शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
6
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
7
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
8
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
9
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
10
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
11
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
12
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
13
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
14
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
15
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
16
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
17
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
18
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
19
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
20
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!

स्वातंत्र्यातून सुराज्य निर्माण करण्याची जबाबदारी सर्वांची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:17 IST

येवला : स्वातंत्र्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. परंतु स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे. या स्वातंत्र्यातून सुराज्य निर्माण करण्याची जबाबदारी ...

येवला : स्वातंत्र्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. परंतु स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे. या स्वातंत्र्यातून सुराज्य निर्माण करण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे, असे प्रतिपादन इतिहास अभ्यासक डॉ. अभिमन बिरारी यांनी केले.

येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला व वाणिज्य महाविद्यालयात क्रांतिदिनाचे औचित्य साधून आझादी का अमृत महोत्सव उपक्रमांतर्गत ‘भारताचे स्वातंत्र्य आंदोलन’ या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून बिरारी हे बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते अर्जुन कोकाटे यांनी केले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे हे होते.

यावेळी डॉ. बिरारी यांनी, समग्र भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाचा आढावा घेतला. नाशिक जिल्ह्यातील आंदोलनावरही प्रकाश टाकताना नाशिक, सिन्नर, येवला या शहरांतील आंदोलने लक्षणीय होती, असेही ते म्हणाले. स्वातंत्र्य आंदोलनातील अनेक ऐतिहासिक दाखले त्यांनी दिले. उद्घाटनपर मनोगतात कोकाटे यांनी, ‘स्वातंत्र्य मिळाले पण शहाणपण आले का’ असा प्रश्न उपस्थित करून जात, धर्म, पंथ, भाषाभेद, प्रांतवाद यापलीकडे जाऊन ‘प्रथम राष्ट्र’ व ‘आपण सर्व भारतीय आहोत’ ही भावना सर्वांमध्ये रुजली पाहिजे, असे सांगितले. प्राचार्य डॉ. गमे यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक संयोजक व विद्यार्थी विकास मंडळ प्रमुख डॉ. शरद चव्हाण यांनी केले. अतिथींचा परिचय प्रा. डी. के. कन्नोर यांनी करून दिला. सूत्रसंचालन डॉ. धनराज धनगर यांनी केले तर आभार राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. रघुनाथ वाकळे यांनी मानले.

दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या या कार्यक्रमास उपप्राचार्य शिवाजी गायकवाड, वरिष्ठ पर्यवेक्षक डॉ. अरूण वनारसे, कनिष्ठ पर्यवेक्षक प्रा. वैभव सोनवणे, कार्यालयीन अधीक्षक सुनील वाघ तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.