शहरं
Join us  
Trending Stories
1
“ऑपरेशन ब्ल्यू स्टार चुकीच्या पद्धतीने राबवले, इंदिरा गांधींना किंमत मोजावी लागली”: चिदंबरम
2
स्कूल बस चालकाने टेम्पोची काच फोडत धमकी दिली; पुणे पोलिसांनी काही तासातच त्याच ठिकाणी गुडघ्यावर चालवले
3
मृत्यूनंतरही डिजिटल मालमत्तेची चिंता नाही! डिजिलॉकरमध्ये नॉमिनी कसा जोडायचा? जाणून घ्या सोपी प्रक्रिया
4
आधी मिठाई खायली दिली अन् नंतर ३ मुलांचा चिरला गळा; बायको माहेरी जाताच नवरा झाला हैवान
5
थिएटर मध्ये जाऊन "मनाचे श्लोक" चित्रपट बंद पाडणे उज्वला गौड यांना भोवले; गुन्हा दाखल
6
“वेळ पडल्यास लढायची तयारी, आम्ही घाबरत नाही”; १०० टक्के ट्रम्प टॅरिफवर चीनचे चोख प्रत्युत्तर
7
कॅनरा बँकेच्या FD मध्ये २ लाख रुपये गुंतवा; ३ वर्षांत मिळवा ४५ हजार रुपयांचे निश्चित व्याज!
8
कमालच झाली राव! WhatsApp वर खाच फीचर; प्रोफाइलवर क्लिक करताच सुरू होणार Facebook
9
कबुतरांमुळे महायुतीचे सरकार पडेल, जैन मुनींच्या इशाऱ्यावर CM फडवीसांचे थेट भाष्य; म्हणाले...
10
जम्मू-कटरा एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात; काँग्रेस नेत्याच्या मुलासह ४ जणांचा मृत्यू
11
IND vs AUS Women’s World Cup 2025 Live Streaming : टीम इंडियासमोर तगडे आव्हान; इथं पाहा दोन्ही संघातील रेकॉर्ड
12
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींची दिवाळी गोड, शुभ-लाभ; सौभाग्य-संपन्नता, ३ राशींनी ‘हे’ टाळाच
13
₹५,००० वाचवा, लखपती व्हा! 'या' सरकारी योजनेत दरमहा गुंतवणूक करुन जमा होईल २७ लाखांचा निधी
14
अतूट नातं! मृत्यूशी झुंज देणाऱ्या नवऱ्याचा वाचवला जीव, बायकोने दिली किडनी, म्हणाली...
15
मृण्मयी देशपांडेची 'मनाचे श्लोक' चित्रपटाबद्दल मोठी घोषणा; पोस्ट शेअर करत म्हणाली-"अतिशय दु:खद..."
16
नोकरदारांनो, लक्ष द्या! आजपासून पहिली मेट्रो दीड तास उशिराने! मेट्रो २ अ, ७ मार्गिकेसाठी ७ दिवसांचे तात्पुरते वेळापत्रक
17
मोठी दुर्घटना! टेकऑफनंतर गोल गोल फिरलं, झाडावर आदळलं; हेलिकॉप्टर क्रॅशचा भयंकर Video
18
भारीच! "सणाच्या दिवशी काम नाही, फक्त आराम करा", 'या' कंपनीने दिवाळीला दिली ९ दिवस सुटी
19
गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पट्टेदार वाघ, ३ तास चालली रेस्क्यू मोहीम
20
घरात घुसून कुटुंबावर जीवघेणा हल्ला, तिघांविरोधात गुन्हा, पिस्तुलासह रॉडने हल्ला 

अखेर वाहतूक ठेकेदार मिळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 00:44 IST

नाशिक : जिल्ह्णातील शासकीय गुदामांना अन्नधान्य महामंडळातून धान्य पुरविणाºया वाहतूक ठेकेदारांनी सुरगाणा धान्य घोटाळ्यानंतर अंग काढून घेतल्यानंतर खासगी वाहतूकदारांकरवी केल्या जाणाºया धान्य वाहतुकीसाठी अखेर पुरवठा खात्याला ठेकेदार मिळाला असून, चालू महिन्यापासून थेट रेशन दुकानदाराच्या दाराशी धान्य पोहोचविण्यास सुरुवात होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्ह्णातील शासकीय गुदामांना अन्नधान्य महामंडळातून धान्य पुरविणाºया वाहतूक ठेकेदारांनी सुरगाणा धान्य घोटाळ्यानंतर अंग काढून घेतल्यानंतर खासगी वाहतूकदारांकरवी केल्या जाणाºया धान्य वाहतुकीसाठी अखेर पुरवठा खात्याला ठेकेदार मिळाला असून, चालू महिन्यापासून थेट रेशन दुकानदाराच्या दाराशी धान्य पोहोचविण्यास सुरुवात होणार आहे.नाशिक जिल्ह्णात गेल्या पाच वर्षांपासून खासगी व्यक्तींकडून रेशनच्या धान्याची वाहतूक केली जात होती. त्यासाठी काही खासगी वाहने अधिग्रहित करण्यात आली, तर काही ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांची मदत घेण्यात आली. सुरगाणा येथील धान्य घोटाळ्यानंतर धान्य वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला होता. मनमाडच्या अन्नधान्य महामंडळातून निघणारे धान्य प्रत्यक्षात सुरगाणा शासकीय गुदामात न पोहोचता, धान्य वाहतूक ठेकेदाराच्या संगनमताने त्याची परस्पर काळ्याबाजारात विक्री केली जात असल्याची बाब उघडकीस आल्याने पोलिसांत ठेकेदाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर मात्र रेशनच्या धान्य वाहतुकीसाठी एकही ठेकेदार पुढे आला नाही. नाशिक जिल्ह्णात खासगी ठेकेदारामार्फत धान्य वाहतुकीसाठी दहा ते बारा वेळा निविदा मागविण्यात आल्या परंतु त्याला प्रतिसाद मिळू शकला नाही, त्यामागे धान्य वाहतुकीसाठी मिळणारा वाहतूक दर कमी असल्याचे कारण दिले जात होते. या संदर्भात शासनाच्या निदर्शनास ही बाब आणून दिल्यावर काही महिन्यांपूर्वीच शासनाने धान्य वाहतुकीचे दर वाढवून दिल्याने पुरवठा विभागाने निविदा मागविल्या होत्या.गेल्या आठवड्यात पुरवठा विभागाने धान्य वाहतूकदारांच्या निविदा उघडल्या असता नऊ ठेकेदारांनी त्यासाठी तयारी दर्शविली, त्यापैकी मनमाड येथील ‘पाटील अ‍ॅण्ड पाटील’या वाहतूक कंपनीने कमी दरात शासकीय धान्य वाहतुकीची अनुमती दर्शविल्याने त्यांना ठेका देण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार आता मनमाड येथील अन्नधान्य महामंडळातून शासकीय गुदाम तसेच शासकीय गुदामातून थेट रेशन दुकानदाराच्या दाराशी धान्य पोहोच केले जाणार आहे. दुकानदारांना दिलासारेशन दुकानदारांना यापूर्वी शासकीय धान्याची गुदामातून स्वखर्चाने रेशन दुकानापर्यंत वाहतूक करावी लागत होती व नंतर पुरवठा विभागाकडून त्यांना वाहतुकीचा खर्च अदा केला जात; मात्र ते पैसेही वेळेवर मिळत नसल्याची तक्रार करीत रेशन दुकानदारांनी गेल्या अनेक वर्षांपासून द्वारपोच धान्य मिळावे अशी मागणी लावून धरली होती. सध्या सुरू असलेल्या त्यांच्या बेमुदत संपासाठी हेदेखील एक कारण होते. त्यामुळे त्यांना दिलासा मिळणार आहे.