शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
2
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
3
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
4
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
5
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
6
रक्षा बंधन २०२५: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
7
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
8
लालू यादवांच्या मुलाची बिहार निवडणुकीसाठी अजब खेळी, अभिनेत्री दिशा पटानीशी कनेक्शन काय?
9
२५% ने बधला नाही, ट्रम्प भारताच्या वर्मावर घाव घालण्याच्या तयारीत; 'या' सेक्टरवर २५०% टॅरिफची धमकी
10
अभिमानास्पद! वडिलांची मित्रांनी उडवली खिल्ली, आईने केला सपोर्ट; लेक गाजवते फुटबॉलचं मैदान
11
"महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका VVPAT मशिनवरच घ्यावात’’, काँग्रेसची मागणी
12
मतदार यादीतून वगळलेले ६५ लाख कोण? तीन दिवसांत सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश
13
महेश मांजरेकरांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' सिनेमाचं काय झालं? मुख्य अभिनेता म्हणाला...
14
मच्छर घुसला की काम तमाम...! घरासाठी लेझर गायडेड एअर डिफेन्स सिस्टीम आली; दिसताच आडवा करणार...
15
लाडक्या बहिणींच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्यांचं आता काही खरं नाही, पुढील १५ दिवसांत...
16
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?
17
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेले मुख्यालय पुन्हा बांधण्यासाठी जैशचा प्रमुख पुन्हा सक्रिय; मसूद अझहरने अनेकांकडे देणग्या मागितल्या
18
नवजात लेकीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलं पण 'त्याने' जीवदान दिलं, शरीराला लागलेले किडे
19
RBI च्या निर्णयानंतर गुंतवणूकदारांना झटका! विप्रोसह 'या' क्षेत्रात मोठी घसरण, कुठे झाली वाढ?
20
“जनभावनेचा आदर करणारे हे सरकार, आम्ही...”; ‘महादेवी’ परतण्याबाबत एकनाथ शिंदेचे मोठे विधान

ईव्हीएम’मुळे लोकशाही धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2019 01:04 IST

नाशिक : लोकशाहीत जनतेच्या मतांचा सहभाग असतो, मात्र अलीकडच्या निवडणुका या जनतेचा मतांवर नव्हे तर ईव्हीएम मशीनवर जिंकल्या जात असल्यामुळे लोकशाही व्यवस्था धोक्यात येत असल्याचा आरोप बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी केला. निवडणुकीपूर्वीच किती जागा जिंकू शकतो, असे विधान भाजपकडून केले जात असल्याने त्यांना जनतेच्या मतांपेक्षा ईव्हीएमवर विश्वास असल्याचे सिद्ध होते, असा दावादेखील मेश्राम यांनी यावेळी केला.

ठळक मुद्देवामन मेश्राम : बामसेफच्या राष्टÑीय अधिवेशनात ईव्हीएमवर घणाघात

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : लोकशाहीत जनतेच्या मतांचा सहभाग असतो, मात्र अलीकडच्या निवडणुका या जनतेचा मतांवर नव्हे तर ईव्हीएम मशीनवर जिंकल्या जात असल्यामुळे लोकशाही व्यवस्था धोक्यात येत असल्याचा आरोप बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी केला. निवडणुकीपूर्वीच किती जागा जिंकू शकतो, असे विधान भाजपकडून केले जात असल्याने त्यांना जनतेच्या मतांपेक्षा ईव्हीएमवर विश्वास असल्याचे सिद्ध होते, असा दावादेखील मेश्राम यांनी यावेळी केला.‘बामसेफ’चे ३३वे महाराष्टÑ राज्य अधिवेशन सोमवारी (दि.१२) दादासाहेब गायकवाड सभागृहात पार पडले. यावेळी मेश्राम बोलत होते. अमरावती विभाग लेखा व कोषागार विभागाचे सहसंचालक उत्तम सोनकांबळे यांच्या हस्ते अधिवेशनाचे उद्घाटन झाले. व्यासपीठावर सेवानिवृत्त पोलीस अधीक्षक डॉ. संजय अपरांती, राष्टÑीय शीख मोर्चाचे हरविंदर सिंह खालसा, ज्येष्ठ आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते मारुती खैरे, अखिल भारतीय बंजारा क्रांती दलाच्या राष्ट्रीय अध्यक्ष नंदा मथुरे, आंबेजोगाई मेडिकल कॉलेजचे डॉ. राजेंद्र अंकुशे, अखिल भारतीय पाथरवट समाजाचे सरचिटणीस हेमंत भोईर, डॉ. सूचित बागडे, रविराज राठोड उपस्थित होते.यावेळी मेश्राम यांनी ईव्हीएमच्या गैरप्रकाराला प्रमुख विरोधीपक्ष असलेल्या कॉँग्रेसचादेखील छुपा पाठिंबा असल्याचा आरोप करताना ईव्हीएमचा लाभ हा भाजपा आणि कॉँग्रेसला होत असल्याचेही म्हटले. अधिवेशनाचे नियोजन नाशिकचे अ‍ॅड. सुजाता चौदांते, डॉक्टर विरोज दाणी, अक्षय अहिरे, एच. टी. फुले, सागर साळवे, भूषण पगारे, डॉ. प्रशिक धनसावंत, अविनाश पगार आदींनी केले होते. तीन सत्रांत विविध विषयांवर संवादपहिल्या सत्रात निवडणूक आयोग संविधानविरोधी कार्य करीत आहे का? २०२१ मध्ये होणाऱ्या जनगणनेत ओबीसी जनगणना व जातीनिहाय जनगणना याबाबत जनतेची मागणी व सरकारची जनविरोधी भूमिका यावर चर्चा झाली. दुपारच्या सत्रात मराठा आरक्षणाची चर्चा झाली़ सायंकाळच्या सत्रात बहुजन समाजातील उच्चशिक्षित विद्यार्थ्यांच्या आत्महत्या यावरही मंथन झाले़