शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

शाळा सोडल्याचा दाखला नसला, तरी दुसऱ्या शाळेत मिळणार प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:10 IST

नाशिक : कोरोना महामारीमुळे सर्वांनाच मोठी आर्थिक झळ सोसावी लागली आहे. लॉकडाऊनमुळे अनेकांचे रोजगार गेले, उद्योगधंदे ठप्प झाले. परिणामी, ...

नाशिक : कोरोना महामारीमुळे सर्वांनाच मोठी आर्थिक झळ सोसावी लागली आहे. लॉकडाऊनमुळे अनेकांचे रोजगार गेले, उद्योगधंदे ठप्प झाले. परिणामी, कुटुंब चालवणे, मुलांचे शिक्षण करणेदेखील कठीण झाले. या परिस्थितीत सरकारकडून मदत मिळावी, ही सर्वसामान्यांची अपेक्षा आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्याच्या शिक्षण विभागाने पालकवर्गास दिलासा देणारा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून आर्थिक कारणांमुळे शालेय शुल्क भरू न शकलेल्या विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला नसला, तरी अन्य शाळेत प्रवेश मिळणार आहे. दाखला किंवा स्थलांतर प्रमाणपत्र नसलेल्या विद्यार्थ्यांनाही शासकीय व अनुदानित शाळांनी प्रवेश द्यावा, अशा सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत.

प्रत्येक विद्यार्थ्याला शिकण्याचा तसेच एका शाळेतून दुसऱ्या शाळेत प्रवेश घेण्याचा अधिकार आहे. सध्याच्या असामान्य परिस्थितीत आर्थिक कारणांमुळे शालेय शुल्क भरू न शकलेल्या विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला अथवा स्थलांतर प्रमाणपत्र (टीसी / एलसी) काही शाळा नाकारत आहेत. त्यामुळे शाळा सोडल्याचा दाखला नसल्याने विद्यार्थ्यांना इतर शासकीय व अनुदानित शाळांत प्रवेश नाकारला जात असल्याचेही प्रकार समोर येत आहेत. अशा परिस्थितीत केवळ शाळा सोडल्याचा दाखला अथवा स्थलांतर प्रमाणपत्र नसल्याने विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारणे अन्यायकारक असल्याचे नमूद करताना अशाप्रकारचे कृत्य आरटीई कायद्याची पायमल्ली करणारे असल्याचा इशाराही शिक्षण विभागाने दिला आहे. असा प्रकार टाळण्यासाठी सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून ज्या विद्यार्थ्यांना त्यांचा शाळा सोडल्याचा दाखला अथवा स्थलांतर प्रमाणपत्र उशिरा मिळणार असेल किंवा नाकारले जात असेल, अशा विद्यार्थ्यांना तात्पुरता प्रवेश देऊन पुढील कार्यवाही करावी. शिक्षण अधिकार कायद्यांतर्गत आठवीपर्यंत अशी तरतूद असून कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या अभूतपूर्व परिस्थितीमुळे हा नियम आता नववी-दहावीच्या प्रवेशासाठीसुद्धा लागू करण्यात आला आहे.

इन्फो-

पालकांना दिलासा

कोरोना संकटामुळे रोजगार बंद झाल्याने अनेक पालक त्यांच्या पाल्यांचे शालेय शुल्क भरण्यास असमर्थ ठरले आहे. अशा विद्यार्थ्यांना खासगी शाळांनी ऑनलाइन शिक्षण बंद केले आहे. तसेच दुसऱ्या शाळेत प्रवेशासाठी स्थलांतर प्रमाणपत्र अथवा शाळा सोडल्याचा दाखला देण्यासही शाळांकडून नकार दिला जात आहे. अशा परिस्थितीत शासनाने शासकीय व अनुदानित शाळांना शाळा सोडल्याचा दाखला अथवा स्थलांतर प्रमाणपत्राशिवाय प्रवेश देण्याच्या सूचना केल्याने पालकांना दिलासा मिळाला आहे.