शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

अनधिकृत बांधकामांबाबत महापालिकेचे प्रबोधन

By admin | Updated: January 16, 2015 00:06 IST

नागरिकांना आवाहन : सामासिक अंतर तपासून काढा अतिक्रमण

नाशिक : महापालिकेने अनधिकृत बांधकामांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारल्यानंतर नागरिक व व्यावसायिकांकडून स्वत:हूनच अतिक्रमित बांधकाम हटवले जाऊ लागले आहे; परंतु प्रमुख रस्त्यांपासून इमारतीपर्यंत सामासिक अंतर किती असावे याबाबतची विकास नियंत्रण नियमावली प्रसिद्ध करत महापालिकेने प्रथम प्रबोधनासाठी पुढाकार घेतला असून, संबंधितांनी सामासिक अंतर तपासून स्वत:हूनच अतिक्रमण काढून घ्यावे, याबाबतचे आवाहन केले आहे.मागील आठवड्यात गंगापूररोड व पेठरोड परिसरात जोरदार अतिक्रमण मोहीम राबविल्यानंतर महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी आठ दिवस मोहीम स्थगित ठेवण्याचा निर्णय घेत नागरिकांना स्वत:हूनच अतिक्रमण काढून घेण्याबाबत आवाहन केले होते. त्यानंतर नागरिक व व्यावसायिकांनी आयुक्तांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनधिकृत बांधकाम स्वत:हूनच हटविण्यास सुरुवातही केली आहे. मात्र, अनेक नागरिक व व्यावसायिकांमध्ये त्यांनी केलेल्या बांधकामांबाबत संभ्रमावस्था आहे. आपले बांधकाम हे अतिक्रमित आहे किंवा नाही, यासंबंधी आता महापालिकेनेच नागरिक व व्यावसायिकांसाठी विकास नियंत्रण नियमावलीतील अधिकृत बांधकामांसंबंधी माहिती देणारा तक्ता प्रसिद्ध केला आहे. राष्ट्रीय व राज्य महामार्गावर किमान ७५० चौ. मी. क्षेत्राचा भूखंड असेल तर किमान पुढावा १८ मीटर सामासिक अंतर सोडणे गरजेचे आहे. स्वतंत्र इमारत असेल तर रहिवासी कारणासाठी रस्त्याच्या मध्यापासून २५ मीटर आणि व्यावसायिक कारणांसाठी ३७.५० मीटर किंवा कमीत कमी ६ मीटर वा इमारतीच्या एक चतुर्थांश यापैकी जे जास्त असेल तेवढे सामासिक अंतर सोडणे आवश्यक आहे. २४ मीटर रस्ता किंवा त्यापेक्षा जास्त मोठा रस्ता असेल तर ६०० चौ.मी. क्षेत्र भूखंडासाठी १८ मीटर पुढावा आणि स्वतंत्र इमारत असेल तर इमारतीच्या उंचीच्या एक चतुर्थांश किंवा कमीत कमी ६ मीटर सामासिक अंतर सोडावे. १५ मीटर ते २४ मीटरपर्यंत रस्त्यालगत ५०० चौ.मी. क्षेत्र भूखंडासाठी १५ मीटर पुढावा आणि स्वतंत्र इमारत असेल, तर इमारतीच्या उंचीच्या एक चतुर्थांश किंवा कमीत कमी ४.५० मीटर सामासिक अंतर सोडावे. १२ ते १५ मीटर व त्यापेक्षा कमी रुंदीच्या रस्त्यालगत २५० चौ.मी. भूखंड असेल, तर १२ मीटर पुढावा आणि स्वतंत्र इमारत असेल, तर रहिवासी कारणासाठी इमारतीच्या उंचीच्या एक चतुर्थांश किंवा कमीत कमी ३ मीटर आणि व्यावसायिक कारणांसाठी ४.५० मीटर सामासिक अंतर सोडावे. १२ मीटरपेक्षा कमी रुंदीचे रस्ते असल्यास त्याठिकाणी १०० चौ.मी. क्षेत्र भूखंडासाठी ८ मीटर पुढावा आणि स्वतंत्र इमारत असेल, तर रहिवासी कारणासाठी इमारतीच्या उंचीच्या एक चतुर्थांश किंवा कमीत कमी ३ मीटर सामासिक अंतर सोडावे. ५० चौ.मी. क्षेत्र भूखंडावरील रो-हाउसकरिता पुढावा ४ मीटर सोडणे आवश्यक आहे. बाजूचे आणि पाठीमागील सामासिक अंतराबाबतही नियमावली प्रसिद्ध केली आहे. नागरिकांना नकाशाबाबत शंका असल्यास नगररचना विभागाकडून त्याची पडताळणी करून घ्यावी, असे आवाहनही केले आहे.