शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारीसाठी सर्वांनीच ठेवले देव पाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 00:44 IST

नाशिक : मराठा विद्या प्रसारक शिक्षणसंस्थेच्या निवडणुकीत विद्यमान संचालक श्रीराम शेटे यांचा उमेदवारी अर्ज अपात्र ठरल्याने सत्ताधाºयांनी ताकही फुंकून पिण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. त्यासाठी बुधवारी (दि.२) दिवसभर पंडित कॉलनीतील एका बॅँकेत प्रगती पॅनलच्या निवड मंडळातील सदस्यांच्या मॅरेथॉन बैठका झाल्याचे समजते. अपात्र ठरविण्यात आलेल्या सर्वच उमेदवारांनी न्यायालयात धाव घेतल्याचे वृत्त आहे.

नाशिक : मराठा विद्या प्रसारक शिक्षणसंस्थेच्या निवडणुकीत विद्यमान संचालक श्रीराम शेटे यांचा उमेदवारी अर्ज अपात्र ठरल्याने सत्ताधाºयांनी ताकही फुंकून पिण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. त्यासाठी बुधवारी (दि.२) दिवसभर पंडित कॉलनीतील एका बॅँकेत प्रगती पॅनलच्या निवड मंडळातील सदस्यांच्या मॅरेथॉन बैठका झाल्याचे समजते. अपात्र ठरविण्यात आलेल्या सर्वच उमेदवारांनी न्यायालयात धाव घेतल्याचे वृत्त आहे.दरम्यान, विरोधी समाज विकास पॅनलने तालुकानिहाय बैठकांचा जोर सुरूच ठेवत बुधवारी मालेगाव व बागलाण येथे सहविचार सभा घेत सत्ताधारी पॅनलच्या कार्यपद्धतीवर टीका केली.नांदगावमधून प्रगती पॅनलसाठी इच्छुक असलेल्या दहा जणांच्या गटाने सरचिटणीस नीलिमा पवार यांच्यासमोर विद्यमान संचालक दिलीप पाटील यांच्याऐवजी कोणा एकाला उमेदवारी देण्याचा प्रस्ताव ठेवल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे यापूर्वीच नीलिमा पवार यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना नांदगावमधून सभासदांची सर्वाधिक मागणी विद्यमान संचालक दिलीप पाटील यांना असल्याचे जाहीर केले होते. त्या पार्श्वभूमीवर या दहा जणांच्या गटाला महत्त्व प्राप्त झाले आहे. दुसरीकडे कळवणमधून इच्छुक असलेले विद्यमान संचालक रवींद्र देवरे यांनी उमेदवारी मिळाली तरच उमेदवारी करण्याचा निर्णय घेतला असून, उमेदवारी न मिळाल्यास शांत राहण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. बुधवारी पंडित कॉलनीतील एका बॅँकेत सत्ताधारी प्रगती पॅनलच्या निवड समितीतील सर्व सदस्यांची दिवसभर उमेदवारीबाबत खलबते चालली. यावेळी माजीमंत्री विनायक पाटील, सरचिटणीस नीलिमा पवार, रामचंद्र बापू पाटील, अ‍ॅड. शशिकांत पवार, श्रीराम शेटे आदींसह निवड मंडळाचे सदस्य उपस्थित होते.सभासद नाही : पाटीलदिंडोरी तालुक्यातून प्रगती पॅनलकडून इच्छुक असलेले कृउबा सभापती दत्तात्रय पाटील यांनी आपण मविप्र व्यतिरिक्त कोणत्याही संस्थेचा सभासद नसल्याचे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. आपल्या जन्मासाठी आई-वडिलांनी करंजी (दिंडोरी) येथे नवस केल्यानेच तेथे शिक्षणसंस्था उभारून आपण त्या संस्थेला मदत करीत आलो आहोत. आपण या संस्थेचे सभासद अथवा संस्थापक नाही, असे दइात्रय पाटील यांचे म्हणणे आहे.न्यायालयात धावलवादाने उमेदवारी अर्ज बाद ठरविलेले सर्वच उमेदवार मुंबई उच्च न्यायालयात गेल्याचे समजते. त्यात विद्यमान संचालक श्रीराम शेटे, नानासाहेब दाते, नंदा सोनवणे व गुलाबराव भामरे या सर्वच उमेदवारांनी लवादाच्या निर्णयाविरोधात न्यायालयात धाव घेतली. याबाबत गुरुवारी (दि.३) सुनावणी होणार असल्याचे कळते.