शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
4
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
5
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
6
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
7
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
8
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
9
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
10
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
11
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
12
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
13
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
14
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
15
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
16
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
17
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
18
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
19
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
20
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?

पदे वाचविण्यासाठी कसरत : महासभेत केवळ चर्चा केल्याचा देखावा करवाढीवरून सत्ताधाऱ्यांची चुप्पी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 01:41 IST

नाशिक : मोकळ्या भूखंडांसह पिवळ्या पट्ट्यातील जमिनींसाठी लागू केलेल्या करवाढीला स्थगिती देण्याची घोषणा मागील महासभेत राणाभीमदेवी थाटात करणाºया सत्ताधारी भाजपाने आता आचारसंहिता भंगामुळे होणाºया कारवाईच्या भीतीपोटी सोयीस्कररीत्या चुप्पी साधली आहे.

ठळक मुद्देकरवाढीनुसार कार्यवाही करण्याचा मार्ग मोकळा पिवळ्या पट्ट्यातील जमिनींसाठीही करवाढ

नाशिक : मोकळ्या भूखंडांसह पिवळ्या पट्ट्यातील जमिनींसाठी लागू केलेल्या करवाढीला स्थगिती देण्याची घोषणा मागील महासभेत राणाभीमदेवी थाटात करणाºया सत्ताधारी भाजपाने आता आचारसंहिता भंगामुळे होणाºया कारवाईच्या भीतीपोटी सोयीस्कररीत्या चुप्पी साधली आहे. त्यामुळे, प्रशासनाला करवाढीनुसार कार्यवाही करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महासभेत केवळ चर्चा केल्याचा देखावा आता केला जात असून, या भूमिकेमुळे सत्ताधाºयांसह विरोधी पक्षातील नगरसेवकांमध्ये रोष व्यक्त होत आहे. महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी १ एप्रिल २०१८ पासून नव्याने विकसित होणाºया इमारतींसाठी करयोग्य मूल्य निश्चित करतानाच मोकळे भूखंड आणि पिवळ्या पट्ट्यातील जमिनींसाठीही करवाढ करण्याचा अध्यादेश जारी केला. या करवाढीला विरोध होऊ लागल्यावर मागील महासभेत त्यावर जोरदार चर्चा होऊन ८७ नगरसेवकांनी आपलाही विरोध नोंदविला होता. यावेळी, माजी विरोधी पक्षनेता सुधाकर बडगुजर यांनी प्रभाग क्रमांक १३च्या पोटनिवडणुकीच्या आचारसंहिता काळात आयुक्तांनी निर्णय घेतल्याने आचारसंहितेचा भंग झाल्याचे निदर्शनास आणून दिले होते. त्यामुळे सभागृहातील चर्चेला कलाटणी मिळून महापौर रंजना भानसी यांनी आयुक्तांनी घेतलेल्या करवाढीच्या निर्णयाला स्थगिती देण्याचा आणि आचारसंहिता भंगप्रकरणी निवडणूक आयोगाकडे प्रशासनाने तक्रार करावी, असे आदेश दिले होते.दरम्यान, महासभेचा ठराव जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकाºयाकडे पाठविण्याची तयारी सुरू झाली असतानाच जिल्हाधिकाºयांनी महासभेनेच आचारसंहितेचा भंग केला असल्याने महापौरांसह चर्चेत भाग घेणाºया ८७ नगरसेवकांवर कारवाई होऊ शकते, असे विधान केल्याने खळबळ उडाली होती. त्यामुळे महापौरांसह पदाधिकारी बॅकफूटवर येत त्यांनी स्थगितीचा निर्णय न होता केवळ चर्चा झाल्याची सारवासारव केली. त्यामुळे, नाशिककरांवर करवाढ लादली जाऊनही त्याविरोधात ठोस भूमिका स्पष्ट करण्याऐवजी आपली पदे वाचविण्यासाठी सत्ताधारी भाजपाने चालविलेली धडपड याबाबत नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे.