामे ...

पेठ : जुलै महिना मध्यावर आला असताना भात व नागलीची रोपे उगवणीला पावसाने दडी मारल्याने पेठ तालुक्यातील खरिपाची कामे पूर्ण खोळंबली असून, उगलेली रोपे वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना चांगलीच कसरत करावी लागत आहे.

पेठ तालुक्यात भात व नागली ही प्रमुख पिके घेतली जातात. लावणी करण्यापूर्वी रोपांची उगवण केली जाते. तर पाऊस सुरू झाल्यावर भाताच्या खाचरात गाळ करून लावणीची तयारी केली जाते. यावर्षी जून महिन्यात काहीशा प्रमाणात पाऊस सुरू झाल्याने शेतकरी वर्गाने भात व नागलीची बियाणे पेरणी केली; मात्र जुलै महिना सुरू झाल्यापासून पावसाने दडी मारल्याने खरीप हंगाम धोक्यात आला आला आहे. मागील आठवड्यापासून तालुक्यात कडक ऊन पडल्याने उगवलेली रोपे पाण्याअभावी जळू लागली आहेत. त्यामुळे कडक उन्हापासून रोपे वाचवण्यासाठी रोपांना सावली करावी लागत आहे.

---------------------

खाचरे कोरडी पडली

भाताची लावणी करताना खाचरात ( कुंडीत) साधारण गुढघाभर पाणी साचावे लागते. त्यामध्ये नांगर किंवा ट्रॅक्टरद्वारे गाळ केला जातो. यावर्षी जुलै महिन्यात पावसाने उघडीप दिल्याने खाचरात पाणी साचले नाही. त्यामुळे ऐन खरीप हंगामात शेतीची कामे ठप्प झाली आहेत. पुढील काही दिवस पाऊस आला नाही तर शेतकऱ्यांवर आर्थिक संकट उभे राहणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

----------------------

पेठ तालुक्यात भात व नागलीची रोपे तयार झाली असून, पाऊस नसल्याने लावणी करता येत नाही, त्यामुळे रोपांची अधिक वाढ झाल्यास उत्पन्नावर त्याचा परिणाम होईल. त्यामुळे भात शेती संकटात येऊ लागली आहे.

-यशवंत गावंडे, शेतकरी गावंधपाडा ता. पेठ.

फोटो

07jul21peth01

-------------------------

पेठ तालुक्यात कडक उन्हामुळे भाताची रोपे वाचवण्यासाठी अशा प्रकारे कापडापासून सावली करावी लागत आहे. (०७ पेठ १)

070721\07nsk_6_07072021_13.jpg

०७ पेठ १