शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
4
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
5
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
6
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
7
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
8
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
9
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
10
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
11
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
12
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
13
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
14
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
15
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
17
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
18
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
19
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
20
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...

ईव्हीएम’मुळे लोकशाही धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2019 01:04 IST

नाशिक : लोकशाहीत जनतेच्या मतांचा सहभाग असतो, मात्र अलीकडच्या निवडणुका या जनतेचा मतांवर नव्हे तर ईव्हीएम मशीनवर जिंकल्या जात असल्यामुळे लोकशाही व्यवस्था धोक्यात येत असल्याचा आरोप बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी केला. निवडणुकीपूर्वीच किती जागा जिंकू शकतो, असे विधान भाजपकडून केले जात असल्याने त्यांना जनतेच्या मतांपेक्षा ईव्हीएमवर विश्वास असल्याचे सिद्ध होते, असा दावादेखील मेश्राम यांनी यावेळी केला.

ठळक मुद्देवामन मेश्राम : बामसेफच्या राष्टÑीय अधिवेशनात ईव्हीएमवर घणाघात

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : लोकशाहीत जनतेच्या मतांचा सहभाग असतो, मात्र अलीकडच्या निवडणुका या जनतेचा मतांवर नव्हे तर ईव्हीएम मशीनवर जिंकल्या जात असल्यामुळे लोकशाही व्यवस्था धोक्यात येत असल्याचा आरोप बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी केला. निवडणुकीपूर्वीच किती जागा जिंकू शकतो, असे विधान भाजपकडून केले जात असल्याने त्यांना जनतेच्या मतांपेक्षा ईव्हीएमवर विश्वास असल्याचे सिद्ध होते, असा दावादेखील मेश्राम यांनी यावेळी केला.‘बामसेफ’चे ३३वे महाराष्टÑ राज्य अधिवेशन सोमवारी (दि.१२) दादासाहेब गायकवाड सभागृहात पार पडले. यावेळी मेश्राम बोलत होते. अमरावती विभाग लेखा व कोषागार विभागाचे सहसंचालक उत्तम सोनकांबळे यांच्या हस्ते अधिवेशनाचे उद्घाटन झाले. व्यासपीठावर सेवानिवृत्त पोलीस अधीक्षक डॉ. संजय अपरांती, राष्टÑीय शीख मोर्चाचे हरविंदर सिंह खालसा, ज्येष्ठ आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते मारुती खैरे, अखिल भारतीय बंजारा क्रांती दलाच्या राष्ट्रीय अध्यक्ष नंदा मथुरे, आंबेजोगाई मेडिकल कॉलेजचे डॉ. राजेंद्र अंकुशे, अखिल भारतीय पाथरवट समाजाचे सरचिटणीस हेमंत भोईर, डॉ. सूचित बागडे, रविराज राठोड उपस्थित होते.यावेळी मेश्राम यांनी ईव्हीएमच्या गैरप्रकाराला प्रमुख विरोधीपक्ष असलेल्या कॉँग्रेसचादेखील छुपा पाठिंबा असल्याचा आरोप करताना ईव्हीएमचा लाभ हा भाजपा आणि कॉँग्रेसला होत असल्याचेही म्हटले. अधिवेशनाचे नियोजन नाशिकचे अ‍ॅड. सुजाता चौदांते, डॉक्टर विरोज दाणी, अक्षय अहिरे, एच. टी. फुले, सागर साळवे, भूषण पगारे, डॉ. प्रशिक धनसावंत, अविनाश पगार आदींनी केले होते. तीन सत्रांत विविध विषयांवर संवादपहिल्या सत्रात निवडणूक आयोग संविधानविरोधी कार्य करीत आहे का? २०२१ मध्ये होणाऱ्या जनगणनेत ओबीसी जनगणना व जातीनिहाय जनगणना याबाबत जनतेची मागणी व सरकारची जनविरोधी भूमिका यावर चर्चा झाली. दुपारच्या सत्रात मराठा आरक्षणाची चर्चा झाली़ सायंकाळच्या सत्रात बहुजन समाजातील उच्चशिक्षित विद्यार्थ्यांच्या आत्महत्या यावरही मंथन झाले़