शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

अन्न-औषध विभागाकडून प्रबोधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 01:12 IST

अन्नसुरक्षा व मानके कायदा २००६ मध्ये अन्न सुरक्षेला प्रथम प्राधान्य असल्याने या कायद्याविषयी आणि ग्राहकांचे आरोग्य त्याबरोबरच हॉटेलात काम करण्याच्या ठिकाणी अपेक्षित स्वच्छता याबाबत शहरातील हॉटेल व्यावसायिकांना मार्गदर्शन करण्यात आले. कायद्याचे पालन आणि दंड तसेच शिक्षेची तरतूद याविषयीदेखील माहिती देण्यात आली.

नाशिक : अन्नसुरक्षा व मानके कायदा २००६ मध्ये अन्न सुरक्षेला प्रथम प्राधान्य असल्याने या कायद्याविषयी आणि ग्राहकांचे आरोग्य त्याबरोबरच हॉटेलात काम करण्याच्या ठिकाणी अपेक्षित स्वच्छता याबाबत शहरातील हॉटेल व्यावसायिकांना मार्गदर्शन करण्यात आले. कायद्याचे पालन आणि दंड तसेच शिक्षेची तरतूद याविषयीदेखील माहिती देण्यात आली. अध्यक्षस्थानी सहआयुक्त यू. एस. वंजारी होते.हॉटेल एमराल्ड पार्क येथे या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हॉटेल व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष संजय चव्हाण, श्रीधर शेट्टी, शिवाजी जाधव, तेज टकले उपस्थित होते. बदलत्या परिस्थितीनुरूप तयार करण्यात आलेल्या अन्नसुरक्षा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करून ग्राहकांचे हित जोपसण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. हॉटेल व्यावसायिकांचा संपर्क हा सर्व घटकातील आणि सर्व वयोगटातील लोकांशी येत असल्याने त्यांनी अधिक काळजी घेणे अपेक्षित आहे. अन्नाची सुरक्षितता ही प्रथम प्राधान्यावर असली पाहिजे, असेदेखील यावेळी अन्न विभागातील अधिकाºयांनी सांगितले.याप्रसंगी सहायक आयुक्त सी. डी. राठोड यांनी सांगितले की अन्नसुरक्षा व्यवस्था ही अत्यंत महत्त्वाची बाब असून याचा थेट संबंध नागरिकांच्या जीवनाशी येत असल्याने याबाबत सर्वांनी कायमच काळजी घेणे आवश्यक ठरते. तर अन्नसुरक्षा तेरकर यांनी सांगितले की, हॉटेल व्यवसायिकांनी ग्राहकांना कोणतेही पदार्थ पुरवितांना नियमाचे अत्यंत काटेकोरपणे पालन करावे. अन्नपदार्थातून कोणताही धोका निर्माण होणार नाही यासाठी सर्वोतोपरी खबरदारी घेण्यात यावी. दरम्यान, अशाप्रकरच्या कार्यशाळा नियमित घेण्याची मागणी यावेळी हॉटेल व्यावसायिकांनी केली. नाशिक जिल्ह्यात भगर, तांदूळ व मिठाई उत्पादक यांच्यासाठी तीन कार्यशाळा घेण्यात आलेल्या आहेत. तसेच सुरक्षित प्रसाद वाटपासंदर्भात देवस्थान प्रशासनाचीदेखील बैठक घेण्यात आली आहे. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अन्नसुरक्षा अधिकारी बाविस्कर, इंगळे, सूर्यवंशी यांचे सहकार्य लाभले. अन्नसुरक्षा अधिकारी विवेक पाटील यांनी आभार मानले. तर श्रीमती पटवर्धन यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी पदाधिकारी उपस्थित होते.