शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

गणित, भौतिकशास्त्राशिवाय अभियांत्रिकी शिक्षण कठीण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:15 IST

नाशिक : गणित आणि भौतिकशास्त्र हा अभियांत्रिकीचा पाया असून, या दोन विषयांशिवाय अभियांत्रिकी अभ्यासक्रमास प्रवेश देणे सयुक्तिक ठरणार नाही. ...

नाशिक : गणित आणि भौतिकशास्त्र हा अभियांत्रिकीचा पाया असून, या दोन विषयांशिवाय अभियांत्रिकी अभ्यासक्रमास प्रवेश देणे सयुक्तिक ठरणार नाही. या निर्णयामुळे अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या रिक्त राहिलेल्या जागांमध्ये वाढही होण्याची अपेक्षा व्यक्त होत असली तरी प्रत्यक्षात उलट प्रतिक्रिया उमटून शिक्षणक्षेत्रात संभ्रमाची स्थिती निर्माण होईल, असे मत तज्ज्ञांकरून व्यक्त होत आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) २०२१-२२ या शैक्षणिक वर्षातील प्रवेशासाठी गणित व भौतिकशास्त्र विषय बंधनकारक नसल्याचे नुकतेच स्पष्ट केले. अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची भीती दूर करण्यासाठी आणि प्रवेश क्षमता वाढविण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. परंतु, अकरावी-बारावीला भौतिकशास्त्र व गणित हे विषय न घेणारे विद्यार्थी अभियांत्रिकी अभ्यासक्रमाकडे वळत नाहीत. त्यामुळे या निर्णयामुळे अभियांत्रिकीच्या प्रवेशावर कोणताही परिणाम होणार नसल्याचे शिक्षणतज्ज्ञ सांगत आहेत.

अभियांत्रिकी पदवीचा कालावधी वाढण्याची भीती

अभियांत्रिकी प्रवेशासाठी नियमावलीत बदल केले जाणार असतील तर प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेतली जाणार का? तसेच ही परीक्षा घेण्यात आली तर त्यातूनही गणित व भौतिकशास्त्र विषयांसदर्भातील प्रश्न वगळण्यात येतील का, असा प्रश्न विद्यार्थी आणि प्रवेश परीक्षा मार्गदर्शकांना पडला आहे. गणित व भौतिकशास्त्र विषयांची उणीव भरून काढण्यासाठी पदवीदरम्यान, ब्रीज कोर्सचा पर्याय निवडावा लागू शकतो, मात्र या कोर्समु‌ळे विद्यार्थ्यांच्या अभियांत्रिकी पदवी शिक्षणाचा कालावधी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

कोट-

अकरावी-बारावीत भौतिकशास्त्र आणि गणित विषयाच्या मूलभूत संकल्पनांचा अभ्यास झाल्याचे गृहीत धरूनच

विद्यापीठाकडून अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम तयार केला जातो. मात्र, या पुढील काळात विद्यापीठाला अभ्यासक्रमाबाबत वेगळा विचार करायला लागेल.

- डॉ. गजानन खराटे, माजी अधिष्ठाता, अभियांत्रिकी विद्याशाखा, सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठ

--

अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी गणित विषय आवश्यकच आहे. त्यामुळे गणित, भौतिकशास्त्राचा अभ्यास न करणारे विद्यार्थी महाविद्यालयात आले तर प्रथमत: त्यांना या विषयांच्या मूलभूत संकल्पना शिकवाव्या लागतील, असे मत अभियांत्रिकी शाखेच्या प्राध्यापकांनी व्यक्त केले आहे.

--

गणित आणि भौतिकशास्त्राशिवाय अभियांत्रिकी अभ्यासक्रमाला प्रवेश देणे चुकीचे होईल. शिक्षणक्षेत्रात आपण आणखी किती तडजोड करणार? अर्थशास्त्र विषयासह इतर विद्या शाखांमधील काही विषयांसाठी गणित अनिवार्यच आहे. या निर्णयामुळे रोजगाराचा प्रश्न उपस्थित होईल, असे मत अभियांत्रिकी क्षेत्रात कार्यरत एका अभियंत्याने व्यक्त केले आहे.

--गणित, भौतिकवास्त्राशिवाय अभियांत्रिकी हा संभ्रम निर्माण करणारा निर्णय आहे. विज्ञानाच्या मूलभूत संकल्पना समजल्याशिवाय अभियांत्रिकी अभ्यासक्रम पूर्ण करणे अशक्य आहे. तसेच ब्रीज कोर्स केल्याने हा प्रश्न सुटणार नाही. गेल्या दहा वर्षात अभियांत्रिकी शिक्षण घेणारे बहुतांश विद्यार्थी आयटी किंवा स्पर्धा परीक्षांकडे वळले. त्यामुळे या निर्णयाने अभियांत्रिकीच्या प्रवेशात वाढ होणार नसल्याचे मत अभियांत्रिकी शिक्षण तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.

जिल्ह्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांची संख्या -१९

एकूण जागा- ७५३०

एकूण प्रवेश -३२३९

रिक्त जागा -४२९१

प्रवेशाचे प्रमाण- ४३ टक्के