शहरं
Join us  
Trending Stories
1
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
2
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
3
आजचे राशीभविष्य, २३ सप्टेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मित्रांकडून लाभ होईल
4
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
5
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
6
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
7
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
8
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर
9
मराठा आरक्षणावर अन्य खंडपीठासमोर सुनावणी; सरकारचा हा निर्णय गोंधळात टाकणारा, याचिकेत आरोप
10
आयुष्याची जमापुंजी गुंतवली, घराचा ताबा घ्यायला गेले अन् दारातच जीव गेला; मुलुंड शहरातील घटना
11
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीला दिवाळीचा मुहूर्त? अधिक जागा लढवण्याचा मनसेचा आग्रह
12
पावसामुळे शेतकरी हवालदिल! ओला दुष्काळ जाहीर करून सरकारने तत्काळ मदतीचा हात पुढे करावा
13
...आपण इतके बधिर का झालो आहोत?; फरहानची ‘स्टेनगन’- ही दहशतवादी मस्ती ठेचून काढा!
14
लोकशाहीचा गळा घोटण्याचा नवा ‘कायदेशीर’ मार्ग; याला हुकूमशाही म्हणायला हवी
15
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
16
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
17
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
18
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
19
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
20
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”

दररोज एक कोटी लिटर पाणी गळती

By admin | Updated: February 3, 2016 23:10 IST

बारागाव नळपाणी योजना

प्रवीण साळुंके मालेगावतालुक्यातील बारागाव पाणी पुरवठा योजनेत समाविष्ट असलेल्या गावांना रोज २६ लाख लिटर पाण्याची आवश्यकता असतांना रोज एक कोटी ४१ लाख लिटर पाणी पुरविले जात असल्याची माहिती प्रांताधिकारी अजय मोरे यांनी दिली आहे. हे उर्वरित एक कोटी लिटर पाणी जाते कुठे ? हा प्रश्न निर्माण झाला आहे. तालुक्यातील दाभाडी, तळवाडे, आघार (खु), रावळगाव, पिंपळगाव, ढवळी विहीर, जळगाव (दा), आघार (बु), पांढरुण आदी गावांच्या पाणी पुरवठ्यासाठी बारागाव पाणी पुरवठा योजनेची निर्मिती करण्यात आली. यासाठी तालुक्यातील शेमळी नाला येथे पाणी साठवण्याची व्यवस्था करण्यात आली. सध्या या गावांना आठ ते दहा दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. या एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाणी पुरविले जात असतांनाही या गावांना रोज किमान एकदाही पाणी मिळु नये याचे सर्वांना आश्चर्य वाटते. एकंदरीत पुरविण्यात येणाऱ्या पाण्याची व रोजची पाण्याची मागणी यांच्या आकडेवारीची गोळाबेरीज पाहता या गावांना दिवसातून कमीत कमी चार वेळा पाणी पुरवठा करुनही लाखो लिटर पाणी शिल्लक राहाते. कारण या गावांना चारवेळच्या पाण्यासाठी फक्त एक कोटी चार लाख पाण्याची आवश्यकता आहे. असे असतांना या गावांना आठ दिवसाआडही पाणी मिळत नाही हे विशेष आहे. हे पाणी नेमके जाते कोठे ? हा संशोधनाचा विषय आहे. हे पाणी चोरी केली जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या पाणी कोठे व कोणाच्या आर्शिवादाने झिरपते ? ७असा प्रश्न निर्माण झाला आहे.