शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

शाळा सोडल्याचा दाखला नसला, तरी दुसऱ्या शाळेत मिळणार प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:10 IST

नाशिक : कोरोना महामारीमुळे सर्वांनाच मोठी आर्थिक झळ सोसावी लागली आहे. लॉकडाऊनमुळे अनेकांचे रोजगार गेले, उद्योगधंदे ठप्प झाले. परिणामी, ...

नाशिक : कोरोना महामारीमुळे सर्वांनाच मोठी आर्थिक झळ सोसावी लागली आहे. लॉकडाऊनमुळे अनेकांचे रोजगार गेले, उद्योगधंदे ठप्प झाले. परिणामी, कुटुंब चालवणे, मुलांचे शिक्षण करणेदेखील कठीण झाले. या परिस्थितीत सरकारकडून मदत मिळावी, ही सर्वसामान्यांची अपेक्षा आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्याच्या शिक्षण विभागाने पालकवर्गास दिलासा देणारा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून आर्थिक कारणांमुळे शालेय शुल्क भरू न शकलेल्या विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला नसला, तरी अन्य शाळेत प्रवेश मिळणार आहे. दाखला किंवा स्थलांतर प्रमाणपत्र नसलेल्या विद्यार्थ्यांनाही शासकीय व अनुदानित शाळांनी प्रवेश द्यावा, अशा सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत.

प्रत्येक विद्यार्थ्याला शिकण्याचा तसेच एका शाळेतून दुसऱ्या शाळेत प्रवेश घेण्याचा अधिकार आहे. सध्याच्या असामान्य परिस्थितीत आर्थिक कारणांमुळे शालेय शुल्क भरू न शकलेल्या विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला अथवा स्थलांतर प्रमाणपत्र (टीसी / एलसी) काही शाळा नाकारत आहेत. त्यामुळे शाळा सोडल्याचा दाखला नसल्याने विद्यार्थ्यांना इतर शासकीय व अनुदानित शाळांत प्रवेश नाकारला जात असल्याचेही प्रकार समोर येत आहेत. अशा परिस्थितीत केवळ शाळा सोडल्याचा दाखला अथवा स्थलांतर प्रमाणपत्र नसल्याने विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारणे अन्यायकारक असल्याचे नमूद करताना अशाप्रकारचे कृत्य आरटीई कायद्याची पायमल्ली करणारे असल्याचा इशाराही शिक्षण विभागाने दिला आहे. असा प्रकार टाळण्यासाठी सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून ज्या विद्यार्थ्यांना त्यांचा शाळा सोडल्याचा दाखला अथवा स्थलांतर प्रमाणपत्र उशिरा मिळणार असेल किंवा नाकारले जात असेल, अशा विद्यार्थ्यांना तात्पुरता प्रवेश देऊन पुढील कार्यवाही करावी. शिक्षण अधिकार कायद्यांतर्गत आठवीपर्यंत अशी तरतूद असून कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या अभूतपूर्व परिस्थितीमुळे हा नियम आता नववी-दहावीच्या प्रवेशासाठीसुद्धा लागू करण्यात आला आहे.

इन्फो-

पालकांना दिलासा

कोरोना संकटामुळे रोजगार बंद झाल्याने अनेक पालक त्यांच्या पाल्यांचे शालेय शुल्क भरण्यास असमर्थ ठरले आहे. अशा विद्यार्थ्यांना खासगी शाळांनी ऑनलाइन शिक्षण बंद केले आहे. तसेच दुसऱ्या शाळेत प्रवेशासाठी स्थलांतर प्रमाणपत्र अथवा शाळा सोडल्याचा दाखला देण्यासही शाळांकडून नकार दिला जात आहे. अशा परिस्थितीत शासनाने शासकीय व अनुदानित शाळांना शाळा सोडल्याचा दाखला अथवा स्थलांतर प्रमाणपत्राशिवाय प्रवेश देण्याच्या सूचना केल्याने पालकांना दिलासा मिळाला आहे.