शहरं
Join us  
Trending Stories
1
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
2
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
3
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
4
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
5
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
6
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
7
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
8
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
9
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
10
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
11
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
12
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
13
महामुंबईसाठी पद्मश्री पुरस्कार विजेत्यांचा जाहीरनामा
14
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
15
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
16
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
17
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
18
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
19
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
20
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा

पर्यावरण प्रकल्प पु्स्तिकाच नाही, गुणदान होणार कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:11 IST

नाशिक : बारावीसाठी ‘पर्यावरण शिक्षण’ व ‘जलसुरक्षा’ विषय बंधनकारक करण्यात आला असून, या विषयाची गुण विभागणी श्रेणी पद्धतीने करण्यात ...

नाशिक : बारावीसाठी ‘पर्यावरण शिक्षण’ व ‘जलसुरक्षा’ विषय बंधनकारक करण्यात आला असून, या विषयाची गुण विभागणी श्रेणी पद्धतीने करण्यात येते. विद्यार्थ्यांना पर्यावरणासह पाणी व्यवस्थापनाचे ज्ञान मिळण्यासाठी अकरावी, बारावीला हे विषय बंधनकारक करण्यात आले असून, ५० गुणांसाठी असलेल्या या विषयात प्रकल्प कार्यासाठी ३०, तर जर्नल-सेमिनार कार्यासाठी २० अशी गुणांची विभागणी आहे. परंतु, यावर्षी पर्यावरण प्रकल्पासाठी व जर्नलसाठी आवश्यक प्रकल्प पुस्तिका अद्यापही बालभारतीने उपलब्ध करून दिलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रकल्प पूर्ण होऊ शकलेले नसल्याने या विषयाचे गुणदान कसे होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

बालभारतीकडून अजूनही पर्यावरण प्रकल्पासाठी आवश्यक असणाऱ्या वही छपाईचे काम सुरू असल्याचे बालभारतीतील सूत्रांनी सांगितले. विशेष म्हणजे केवळ नाशिक जिल्ह्यातून सुमारे ७५ हजार ३४३ विद्यार्थ्यांनी बारावी परीक्षेसाठी अर्ज केलेले असताना बालभारतीकडून नाशिक विभागासाठी प्राथमिक टप्प्यात केवळ ५० हजार प्रकल्प पुस्तिकांची मागणी केलेली आहे. ही मागणीही अद्याप पूर्ण होऊ शकलेली नाही. त्यामुळे विभागातील दुकानांमध्येही ही प्रकल्प पुस्तिका उपलब्ध नाही. परिणामी विद्यार्थ्यांची मोठी अडचण निर्माण झाली असून ही प्रकल्प पुस्तिका केव्हा मिळणार आणि प्रकल्पाचे काम पूर्ण करून तो सादर केव्हा करायचा, असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर निर्माण झाला आहे. तर प्रकल्प पुस्तिकाच नसल्याने बारावीची गुणदान प्रक्रियाही रखडली आहे. त्यामुळे आधीच लांबलेला बारावीचा निकाल आणखी रखडणार असून निकाल जाहीर होऊन पुढील प्रवेश प्रक्रिया केव्हा सुरू होणार, असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर निर्माण झाला आहे.

कोट-

बालभारतीकडून अद्याप बारावीची पर्यावरण पुस्तिकाच उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. अशा परिस्थितीत विद्यार्थी आणि पालक मात्र पुस्तिकेसाठी दुकानदारांकडून तगादा लावत आहेत. त्यांना काय उत्तर द्यावे असा प्रश्न दुकानदारांसमोर निर्माण झाला आहे. दुसरीकडे बालभारतीकडून होत असलेल्या उशिराचे कोणतेही ठोस कारण सांगितले जात नाही. तसेच केव्हापर्यंत पुस्तिका उपलब्ध होणार हेही सांगितले जात नाही.

- अतुल पवार, अध्यक्ष, बुक सेलर्स असोसिएशन, नाशिक

कोट-

नाशिकसाठी प्राथमिक टप्प्यात ५० हजार पुस्तिकांची मागणी केलेली आहे. परंतु बालभारतीकडून अजूनही पुस्तिकांची छपाई सुरू असल्याने उशीर होत आहे. या पुस्तिका लवकरच विभागीय भांडारास प्राप्त होणार असून पुस्तिका प्राप्त होताच तत्काळ वितरण सुरू केले जाणार आहे.

- व्ही. एन. पिसे, बालभारती भांडार व्यवस्थापक, नाशिक

कोट-

पर्यावरण प्रकल्प पुस्तिका उपलब्ध होऊ शकत नाही, अशा विद्यार्थ्यांनी त्याच प्रकारच्या अन्य पुस्तिकांमध्ये प्रकल्प अहवाल तयार करून तो तपासून घेण्यास हरकत नाही. सद्यस्थितीत प्रकल्प पुस्तिकांची प्रतीक्षा करण्यास वेळ उपलब्ध नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी दुकानांमध्ये प्रकल्प पुस्तिका उपलब्ध होण्याची प्रतीक्षा न करता उपलब्ध साहित्याचा वापर करून प्रकल्प अहवाल सादर करून ते तपासून घ्यावेत.

- के. आर. गिते, उपप्राचार्य, केव्हीएन नाईक महाविद्यालय, नाशिक