शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

जास्तीचे पाणीदेखील आरोग्याला अपायकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:16 IST

नाशिक : प्रत्येक सजीवाला पाणी अत्यावश्यकच असते. किंबहुना म्हणूनच पाण्याला जीवन असे म्हणतात. मात्र, तेच पाणी जर प्रचंड अतिरिक्त ...

नाशिक : प्रत्येक सजीवाला पाणी अत्यावश्यकच असते. किंबहुना म्हणूनच पाण्याला जीवन असे म्हणतात. मात्र, तेच पाणी जर प्रचंड अतिरिक्त प्रमाणात पिल्यास ते पाणी आरोग्याच्या दृष्टीने अपायकारक ठरते. त्यामुळे कुणी काही सल्ले दिले तरी शरीराच्या गरजेनुसार तहान लागल्यानंतर योग्य तेवढे पाणी पिणेच हितकारक ठरते.

सध्याच्या काळात व्हॉट्सअपवर आरोग्याच्या नावाखाली वाटेल तसे संदेश फिरत असतात. त्या संदेशांचे अनुकरण करणे किंवा त्यांना प्रमाण मानून त्याप्रमाणे आपल्या दिनक्रमात बदल करणे हे कधीकधी जीवावर बेतू शकते. कुठल्या व्हॉट्सअॅप मेसेजमध्ये ५-६ लिटर पाणी आवश्यक सांगितले म्हणून पावसाळा, हिवाळा, उन्हाळा असे सर्व ऋतुंमध्ये तितकेच पाणी पिणे हे शरीरावर अत्याचार करणारे ठरते. कमी पाणी प्यायल्याने नुकसान होते, हे जितके खरे तितकेच अधिक पाणी पिल्यानेही ते आरोग्यासाठी अपायकारक ठरते, असेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

प्रत्येक व्यक्ती कोणत्या परिस्थितीत, कुठल्या हवामानात, कोणत्या कामाच्या स्वरूपात कार्यरत असते, त्यावर त्याच्या अन्नाची तसेच पाण्याची गरज अवलंबून असते. एखादा कामगार उष्णतेच्या ठिकाणी किंवा प्रचंड शारीरिक कष्टाच्या जागी काम करीत असेल तर त्याच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे त्याला जास्त पाणी प्यावे लागते. तसेच हगवण, उलट्या, होत असल्यासदेखील जास्त पाणी द्यावे लागते. त्या तुलनेत एसीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला कमी प्रमाणात पाणी प्यावे लागते.

इन्फो

जास्त पाणी प्यायले तर...

जेव्हा एखादी व्यक्ती अल्प कालावधीत जास्त पाणी पिते तेव्हा मळमळ, उलट्या आणि डोकेदुखीसारख्या समस्या उद्भवू शकतात. गंभीर परिस्थितीत मेंदू फुगू शकतो, यामुळे गोंधळ, फिट येणे, कोमात जाणे अशा समस्या उद्भवू शकतात आणि अखेरीस मृत्यू देखील होऊ शकतो. काही प्रकरणांमध्ये रक्तातील मीठाची पातळी धोकादायक प्रमाणात कमी झाल्याचीही उदाहरणे असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

इन्फो

प्रत्येकाच्या शरीराची पाण्याची गरज भिन्न असते. मात्र, सर्वसाधारणपणे पुरुषांच्या शरीराला तीन तर महिलांच्या शरीराला अडीच लिटरपर्यंत पाण्याची गरज असते. मात्र, स्थळ-काळानुसार त्यात बदलदेखील शक्य आहे. मात्र, कुणी प्रचंड प्रमाणात नियमितपणे पाणी पित असेल तर अशा व्यक्तींच्या शरीरातील सोडियमचे प्रमाण कमी होण्याचादेखील धोका असतो.

चौकट

कुणी किती पाणी प्यावे?

० ते ६ महिने -केवळ मातेचे दूध पुरेसे

६ महिने ते १ वर्ष- २५० मिली.

१ ते ३ वर्ष - १ लिटर

४ ते ८ वर्ष- १.२ लिटर

९ ते १३ वर्ष - १.८ लिटर

१४ ते १८ वर्ष- २.५ लिटर

१८ वर्षावरील - ३ लिटर