शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

बकालतेला मुदतवाढीचा कौल!

By admin | Updated: May 28, 2017 01:56 IST

मालेगावची टिकून असलेली ओळख म्हणजे बकालपणा. सत्तांतरे झाली तरी त्यात बदल घडून येऊ शकलेला नाही.

साराश

किरण अग्रवालमालेगावची टिकून असलेली ओळख म्हणजे तेथील बकालपणा. अनेक पातळ्यांवरची सत्तांतरे झाली तरी त्यात बदल घडून येऊ शकलेला नाही. अशात महापालिकेचा जीवही तसा चिमुकला. शिवाय, तेथे स्पष्ट बहुमत कुणालाच लाभत नसल्याने पक्षांऐवजी व्यक्तींचे राज्य चालते. त्यासाठी अनेक खटापटी, तडजोडी कराव्या लागतात. त्यामुळे व्यक्तिगत विकासापुढे शहर विकासाचा मुद्दा दुय्यम ठरणे क्रमप्राप्त ठरून जाते. यंदाही निवडणुकीत ‘त्रिशंकू’ कौल मिळाल्याने पुन्हा तेच व तसेच होणार. पर्यायाने, शहराच्या बकालतेला मुदतवाढ मिळण्याचीच चिन्हे!उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत एकाही मुस्लीम व्यक्तीस उमेदवारी न देता ‘योगीराज’ साकारणाऱ्या भाजपाला मालेगाव महापालिकेच्या निवडणुकीत मात्र ‘मुस्लीम कार्ड’ वापरूनही चमत्कार घडवता आला नाही हे खरे, परंतु अस्तित्व नक्कीच निर्मिता आले आहे. शिवाय ‘एमआयएम’नेही महापालिकेत चंचुप्रवेश केला आहे. या विशेष बाबी वगळता, मालेगावच्या निवडणुकीत यंदाही ‘त्रिशंकू’ कौल मिळाल्याने राजकीय घोडेबाजारालाच संधी मिळून जाणे क्रमप्राप्त ठरले आहे.मालेगाव महापालिकेच्या चौथ्या पंचवार्षिक निवडणुकीचा निकाल तेथील आजवरच्या परंपरेप्रमाणेच लागला असून, भाजपा व ‘एमआयएम’ हे नवीन खातेदार वाढल्याचाच काय तो फरक पडला आहे. यात भाजपाच्या बाबतीत बोलायचे तर, ‘तिहेरी तलाक’च्या मुद्द्यावर निर्माण झालेले वादळ पाहता ‘सबका साथ, सबका विकास’ची भूमिका प्रदर्शिण्यासाठी मालेगावात तब्बल २९ मुस्लिमांना व त्यातही १६ महिलांना संधी देऊन भाजपाने ‘मुस्लीम कार्ड’ चालविण्याचा प्रयत्न केला. परंतु ते सर्वच्या सर्व उमेदवार पराभूत झाल्याने सत्तेसाठी भूमिकांची मोडतोड करण्याच्या या पक्षाच्या प्रयत्नांना चपराक बसली आहे. भाजपाने ज्या मुस्लीमबहुल प्रभागात तिकिटे देण्यात समाधान शोधले, त्या मतदारांत कॉँग्रेस, राष्ट्रवादीचे प्राबल्य राहिले आहे. त्यात पक्षाखेरीज स्थानिक नेतृत्वाचाही मोठा वाटा आहे. परंतु केवळ ‘पक्षीय लेबल’वर भाजपा ‘करामत’ करायला निघाली होती, ती खेळी फसली. तथापि, हिंदूबहुल पट्ट्यात नऊ जागा जिंकून भाजपाला आपले अस्तित्व निर्माण करता आले, हीच त्यांच्यासाठी जमेची बाजू ठरावी. या जागा मिळवतानाही त्यांनी राज्यातील सत्तासोबती शिवसेनेला टक्कर वा मात देण्याचे यथासंभव प्रयत्न केलेत, परंतु मतदारांनी त्यांना मर्यादेतच राखले. राज्यमंत्री दादा भुसे यांनी प्रयत्नपूर्वक शिवसेनेच्या जागा गेल्या वेळेपेक्षा दोनने वाढवून १३ पर्यंत मजल मारली. पण स्वत:चे शालक व पक्षाच्या तालुकाप्रमुखांना ते निवडून आणू शकले नाहीत. ‘एमआयएम’ही यंदा तयारीने निवडणुकीत उतरला होता. ओवेसी यांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीने सभा गाजवल्या. मालेगावकरांनी त्यांचे खाते उघडून देत ७ जागा दिल्या, परंतु त्यांनाही चार हात लांब ठेवले. यातून स्पष्ट व्हावे ते एवढेच की, मालेगावातील विशेषत: मुस्लीमबहुल मतदारांवर काँग्रेस, राष्ट्रवादीचा व स्थानिक नेतृत्वाचाच पगडा प्रभावी आहे. त्यामुळेच माजी आमदार शेख रशीद यांच्या कुटुंबातील दोघे, युनूस ईसा यांच्या कुटुंबातील तिघे, निहाल अहमद यांचे पुत्र-पुत्री यांसह अनेक कुटुंबीय एकावेळी निवडून आलेले दिसले.महत्त्वाचे म्हणजे, पूर्व व पश्चिम अशा अनुक्रमे मुस्लीम व हिंदूबहुल मतदारांच्या पट्ट्यात मालेगावची विभागणी झालेली आहे. त्यात जोपर्यंत निहालभाई हयात होते तोपर्यंत जनता दल व कॉँग्रेसमध्ये मुस्लिमांतील वर्चस्ववादाची स्पर्धा होत असे. आता जनता दल क्षीण होऊन अगोदर तिसरा महाज व यंदाच्या निवडणुकीत या तिसरा महाजचेच विलीनीकरण झालेल्या राष्ट्रवादीसोबत कॉँग्रेसची स्पर्धा झाली. यातही पक्ष आपापल्या ठिकाणी राहिलेत, परंतु कॉँग्रेसचे माजी आमदार शेख रशीद व त्यांचे पुत्र विद्यमान आमदार आसिफ शेख असोत की राष्ट्रवादीचे माजी आमदार मौलाना मुफ्ती मो. इस्माईल; या नेत्यांचेच व्यक्तिगत करिश्मे अबाधित असल्याचे सांगणारा यंदाचा निकाल आहे. यात मालेगावातील दखनी, मोमीन या धार्मिकवादाची किनारही आहेच, त्यात भर पडली आहे ती ‘एमआयएम’ला लाभलेल्या माजी नगराध्यक्ष युनूस ईसा या स्थानिक नेतृत्वाची. म्हणजे आगामी आमदारकीच्या दृष्टीने स्पर्धा होणार आहे ती या तीन मुस्लीम नेतृत्वांत. म्हणूनच यंदाची महापालिका निवडणूक या तिघांकडून मोठ्या अटीतटीने लढविली गेली. राहिला विषय पश्चिम पट्ट्यातील नेतृत्वाचा, तर तेथे आजवरच्या शिवसेनेच्या एकसुरी प्राबल्याला यंदा भाजपाने चांगलाच शह दिला. भुसे यांना लगाम घालण्यात भाजपाचे शहराध्यक्ष सुनील गायकवाड हे आमदार अपूर्व हिरे व त्यांचे बंधू अद्वय यांच्या साथीने यशस्वी ठरले. भाजपाचे हे यश अल्पसंतुष्टीदायी जरी असले, तरी ‘हिरे बंधूं’च्या ‘कमबॅक’चा संकेत देणारेही म्हणायला हवेत.त्रिशंकू निकालाचे म्हणायचे तर तो मालेगावचा ‘ट्रेंड’ आहे. व्यक्तिगत व धार्मिक प्रभागातून तेथले राजकारण होत आल्याने महापालिकेत कुणालाही स्पष्ट बहुमत मिळवता येत नाही. यामुळेच राजकीय घोडेबाजार घडून येणे अपरिहार्य ठरून जाते. पक्ष कोणतेही असोत, सत्तेची बस पकडताना जो सहज उपलब्ध होतो, तो सोबत घेतला जातो. एकाच कुटुंबातील अनेकजण महापालिकेत जाण्यासाठी धडपड करतात, ते त्याचमुळे. राजकीय घराणेशाहीचे तेथे कुणाला वावगे वाटत नाही. स्वाभाविकच, जो जेवढे खर्चून ‘खुर्ची’ मिळवतो, तो अगोदर आपली गुंतवणूक व्याजासकट वसुलीचा प्रयत्न करतो. त्यात सामान्यांच्या विकासाचा किंवा शहराचे बकालपण दूर करण्याचा मुद्दा अडगळीत पडतो. कारण सत्तेची समीकरणे जुळवताना अनेकांना सोबत घ्यावे लागते. या सोबत आलेल्या प्रत्येकाचे आपापले वेगवेगळे अजेंडे असतात. ते पूर्ण करायचे तर महापालिकेत तेवढी सुबत्ता हवी. पण, तसेही नाही. मालेगाव महापालिका ‘ड’ वर्गात मोडणारी आहे. तिचे वार्षिक बजेट अवघे सुमारे चारेकशे कोटींचे. त्यात स्वत:चे उत्पन्न जेमतेम सव्वाशे ते दीडशे कोटींचे. आस्थापना खर्च भागवणेच मुश्कील व्हावे, अशी ही स्थिती. म्हणजे सारी भिस्त शासकीय मदतीवर. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना फारसा लाभ नाही की नोकरशाहीला स्वारस्य. याच स्थितीमुळे तेथे आयुक्त टिकायला तयार नसतो. एकाचा अपवाद वगळता बाकी सारेच आयुक्त मुदत पूर्ण न करताच परतले. अशा या स्थितीत महापालिकेचा गाडा ओढायचा व राजकारणही करायचे तर ते अवघडच आहे खरे. पण ते तेथील नेत्यांना अंगवळणी पडले आहे म्हणायचे. अशात निवडणूक निकालाने आणलेली ‘त्रिशंकू’ अवस्था घोडेबाजाराला चालना देऊन जाणारी ठरल्याशिवाय राहात नाही, हेच मालेगावकरांचे टाळता न येणारे दुर्दैव.