शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
6
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
7
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
8
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
9
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
10
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
11
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
12
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
13
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
14
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
15
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
16
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
17
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
18
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
19
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
20
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
Daily Top 2Weekly Top 5

बालकामगार निर्मूलनासाठी विविध आस्थापनांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 01:02 IST

लहान मुलांना शालेय शिक्षण मिळायला हवे. संस्कार घडविण्याच्या वयातच त्यांना बालमजुरीला जुंपण्याचा प्रकार आजही घडत असून, बालमजुरी प्रथेचे निर्मूलन करण्यासाठी कृती दलाने वर्षभरात जिल्ह्यात ६७ धाडी टाकून ८१३ विविध आस्थापनांची तपासणी करून तीन बालकामगारांची सुटका केली व मालकांवर गुन्हे दाखल केले आहेत.

सातपूर : लहान मुलांना शालेय शिक्षण मिळायला हवे. संस्कार घडविण्याच्या वयातच त्यांना बालमजुरीला जुंपण्याचा प्रकार आजही घडत असून, बालमजुरी प्रथेचे निर्मूलन करण्यासाठी कृती दलाने वर्षभरात जिल्ह्यात ६७ धाडी टाकून ८१३ विविध आस्थापनांची तपासणी करून तीन बालकामगारांची सुटका केली व मालकांवर गुन्हे दाखल केले आहेत.  भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लगेच १९४८ साली कामगार कायदे अस्तित्वात आले. या कायद्यात बालकांना कामावर ठेवू नये असाही कायदा आहे. तरीही सर्रास बालकांना बालमजूर म्हणून कामावर ठेवले जात असल्याचे लक्षात आल्यानंतर बालमजुरी प्रथेचे उच्चाटन करण्यासाठी भारत सरकारने १९८६ साली बालमजूर नियमन व निर्मूलन कायदा पारित केला. या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी १९९५ पासून संपूर्ण देशात राष्ट्रीय बालमजूर प्रकल्प राबविण्यास सुरुवात केली आहे, तर जागतिक श्रम संघटनेने (आयएलओ) देखील दखल घेत जागतिक स्तरावर हाच कायदा अंमलात आणला आहे. परंतु कायदे करूनही या बालमजुरी विरोधी कायद्याचे कटाक्षाने पालन होत नसून, कमी पैशात बालमजूर मुबलक उपलब्ध होत असल्याने त्यासाठी त्यांचा वापर करण्याकडे समाजाचा कल वाढला आहे.  राज्य सरकारने बालमजुरी प्रथेचे निर्मूलन करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली धडक कृती दलाची समिती गठित केली आहे. जिल्हाधिकाºयांच्या आदेशानुसार धाड पथकाची नियुक्ती केली जाते. या पथकामार्फत बालमजूर कामावर ठेवणाºया मालकावर पोलिसांत गुन्हे दाखल केले जातात.  बालकामगार निर्मूलन कायद्यानुसार संबंधित मालकाला ३ ते १२ महिन्यांचा तुरुंगवास आणि १० ते २० हजार रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे. दुसºया वर्षी पुन्हा हाच गुन्हा केला तर ही शिक्षा दुप्पट होऊ शकते.फटाके उद्योगात सर्वाधिक बालमजूरकामगार कायद्यात बालमजुरी प्रथेचे उच्चाटन कायद्याचा समावेश असतानाही देशात सर्रास लहान मुलांना बालमजूर म्हणून कामावर ठेवले जात होते. त्यात विशेषत: तामिळनाडूतील शिवाकाशी फटाके उद्योगात बालमजूर कामावर ठेवण्याचे प्रमाण प्रचंड होते. फटाके उद्योगाला वारंवार लागणाºया आगीत हे बालमजूर मृत्युमुखी पडत असत. सर्वोच्च न्यायालयाने प्रत्येक राज्य सरकारला बालमजुरीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी योग्य ती पाऊले उचलण्याचे स्पष्ट निर्देश दिलेत. त्यानुसार महाराष्ट्र सरकारने २५ एप्रिल २००६ रोजी पुन्हा कठोर कायदा पारित केला.

टॅग्स :MIDCएमआयडीसी