शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

अन्न-औषध विभागाकडून प्रबोधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 01:12 IST

अन्नसुरक्षा व मानके कायदा २००६ मध्ये अन्न सुरक्षेला प्रथम प्राधान्य असल्याने या कायद्याविषयी आणि ग्राहकांचे आरोग्य त्याबरोबरच हॉटेलात काम करण्याच्या ठिकाणी अपेक्षित स्वच्छता याबाबत शहरातील हॉटेल व्यावसायिकांना मार्गदर्शन करण्यात आले. कायद्याचे पालन आणि दंड तसेच शिक्षेची तरतूद याविषयीदेखील माहिती देण्यात आली.

नाशिक : अन्नसुरक्षा व मानके कायदा २००६ मध्ये अन्न सुरक्षेला प्रथम प्राधान्य असल्याने या कायद्याविषयी आणि ग्राहकांचे आरोग्य त्याबरोबरच हॉटेलात काम करण्याच्या ठिकाणी अपेक्षित स्वच्छता याबाबत शहरातील हॉटेल व्यावसायिकांना मार्गदर्शन करण्यात आले. कायद्याचे पालन आणि दंड तसेच शिक्षेची तरतूद याविषयीदेखील माहिती देण्यात आली. अध्यक्षस्थानी सहआयुक्त यू. एस. वंजारी होते.हॉटेल एमराल्ड पार्क येथे या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हॉटेल व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष संजय चव्हाण, श्रीधर शेट्टी, शिवाजी जाधव, तेज टकले उपस्थित होते. बदलत्या परिस्थितीनुरूप तयार करण्यात आलेल्या अन्नसुरक्षा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करून ग्राहकांचे हित जोपसण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. हॉटेल व्यावसायिकांचा संपर्क हा सर्व घटकातील आणि सर्व वयोगटातील लोकांशी येत असल्याने त्यांनी अधिक काळजी घेणे अपेक्षित आहे. अन्नाची सुरक्षितता ही प्रथम प्राधान्यावर असली पाहिजे, असेदेखील यावेळी अन्न विभागातील अधिकाºयांनी सांगितले.याप्रसंगी सहायक आयुक्त सी. डी. राठोड यांनी सांगितले की अन्नसुरक्षा व्यवस्था ही अत्यंत महत्त्वाची बाब असून याचा थेट संबंध नागरिकांच्या जीवनाशी येत असल्याने याबाबत सर्वांनी कायमच काळजी घेणे आवश्यक ठरते. तर अन्नसुरक्षा तेरकर यांनी सांगितले की, हॉटेल व्यवसायिकांनी ग्राहकांना कोणतेही पदार्थ पुरवितांना नियमाचे अत्यंत काटेकोरपणे पालन करावे. अन्नपदार्थातून कोणताही धोका निर्माण होणार नाही यासाठी सर्वोतोपरी खबरदारी घेण्यात यावी. दरम्यान, अशाप्रकरच्या कार्यशाळा नियमित घेण्याची मागणी यावेळी हॉटेल व्यावसायिकांनी केली. नाशिक जिल्ह्यात भगर, तांदूळ व मिठाई उत्पादक यांच्यासाठी तीन कार्यशाळा घेण्यात आलेल्या आहेत. तसेच सुरक्षित प्रसाद वाटपासंदर्भात देवस्थान प्रशासनाचीदेखील बैठक घेण्यात आली आहे. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अन्नसुरक्षा अधिकारी बाविस्कर, इंगळे, सूर्यवंशी यांचे सहकार्य लाभले. अन्नसुरक्षा अधिकारी विवेक पाटील यांनी आभार मानले. तर श्रीमती पटवर्धन यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी पदाधिकारी उपस्थित होते.