शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
3
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
4
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
5
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
6
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
7
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
8
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
9
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
10
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
11
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
12
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
13
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
14
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
15
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
16
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
17
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
18
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
19
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
20
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान

शाळा सोडल्याचा दाखला नसला, तरी दुसऱ्या शाळेत मिळणार प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:10 IST

नाशिक : कोरोना महामारीमुळे सर्वांनाच मोठी आर्थिक झळ सोसावी लागली आहे. लॉकडाऊनमुळे अनेकांचे रोजगार गेले, उद्योगधंदे ठप्प झाले. परिणामी, ...

नाशिक : कोरोना महामारीमुळे सर्वांनाच मोठी आर्थिक झळ सोसावी लागली आहे. लॉकडाऊनमुळे अनेकांचे रोजगार गेले, उद्योगधंदे ठप्प झाले. परिणामी, कुटुंब चालवणे, मुलांचे शिक्षण करणेदेखील कठीण झाले. या परिस्थितीत सरकारकडून मदत मिळावी, ही सर्वसामान्यांची अपेक्षा आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्याच्या शिक्षण विभागाने पालकवर्गास दिलासा देणारा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून आर्थिक कारणांमुळे शालेय शुल्क भरू न शकलेल्या विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला नसला, तरी अन्य शाळेत प्रवेश मिळणार आहे. दाखला किंवा स्थलांतर प्रमाणपत्र नसलेल्या विद्यार्थ्यांनाही शासकीय व अनुदानित शाळांनी प्रवेश द्यावा, अशा सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत.

प्रत्येक विद्यार्थ्याला शिकण्याचा तसेच एका शाळेतून दुसऱ्या शाळेत प्रवेश घेण्याचा अधिकार आहे. सध्याच्या असामान्य परिस्थितीत आर्थिक कारणांमुळे शालेय शुल्क भरू न शकलेल्या विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला अथवा स्थलांतर प्रमाणपत्र (टीसी / एलसी) काही शाळा नाकारत आहेत. त्यामुळे शाळा सोडल्याचा दाखला नसल्याने विद्यार्थ्यांना इतर शासकीय व अनुदानित शाळांत प्रवेश नाकारला जात असल्याचेही प्रकार समोर येत आहेत. अशा परिस्थितीत केवळ शाळा सोडल्याचा दाखला अथवा स्थलांतर प्रमाणपत्र नसल्याने विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारणे अन्यायकारक असल्याचे नमूद करताना अशाप्रकारचे कृत्य आरटीई कायद्याची पायमल्ली करणारे असल्याचा इशाराही शिक्षण विभागाने दिला आहे. असा प्रकार टाळण्यासाठी सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून ज्या विद्यार्थ्यांना त्यांचा शाळा सोडल्याचा दाखला अथवा स्थलांतर प्रमाणपत्र उशिरा मिळणार असेल किंवा नाकारले जात असेल, अशा विद्यार्थ्यांना तात्पुरता प्रवेश देऊन पुढील कार्यवाही करावी. शिक्षण अधिकार कायद्यांतर्गत आठवीपर्यंत अशी तरतूद असून कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या अभूतपूर्व परिस्थितीमुळे हा नियम आता नववी-दहावीच्या प्रवेशासाठीसुद्धा लागू करण्यात आला आहे.

इन्फो-

पालकांना दिलासा

कोरोना संकटामुळे रोजगार बंद झाल्याने अनेक पालक त्यांच्या पाल्यांचे शालेय शुल्क भरण्यास असमर्थ ठरले आहे. अशा विद्यार्थ्यांना खासगी शाळांनी ऑनलाइन शिक्षण बंद केले आहे. तसेच दुसऱ्या शाळेत प्रवेशासाठी स्थलांतर प्रमाणपत्र अथवा शाळा सोडल्याचा दाखला देण्यासही शाळांकडून नकार दिला जात आहे. अशा परिस्थितीत शासनाने शासकीय व अनुदानित शाळांना शाळा सोडल्याचा दाखला अथवा स्थलांतर प्रमाणपत्राशिवाय प्रवेश देण्याच्या सूचना केल्याने पालकांना दिलासा मिळाला आहे.