शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

‘स्मार्ट सिटी’साठी उद्योजकांचे सहकार्य आवश्यक

By admin | Updated: October 25, 2015 22:47 IST

दीपेंद्रसिंह कुशवाह : निमामध्ये चर्चासत्र संपन्न

सातपूर : देशातील दहा शहरांचा सर्व बाजूंनी नाशिक शहराच्या तुलनेने सर्वेक्षण करून जिल्हा प्रशासनाला निमा किंवा अन्य संस्थांनी अहवाल सादर केल्यास त्याचा फायदा स्मार्ट सिटी करण्यात येईल, असे आवाहन जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी केले.निमा येथे आयोजित ‘नाशिक : गुंतवणुकीचे पुढील केंद्र’ या विषयावर चर्चासत्राप्रसंगी ते बोलत होते. नाशिक औद्योगिकदृष्ट्या परिपूर्ण शहर आहे. जमीन, पाणी, कुशल मनुष्यबळ, रस्ते, रेल्वे, मूलभूत सेवासुविधा यांसारख्या दळणवळणाच्या सुविधा उपलब्ध आहेत. जिल्हा प्रशासनाच्या वतीने ७ ते १५ दिवसांच्या आत सर्व प्रकारच्या परवानग्या देण्याचा प्रयत्न केला जात आहे. उद्योग क्षेत्रासाठी औद्योगिक संस्थांनी ३०० ते ५०० एकर जमीन सुचविल्यास त्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने ती जमीन हस्तांतर करण्यासाठी राज्य सरकारकडे योग्य तो पाठपुरावा करण्यात येईल, अशीही ग्वाही जिल्हाधिकारी कुशवाह यांनी दिली. त्याचप्रमाणे स्मार्ट सिटीसाठी निमा या औद्योगिक संस्थेने देशातील बंगळुरू, अहमदाबाद, पुणे, बडोदा, औरंगाबाद, नागपूर यांसारख्या १० शहरांचा तुलनात्मक सर्वेक्षण करून अहवाल दिल्यास त्याचा नाशिकसाठी फायदा होईल, असेही आवाहन त्यांनी केले.यावेळी बॉश कंपनीचे उपाध्यक्ष अविनाश चिंतावार, महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र कंपनीचे उपाध्यक्ष हिरामण अहेर, ऋषभ कंपनीचे अध्यक्ष नरेंद्र गोलिया, सॅमसोनाईटचे वाय. एम. सिंग, नाशिक इंजिनिअरिंग ब्लस्टरचे अध्यक्ष विक्रम सारडा, निमाचे अध्यक्ष संजीव नारंग, व्हिनस वाणी आदि व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी मधुकर ब्राह्मणकर, नगरसेवक शशिकांत जाधव, निशिकांत अहिरे, मंगेश पाटणकर, ज्ञानेश्वर गोपाळे, हर्षद ब्राह्मणकर, समीर पटवा, सुधाकर देशमुख, मिलिंद राजपूर, प्रमोद पुराणिक, जितुभाई ठक्कर आदिंनी चर्चेत भाग घेतला. यावेळी उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)