शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

पदे वाचविण्यासाठी कसरत : महासभेत केवळ चर्चा केल्याचा देखावा करवाढीवरून सत्ताधाऱ्यांची चुप्पी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 01:41 IST

नाशिक : मोकळ्या भूखंडांसह पिवळ्या पट्ट्यातील जमिनींसाठी लागू केलेल्या करवाढीला स्थगिती देण्याची घोषणा मागील महासभेत राणाभीमदेवी थाटात करणाºया सत्ताधारी भाजपाने आता आचारसंहिता भंगामुळे होणाºया कारवाईच्या भीतीपोटी सोयीस्कररीत्या चुप्पी साधली आहे.

ठळक मुद्देकरवाढीनुसार कार्यवाही करण्याचा मार्ग मोकळा पिवळ्या पट्ट्यातील जमिनींसाठीही करवाढ

नाशिक : मोकळ्या भूखंडांसह पिवळ्या पट्ट्यातील जमिनींसाठी लागू केलेल्या करवाढीला स्थगिती देण्याची घोषणा मागील महासभेत राणाभीमदेवी थाटात करणाºया सत्ताधारी भाजपाने आता आचारसंहिता भंगामुळे होणाºया कारवाईच्या भीतीपोटी सोयीस्कररीत्या चुप्पी साधली आहे. त्यामुळे, प्रशासनाला करवाढीनुसार कार्यवाही करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महासभेत केवळ चर्चा केल्याचा देखावा आता केला जात असून, या भूमिकेमुळे सत्ताधाºयांसह विरोधी पक्षातील नगरसेवकांमध्ये रोष व्यक्त होत आहे. महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी १ एप्रिल २०१८ पासून नव्याने विकसित होणाºया इमारतींसाठी करयोग्य मूल्य निश्चित करतानाच मोकळे भूखंड आणि पिवळ्या पट्ट्यातील जमिनींसाठीही करवाढ करण्याचा अध्यादेश जारी केला. या करवाढीला विरोध होऊ लागल्यावर मागील महासभेत त्यावर जोरदार चर्चा होऊन ८७ नगरसेवकांनी आपलाही विरोध नोंदविला होता. यावेळी, माजी विरोधी पक्षनेता सुधाकर बडगुजर यांनी प्रभाग क्रमांक १३च्या पोटनिवडणुकीच्या आचारसंहिता काळात आयुक्तांनी निर्णय घेतल्याने आचारसंहितेचा भंग झाल्याचे निदर्शनास आणून दिले होते. त्यामुळे सभागृहातील चर्चेला कलाटणी मिळून महापौर रंजना भानसी यांनी आयुक्तांनी घेतलेल्या करवाढीच्या निर्णयाला स्थगिती देण्याचा आणि आचारसंहिता भंगप्रकरणी निवडणूक आयोगाकडे प्रशासनाने तक्रार करावी, असे आदेश दिले होते.दरम्यान, महासभेचा ठराव जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकाºयाकडे पाठविण्याची तयारी सुरू झाली असतानाच जिल्हाधिकाºयांनी महासभेनेच आचारसंहितेचा भंग केला असल्याने महापौरांसह चर्चेत भाग घेणाºया ८७ नगरसेवकांवर कारवाई होऊ शकते, असे विधान केल्याने खळबळ उडाली होती. त्यामुळे महापौरांसह पदाधिकारी बॅकफूटवर येत त्यांनी स्थगितीचा निर्णय न होता केवळ चर्चा झाल्याची सारवासारव केली. त्यामुळे, नाशिककरांवर करवाढ लादली जाऊनही त्याविरोधात ठोस भूमिका स्पष्ट करण्याऐवजी आपली पदे वाचविण्यासाठी सत्ताधारी भाजपाने चालविलेली धडपड याबाबत नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे.