शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

अखेर वाहतूक ठेकेदार मिळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 00:44 IST

नाशिक : जिल्ह्णातील शासकीय गुदामांना अन्नधान्य महामंडळातून धान्य पुरविणाºया वाहतूक ठेकेदारांनी सुरगाणा धान्य घोटाळ्यानंतर अंग काढून घेतल्यानंतर खासगी वाहतूकदारांकरवी केल्या जाणाºया धान्य वाहतुकीसाठी अखेर पुरवठा खात्याला ठेकेदार मिळाला असून, चालू महिन्यापासून थेट रेशन दुकानदाराच्या दाराशी धान्य पोहोचविण्यास सुरुवात होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्ह्णातील शासकीय गुदामांना अन्नधान्य महामंडळातून धान्य पुरविणाºया वाहतूक ठेकेदारांनी सुरगाणा धान्य घोटाळ्यानंतर अंग काढून घेतल्यानंतर खासगी वाहतूकदारांकरवी केल्या जाणाºया धान्य वाहतुकीसाठी अखेर पुरवठा खात्याला ठेकेदार मिळाला असून, चालू महिन्यापासून थेट रेशन दुकानदाराच्या दाराशी धान्य पोहोचविण्यास सुरुवात होणार आहे.नाशिक जिल्ह्णात गेल्या पाच वर्षांपासून खासगी व्यक्तींकडून रेशनच्या धान्याची वाहतूक केली जात होती. त्यासाठी काही खासगी वाहने अधिग्रहित करण्यात आली, तर काही ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांची मदत घेण्यात आली. सुरगाणा येथील धान्य घोटाळ्यानंतर धान्य वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला होता. मनमाडच्या अन्नधान्य महामंडळातून निघणारे धान्य प्रत्यक्षात सुरगाणा शासकीय गुदामात न पोहोचता, धान्य वाहतूक ठेकेदाराच्या संगनमताने त्याची परस्पर काळ्याबाजारात विक्री केली जात असल्याची बाब उघडकीस आल्याने पोलिसांत ठेकेदाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर मात्र रेशनच्या धान्य वाहतुकीसाठी एकही ठेकेदार पुढे आला नाही. नाशिक जिल्ह्णात खासगी ठेकेदारामार्फत धान्य वाहतुकीसाठी दहा ते बारा वेळा निविदा मागविण्यात आल्या परंतु त्याला प्रतिसाद मिळू शकला नाही, त्यामागे धान्य वाहतुकीसाठी मिळणारा वाहतूक दर कमी असल्याचे कारण दिले जात होते. या संदर्भात शासनाच्या निदर्शनास ही बाब आणून दिल्यावर काही महिन्यांपूर्वीच शासनाने धान्य वाहतुकीचे दर वाढवून दिल्याने पुरवठा विभागाने निविदा मागविल्या होत्या.गेल्या आठवड्यात पुरवठा विभागाने धान्य वाहतूकदारांच्या निविदा उघडल्या असता नऊ ठेकेदारांनी त्यासाठी तयारी दर्शविली, त्यापैकी मनमाड येथील ‘पाटील अ‍ॅण्ड पाटील’या वाहतूक कंपनीने कमी दरात शासकीय धान्य वाहतुकीची अनुमती दर्शविल्याने त्यांना ठेका देण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार आता मनमाड येथील अन्नधान्य महामंडळातून शासकीय गुदाम तसेच शासकीय गुदामातून थेट रेशन दुकानदाराच्या दाराशी धान्य पोहोच केले जाणार आहे. दुकानदारांना दिलासारेशन दुकानदारांना यापूर्वी शासकीय धान्याची गुदामातून स्वखर्चाने रेशन दुकानापर्यंत वाहतूक करावी लागत होती व नंतर पुरवठा विभागाकडून त्यांना वाहतुकीचा खर्च अदा केला जात; मात्र ते पैसेही वेळेवर मिळत नसल्याची तक्रार करीत रेशन दुकानदारांनी गेल्या अनेक वर्षांपासून द्वारपोच धान्य मिळावे अशी मागणी लावून धरली होती. सध्या सुरू असलेल्या त्यांच्या बेमुदत संपासाठी हेदेखील एक कारण होते. त्यामुळे त्यांना दिलासा मिळणार आहे.