शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

जास्तीचे पाणीदेखील आरोग्याला अपायकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:16 IST

नाशिक : प्रत्येक सजीवाला पाणी अत्यावश्यकच असते. किंबहुना म्हणूनच पाण्याला जीवन असे म्हणतात. मात्र, तेच पाणी जर प्रचंड अतिरिक्त ...

नाशिक : प्रत्येक सजीवाला पाणी अत्यावश्यकच असते. किंबहुना म्हणूनच पाण्याला जीवन असे म्हणतात. मात्र, तेच पाणी जर प्रचंड अतिरिक्त प्रमाणात पिल्यास ते पाणी आरोग्याच्या दृष्टीने अपायकारक ठरते. त्यामुळे कुणी काही सल्ले दिले तरी शरीराच्या गरजेनुसार तहान लागल्यानंतर योग्य तेवढे पाणी पिणेच हितकारक ठरते.

सध्याच्या काळात व्हॉट्सअपवर आरोग्याच्या नावाखाली वाटेल तसे संदेश फिरत असतात. त्या संदेशांचे अनुकरण करणे किंवा त्यांना प्रमाण मानून त्याप्रमाणे आपल्या दिनक्रमात बदल करणे हे कधीकधी जीवावर बेतू शकते. कुठल्या व्हॉट्सअॅप मेसेजमध्ये ५-६ लिटर पाणी आवश्यक सांगितले म्हणून पावसाळा, हिवाळा, उन्हाळा असे सर्व ऋतुंमध्ये तितकेच पाणी पिणे हे शरीरावर अत्याचार करणारे ठरते. कमी पाणी प्यायल्याने नुकसान होते, हे जितके खरे तितकेच अधिक पाणी पिल्यानेही ते आरोग्यासाठी अपायकारक ठरते, असेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

प्रत्येक व्यक्ती कोणत्या परिस्थितीत, कुठल्या हवामानात, कोणत्या कामाच्या स्वरूपात कार्यरत असते, त्यावर त्याच्या अन्नाची तसेच पाण्याची गरज अवलंबून असते. एखादा कामगार उष्णतेच्या ठिकाणी किंवा प्रचंड शारीरिक कष्टाच्या जागी काम करीत असेल तर त्याच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे त्याला जास्त पाणी प्यावे लागते. तसेच हगवण, उलट्या, होत असल्यासदेखील जास्त पाणी द्यावे लागते. त्या तुलनेत एसीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला कमी प्रमाणात पाणी प्यावे लागते.

इन्फो

जास्त पाणी प्यायले तर...

जेव्हा एखादी व्यक्ती अल्प कालावधीत जास्त पाणी पिते तेव्हा मळमळ, उलट्या आणि डोकेदुखीसारख्या समस्या उद्भवू शकतात. गंभीर परिस्थितीत मेंदू फुगू शकतो, यामुळे गोंधळ, फिट येणे, कोमात जाणे अशा समस्या उद्भवू शकतात आणि अखेरीस मृत्यू देखील होऊ शकतो. काही प्रकरणांमध्ये रक्तातील मीठाची पातळी धोकादायक प्रमाणात कमी झाल्याचीही उदाहरणे असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

इन्फो

प्रत्येकाच्या शरीराची पाण्याची गरज भिन्न असते. मात्र, सर्वसाधारणपणे पुरुषांच्या शरीराला तीन तर महिलांच्या शरीराला अडीच लिटरपर्यंत पाण्याची गरज असते. मात्र, स्थळ-काळानुसार त्यात बदलदेखील शक्य आहे. मात्र, कुणी प्रचंड प्रमाणात नियमितपणे पाणी पित असेल तर अशा व्यक्तींच्या शरीरातील सोडियमचे प्रमाण कमी होण्याचादेखील धोका असतो.

चौकट

कुणी किती पाणी प्यावे?

० ते ६ महिने -केवळ मातेचे दूध पुरेसे

६ महिने ते १ वर्ष- २५० मिली.

१ ते ३ वर्ष - १ लिटर

४ ते ८ वर्ष- १.२ लिटर

९ ते १३ वर्ष - १.८ लिटर

१४ ते १८ वर्ष- २.५ लिटर

१८ वर्षावरील - ३ लिटर