शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

माळेगाव औद्योगिक वसाहतीत उद्योजकांची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 15:46 IST

सिन्नर : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी औद्योगिक क्षेत्रात सुरक्षितता ठेवणे महत्वाचे असल्याचे प्रतिपादन एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी यांनी केले. माळेगाव औद्योगिक वसाहतीत निमाच्या कार्यालयात आयोजित उद्योजकांच्या बैठकीत ते बोलत होते.

ठळक मुद्देअधिकारी नितीन गवळी : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी औद्योगिक क्षेत्रात सुरक्षितता ठेवणे महत्वाचे

सिन्नर : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी औद्योगिक क्षेत्रात सुरक्षितता ठेवणे महत्वाचे असल्याचे प्रतिपादन एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी यांनी केले. माळेगाव औद्योगिक वसाहतीत निमाच्या कार्यालयात आयोजित उद्योजकांच्या बैठकीत ते बोलत होते.याप्रसंगी व्यासपिठावर प्रांतधिकारी अर्चना पठारे, तहसीलदार राहुल कोताडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ मोहन बच्छाव, निमाचे अतिरिक्त उपाध्यक्ष सुधीर बडगुजर, सिन्नर तालुका औद्योगिक वसाहतीचे चेअरमन पंडीत लोंढे आदी उपस्थित होते.संपूर्ण जगात कोरोना विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अनलॉक नंतर नाशिक जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना गेल्या काही दिवसापासून सिन्नर तालुक्यातही कोरोना रुग्णाची संख्या झपाट्याने वाढली आहे, सिन्नर तालुक्यात दोन औद्योगीक वसाहती असून या दोन्ही वसाहतीत 20 ते 25000 कामगार रोजगाराच्या दृष्टीने काम करण्यात येत असतात तसेच अनेक मल्टिनॅशनल ग्रुपचे अधिकारी हे नाशिक येथून येत असतात. त्यामुळे औद्योगिक वसाहतीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची जास्त शक्यता असल्याने या ठिकाणी अधिकारी, कर्मचारी व कामगारांची सर्वाधिक सुरक्षितता घेणे महत्वाचे असल्याचे गवळी यांनी सांगितले. याच बरोबर ज्या कंपन्यांमध्ये दोन अथवा तीन शिफ्ट सुरु आहे अशा ठिकाणी कामगारांना येण्या-जाण्यासाठी किमान अर्धा तासाचा वेळ ठेवणे महत्वाचे आहे या अर्ध्या तासात कामगार ज्या ठिकाणी काम करत होते त्याठिकाणी संपूर्ण सॅनिटाईझ करूनच नवीन कामगारांना कंपनीत प्रवेश दिला पाहिजे तसेच कंपनीच्या प्रवेशद्वारावर कामगाराना सॅनिटाईझ, ऑक्सिमिटरद्वारे तपासूनच प्रवेश द्यावा अशा सुचनाही त्यांनी केल्या.औद्योगिक क्षेत्रात महत्वाचा दुवा म्हणजे कामगार आहे तो जास्तीत जास्त वेळ हा आपल्या कामावर देत असल्याने त्याची काळजी कंपनीने घेतली पाहिजे, ज्या कंपनीचा कामगार हा दोन ते तीन दिवसापासून गैरहजर आहे त्याची संपूर्ण हिस्ट्री घेतल्याशिवाय त्याला कामावर घेऊ नये, तसेच कंपनीत सर्वानी मास्क वापरणे महत्वाचे, कोणीही आपले मास्क इतरांशी बोलताना काढून बोलू नये, मास्क अटकून न ठेवता ते नियमित नाकाला चांगल्या प्रकारे लावणे गरजेचे असल्याचे या वेळी प्रांतधिकारी अर्चना पठारे यांनी सांगितले तसेच सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करताना जवळपास 6 फूट इतके अंतर ठेवणे महत्वाचे आहे, कोणतेही वाहन आणत असतील तर ते वाहन संपूर्ण सॅनिटाईझ करूनच पार्किंग झोनमध्ये लावावे अशा सूचनाही पठारे यांनी केल्या.तहसीलदार राहुल कोताडे यांनी सिन्नर येथे नव्यानेच सुरु करण्यात आलेल्या रुग्णालयासाठी औद्योगिक वसाहतीकडून जी मदत होत आहे त्याबद्दल सर्वांचे आभार मानले. सूत्रसंचलन अतुल अग्रवाल व आभार प्रदर्शन सुधीर बडगुजर यांनी केले. याप्रसंगी निमा हाऊस उपसमितीचे अध्यक्ष राहुल नवले, ऊर्जा उपसमितीचे अध्यक्ष बबन वाजे, सेमिनार अँड वर्कशॉप उपसमितीचे अध्यक्ष एम.जी कुलकणी, सिन्नर उपसमितीचे अध्यक्ष अरुण चव्हाणके, रेक्रेशन उपसमितीचे अध्यक्ष रतन पडवळ, स्टाईसच्या व्हा. चेअरमन सौ. मीनाक्षी दळवी, संचालक सुनील कुंदे, व्यवस्थापक कमलाकर पोटे, दत्ता ढोबळे, बापू गावंड, सुहास काळे, राहुल शुक्ला, विशाल कुलकर्णी, सुधीर जोशी आदींसह उद्योजक, प्रतिनिधी उपस्थित होते.

टॅग्स :MIDCएमआयडीसीsinnar-acसिन्नर