शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

कार्यकारी अभियंत्याला डांबले; पाणीपुरवठा योजनेचा वाद उपाध्यक्षांची शिष्टाई : आंदोलनकर्त्यांचा केदा अहेर, राहुल अहेर यांच्यावर आरोप

By admin | Updated: February 5, 2015 22:41 IST

कार्यकारी अभियंत्याला डांबले; पाणीपुरवठा योजनेचा वाद उपाध्यक्षांची शिष्टाई : आंदोलनकर्त्यांचा केदा अहेर, राहुल अहेर यांच्यावर आरोप

  नाशिक : देवळा शहरासाठी राबविण्यात येणाऱ्या पाणीपुरवठा योजनेचे काम कृषी व पशुसंवर्धन सभापती केदा अहेर व आमदार डॉ. राहुल अहेर यांच्या सांगण्यावरून बंद केल्याच्या कारणावरून काल (दि.५) सायंकाळी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश नंदनवरे यांना देवळ्याच्या एका शिष्टमंडळाने त्यांच्या कार्यालयात डांबले. घटनेची माहिती मिळताच उपाध्यक्ष प्रकाश वडजे यांनी जिल्हा परिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीत प्रकाश नंदनवरे यांच्या कक्षात धाव घेऊन देवळ्याच्या शिष्टमंडळाची चर्चा करून हे आंदोलन थांबविले. देवळा येथील सुमारे साडेचार कोटींच्या खर्चाची पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू असून, ते काम निकृष्ट होत असल्याचे कारण देत जिल्हा परिषद सभापती केदा अहेर व आमदार डॉ. राहुल अहेर यांच्या सांगण्यावरून जिल्हा परिषदेचे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश नंदनवरे यांनी थांबविल्याचा आरोप करीत देवळ्याचे शिवसंग्राम संघटनेचे उदयकुमार अहेर यांच्यासह एका शिष्टमंडळाने काल गुरुवारी सायंकाळी जिल्हा परिषदेत धाव घेऊन प्रकाश नंदनवरे यांच्या कक्षात जाऊन नंदनवरे यांना या पाणीपुरवठा योजनेचे काम तत्काळ सुरू करावे अन्यथा आम्ही येथून हलणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यानंतर या घटनेची माहिती मिळताच उपाध्यक्ष प्रकाश वडजे यांनी प्रकाश नंदनवरे यांच्या कक्षात धाव घेऊन हे काम जिल्हा परिषद नव्हे, तर पाणीपुरवठा समिती करीत असून, त्यांनाच ते सुरू व बंद करण्याचा अधिकार आहे. तथापि, या प्रश्नावर ७ फेब्रुवारीला आमदार डॉ. राहुल अहेर यांच्या उपस्थितीत बैठक बोलविण्यात आली असून, त्यात ही योजना सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर शिष्टमंडळाने कार्यकारी अभियंता प्रकाश नंदनवरे यांची त्यांच्या कक्षातून सुटका केल्याचे समजते. (प्रतिनिधी) इन्फो.. रखडलेल्या योजनांची मागविली माहिती या आंदोलनाची माहिती मिळताच अध्यक्ष विजयश्री रत्नाकर चुंबळे यांनी प्रकाश नंदनवरे यांच्याशी चर्चा करीत या योजनेबाबत आवश्यक त्या सूचना पाणीपुरवठा समितीला देण्याबाबत आदेश दिले. तसेच जिल्'ातील किती योजना दोन, तीन व पाच वर्षांपासून रखडलेल्या आहेत, त्यांची तत्काळ माहिती देण्याचे आदेश चुंबळे यांनी दिले आहेत. याबाबत शासन दरबारी पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. फोटो कॅप्शन- ०५ पीएचएफबी-९८- आंदोेलनकर्त्यांशी चर्चा करताना जि. प. उपाध्यक्ष प्रकाश वडजे.