शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

कोरोना निर्बंधाच्या काळातही वाजले सनई चौघडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:15 IST

नाशिक: कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्यांवर गदा आली असली तरी विवाह सोहळ्यांवर त्याचा फारसा परिणाम झाल्याचे दिसून आले नाही. ...

नाशिक: कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्यांवर गदा आली असली तरी विवाह सोहळ्यांवर त्याचा फारसा परिणाम झाल्याचे दिसून आले नाही. नाशिक जिल्ह्यात तर नोंदणी विवाह करणाऱ्यांचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले. ठरलेले विवाह नियोजित वेळेतच व्हावे, यासाठी वधू-वरांनी नेांदणी विवाहाचा पर्याय निवडल्याचे दिसून आले.

कोरोनाच्या निर्बंधामुळे जुळलेल्या विवाहांना अनेक अडचणी आल्या. एकतर लग्नाचा मुहूर्त जवळ आल्याने त्यांना मुहूर्तही चुकविणे शक्य नव्हते. याबरोबरच जास्त लोकही विवाहाला बोलविता येत नसल्याने अशावेळी नोंदणी पद्धतीचा विवाह हाच पर्याय समेार असल्याने या काळात नेांदणी पद्धतीने विवाह करणाऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. मार्च ते जुलै २०२१ या कालावधीत नोंदणी पद्धतीने विवाह करणाऱ्यांची संख्या ३०५ इतकी आहे.

नोंदणी विवाहासाठी अवघे १५० रुपये इतके शुल्क लागते. त्यानुसार मार्च ते जुलै या कालावधीत अवघ्या ४५, ७५० रुपयांमध्ये ३०५ विवाह उरकले आहेत. मार्चपासून असलेल्या कोरोनाच्या काळात ठरवून नोंदणी विवाह करण्याचे प्रमाण अधिक असल्याने या निमित्ताने नोंदणी विवाहविषयक जनजागृतीदेखील होण्यास मदत झाली आहे.

कोरोनाच्या या कालावधीत ठरवून नोंदणी विवाह करणाऱ्यांची जशी संख्या वाढलेली दिसते, त्या प्रमाणात लग्नाची नोंदणी करण्यासाठीदेखील दाम्पत्यांकडून प्राधान्य देण्यात आल्याचे आकडेवारीवरून दिसून आले आहे. गेल्या चार महिन्यात अशा प्रकारच्या ५१ जोडप्यांनी आपल्या लग्नाची नोंदणी केलेली आहे.

--इन्फो--

कधी किती झाले नोंदणी विवाह

२०१८--- ८१०

२०१९--- ७३७

२०२०--- ५६०

२०२१--

जानेवारी-- ५६

फेब्रुवारी--- ४९

मार्च ---९६

एप्रिल--- ४४

मे--- ५८

जून--- ६२

जुलै-- ४५

--इन्फो--

सहा महिन्यात ४३६ नोंदी

केारोनाच्या कालावधीत निर्बंध असल्याने नोंदणी विवाहाला प्राधान्य देण्यात आल्याचे दिसून आले. मार्च ते जुलै २०२१ या कालावधीत नोंदणीसाठी ४३६ इतके अर्ज आले होते. त्यापैकी ३०५ विवाहांची नोंदणी होऊ शकली. ज्यांचे वैदिक पद्धतीने विवाह झाले आहेत, असे जोडपेदेखील नोंदणी करतात. त्यांचे ५१ नोंदणी प्रमाणपत्रे देण्यात आली.

--कोट--

मागील वर्षीच विवाहाची तारीख ठरली होती; परंतु मार्च महिन्यात केारोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर असल्याने दोन्ही कुटुंबीयांनी नोंदणी पद्धतीने विवाह करण्याचा निर्णय सामंजस्याने घेतला. नियोजित तारखेलाच विवाह व्हावा, अशी सर्वांची इच्छा होती. त्यानुसार सर्वकाही जुळून आले. नाेंदणी पद्धतीने आम्ही विवाहबद्ध झालो.

- ज्ञानेश शहाणे, तरुण.

काेरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच लग्न जुळून आले. नोकरी बाहेरगावी असल्याने लग्नाला काही अडचणी येतील का, अशी शंका होती. सुदैवाने नोकरी टिकली, त्यामुळे कोणतीही अडचण आली नाही; परंतु नोकरीवर जाणे अपेक्षित असल्याने लग्न पुढे न ढकलता नोंदणी पद्धतीने विवाह करण्यात आला. कुटुंबीयांच्या संमतीने विवाह नोंदणी पद्धतीने झाला.

-- विनोद कडसाने, तरुण.