शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
4
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
5
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
6
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना कोरा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
7
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
8
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
9
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
10
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
11
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
12
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
13
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
14
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
15
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
16
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
17
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
18
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
19
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
20
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी

अ‍ॅट्रॉसिटी प्रतिबंध समित्या स्थापणार

By admin | Updated: September 23, 2016 00:39 IST

भाऊसाहेब अहिरे : चिराई येथे विचारमंथन बैठक संपन्न

नामपूर : येत्या २४ तारखेला मराठा क्रांती मोर्चा होणार असून, यानंतर शासनाने काहीच निर्णय न घेतल्यास प्रत्येक गावात व तालुक्यात बोगस अ‍ॅट्रॉसिटी रोखण्यासाठी अ‍ॅट्रॉसिटी प्रतिबंध समित्या स्थापणार असल्याचे प्रतिपादन खालचे टेंभेचे सरपंच भाऊसाहेब अहिरे यांनी चिराई येथे आयोजित विचारमंथन बैठकीत केले.बागलाण तालुक्यात आता मराठा क्रांती मूक मोर्चाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, मोर्चा झाल्यावर पुढे काय याबाबत तालुक्यातील नेत्यांची एक विचारमंथन बैठक संपन झाली. याप्रसंगी ज्येष्ठ नेते रामचंद्रबापू पाटील, अरविंद सोनवणे, पांडुरंग सोनवणे, खेमराज कोर, अशोक सावंत, काकाजी रौंदळ, किशोर कदम, यतिन पगार, दीपक पगार, शैलेश सूर्यवंशी, प्रकाश निकम, प्रशांत सोनवणे, सुनील ठाकरे, भास्कर भामरे, मधुकर देवरे, डॉ. शेषराव पाटील, नानाजी दळवी, शकुंतला पाटील, गंगाधर अहिरे यांसह समाजातील सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. आता मराठ्यांना शांत बसून चालणार नाही. काळ वैऱ्याचा आहे. उद्या मराठा समाजाचे मोर्चे संपल्यावर खोट्या अ‍ॅट्रॉसिटी दाखल होतील. यासाठी आपल्या सर्वांना एकत्र येऊन तालुका स्तरावर एक समिती स्थापन करावी लागणार असल्याचे रामचंद्रबापू पाटील यांनी नमूद केले. या समितीत समाजातील वकील, डॉक्टर, पत्रकार, सेवानिवृत्त पोलीस, अभियंता, शिक्षक, प्राध्यापक, शेतकरी, शेतमजूर, महिला, पुरुष, सरपंच, सेवानिवृत्त पोलीसपाटील तसेच प्रत्येक गावातील एका नागरिकास या समितीत सदस्य म्हणून घेतले जाणार आहे. पुढील आठवड्यात ही समिती निर्माण केली जाणार असल्याची घोषणा पाटील यांनी केली. ज. ल. पाटील यांनी आभार मानले. (वार्ताहर)