शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
2
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
3
युद्धबंदीनंतर पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
4
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
5
'युद्धबंदीचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
6
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
7
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
8
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
9
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
10
पाकिस्तानकडून युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
11
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
12
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धबंदीनंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
13
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
14
"काश्मीर समस्याही...!"; भारत-पाकिस्तान युद्धबंदीनंतर ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
15
'आम्हाला तिसऱ्या पक्षाची...', ट्रम्प यांनी काश्मीर मुद्दा उपस्थित केल्यावर प्रियंका चतुर्वेदींनी दिले उत्तर
16
पाकिस्तानचे अपयश उघड! बिकानेरमध्ये ब्रह्मोस क्षेपणास्त्र बूस्टर, नोज कॅप सापडले
17
तुमच्या मुलीच्या लग्नासाठी लाखो रुपये जमवायचेत? गुंतवणुकीसाठी 'हे' आहेत ३ बेस्ट पर्याय
18
बोरीवलीच्या नँसी व सुकरवाडी एसटी डेपोसाठी ३ महिन्यांत निविदा काढणार; परिवहन मंत्री सरनाईकांची घोषणा
19
चौकारांच्या हॅटट्रिकसह स्मृती मानधनाने साजरी केली विक्रमी सेंच्युरी!
20
Ceasefire Violation: 'PM मोदींना हे माहिती होतं, त्यामुळे त्यांनी शस्त्रसंधीचं...'; एकनाथ शिंदे पाकिस्तानवर भडकले

पर्यावरण प्रकल्प पु्स्तिकाच नाही, गुणदान होणार कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:11 IST

नाशिक : बारावीसाठी ‘पर्यावरण शिक्षण’ व ‘जलसुरक्षा’ विषय बंधनकारक करण्यात आला असून, या विषयाची गुण विभागणी श्रेणी पद्धतीने करण्यात ...

नाशिक : बारावीसाठी ‘पर्यावरण शिक्षण’ व ‘जलसुरक्षा’ विषय बंधनकारक करण्यात आला असून, या विषयाची गुण विभागणी श्रेणी पद्धतीने करण्यात येते. विद्यार्थ्यांना पर्यावरणासह पाणी व्यवस्थापनाचे ज्ञान मिळण्यासाठी अकरावी, बारावीला हे विषय बंधनकारक करण्यात आले असून, ५० गुणांसाठी असलेल्या या विषयात प्रकल्प कार्यासाठी ३०, तर जर्नल-सेमिनार कार्यासाठी २० अशी गुणांची विभागणी आहे. परंतु, यावर्षी पर्यावरण प्रकल्पासाठी व जर्नलसाठी आवश्यक प्रकल्प पुस्तिका अद्यापही बालभारतीने उपलब्ध करून दिलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रकल्प पूर्ण होऊ शकलेले नसल्याने या विषयाचे गुणदान कसे होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

बालभारतीकडून अजूनही पर्यावरण प्रकल्पासाठी आवश्यक असणाऱ्या वही छपाईचे काम सुरू असल्याचे बालभारतीतील सूत्रांनी सांगितले. विशेष म्हणजे केवळ नाशिक जिल्ह्यातून सुमारे ७५ हजार ३४३ विद्यार्थ्यांनी बारावी परीक्षेसाठी अर्ज केलेले असताना बालभारतीकडून नाशिक विभागासाठी प्राथमिक टप्प्यात केवळ ५० हजार प्रकल्प पुस्तिकांची मागणी केलेली आहे. ही मागणीही अद्याप पूर्ण होऊ शकलेली नाही. त्यामुळे विभागातील दुकानांमध्येही ही प्रकल्प पुस्तिका उपलब्ध नाही. परिणामी विद्यार्थ्यांची मोठी अडचण निर्माण झाली असून ही प्रकल्प पुस्तिका केव्हा मिळणार आणि प्रकल्पाचे काम पूर्ण करून तो सादर केव्हा करायचा, असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर निर्माण झाला आहे. तर प्रकल्प पुस्तिकाच नसल्याने बारावीची गुणदान प्रक्रियाही रखडली आहे. त्यामुळे आधीच लांबलेला बारावीचा निकाल आणखी रखडणार असून निकाल जाहीर होऊन पुढील प्रवेश प्रक्रिया केव्हा सुरू होणार, असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर निर्माण झाला आहे.

कोट-

बालभारतीकडून अद्याप बारावीची पर्यावरण पुस्तिकाच उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. अशा परिस्थितीत विद्यार्थी आणि पालक मात्र पुस्तिकेसाठी दुकानदारांकडून तगादा लावत आहेत. त्यांना काय उत्तर द्यावे असा प्रश्न दुकानदारांसमोर निर्माण झाला आहे. दुसरीकडे बालभारतीकडून होत असलेल्या उशिराचे कोणतेही ठोस कारण सांगितले जात नाही. तसेच केव्हापर्यंत पुस्तिका उपलब्ध होणार हेही सांगितले जात नाही.

- अतुल पवार, अध्यक्ष, बुक सेलर्स असोसिएशन, नाशिक

कोट-

नाशिकसाठी प्राथमिक टप्प्यात ५० हजार पुस्तिकांची मागणी केलेली आहे. परंतु बालभारतीकडून अजूनही पुस्तिकांची छपाई सुरू असल्याने उशीर होत आहे. या पुस्तिका लवकरच विभागीय भांडारास प्राप्त होणार असून पुस्तिका प्राप्त होताच तत्काळ वितरण सुरू केले जाणार आहे.

- व्ही. एन. पिसे, बालभारती भांडार व्यवस्थापक, नाशिक

कोट-

पर्यावरण प्रकल्प पुस्तिका उपलब्ध होऊ शकत नाही, अशा विद्यार्थ्यांनी त्याच प्रकारच्या अन्य पुस्तिकांमध्ये प्रकल्प अहवाल तयार करून तो तपासून घेण्यास हरकत नाही. सद्यस्थितीत प्रकल्प पुस्तिकांची प्रतीक्षा करण्यास वेळ उपलब्ध नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी दुकानांमध्ये प्रकल्प पुस्तिका उपलब्ध होण्याची प्रतीक्षा न करता उपलब्ध साहित्याचा वापर करून प्रकल्प अहवाल सादर करून ते तपासून घ्यावेत.

- के. आर. गिते, उपप्राचार्य, केव्हीएन नाईक महाविद्यालय, नाशिक