शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

जुलै महिना संपतआला तरी विहिरी अजून कोरड्याच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 19:59 IST

खामखेडा : चालू वर्षी जूलै महिना संपतआला तरी खामखेडा परिसरातील विहिरी अजूनही पाण्याच्या पातळीत वाढ न झाल्याने कोरड्या आहेत.

ठळक मुद्देखामखेडा : परिसरातील शेती पावसावर अवलंबून असल्याने शेतकरी हवालदिल

खामखेडा : चालू वर्षी जूलै महिना संपतआला तरी खामखेडा परिसरातील विहिरी अजूनही पाण्याच्या पातळीत वाढ न झाल्याने कोरड्या आहेत.खामखेडा, सावकी, पिळकोस, विसापूर, भादवन, चाचेर आदी गावे बागायती शेतीसाठी ओळखले जातात. या गावातील शेतकरी लाल कांदा, उन्हाळी कांद्याबरोबर टमाटे, कोबी, मिरची आदी पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घतात. त्यामुळे परराज्यातील बाजारपेठेत नाव घेतले जाते. परंतु या गावाची शेती ही पावसावरच अवलंबून आहे. कारण या गावाच्या परिसरात एकही मोठ्या धरण नाही. तेव्हा डोंगर उतारावर पडणारे पाऊसाचे पाणी नाला-बांध मघ्ये जमा होऊन जमिनीत मुरणाऱ्या पाण्यावर या गावांना वरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. दर वर्षी जून माहिन्यामघ्ये पाऊस पडल्यावर त्या पाऊसावर शेतकरी आपल्या खरीप पिकाची पेरणी करीत असे. त्यानंतर जुलै महिन्यात झालेल्या पावसात विहिरीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होते असे.चालू वर्षी सुरवातीचे तिन्ही नक्षत्र कोरडी गेली.आद्रा नक्षत्राच्या शेवटच्या दोन दिवस जेमतेम पाऊस झाला.या पाऊसावर शेतकर्याने खरीप पिकाच्या पेरण्या केल्या.त्यानंतर पाऊसाने दिंडी मारली.आण िपिके पाण्याअभावी करपू लागली होती.पुन्हा दुबार पेरणीच्या करावी लागते कि काय याची चिंता शेतकºयाला लागली होती. परंतु शुक्र वारी २० तारखेला पुन्हा पाऊसाने हजेरी लावल्याने पिकांना जीवदान मिळाले होते. परंतु त्यांनतर पुन्हा सोमवारी पासून प्रचंड प्रमाणात ऊन पडू लागले होते. त्या ऊनाची तीव्रता मोठ्या प्रमाणात होतीकी त्यामुळे प्रचंड उखाडा जाणवत होता.त्यामुळे पिके पुन्हा कोमजू लागली होती.परंतु गेल्या तीन दिवसांपासून रिमझिम पावसाला सुरु वात झाल्याने पिकांना जीवदान मिळाले आहे.परंतु खामखेडा डोगर परिसरात अजूनही दमदार पाऊस न झाल्यामुळे अजून डोंगर उतारावर पाऊसाचे पाणी वाहिले नसल्याने नाला बांध, केटीवेर अजून कोरडे आहेत. जमिनीत पाणी न मुरल्यामुळे भूगर्भातील पाण्याच्या पातळीत अजून वाढ झालेली नसल्यामुळे अजून विहिरीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झालेली नाही. त्यामुळे खामखेडा शिवारातील विहिरी जुलै मिहना संपत आला तरी अजूनही कोरड्याचं आहेत. दर वर्षी खामखेडा परिसरातील शेतकरी लाल कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात करतो. लाल कांद्याचे बियाणे जुलै महिन्यात टाकली जातात, कारण जुलै महिन्यात पाऊस पडल्यावर विहिरींना पाणी उतरलेले असते. तेव्हा शेतकरी लाल कांद्याची लागवड आॅगस्ट महिन्यात करतो. तेव्हा नोंहेबर महिन्यात लाल कांदा तयार होऊन मार्केट मघ्ये येतो. परंतु अजूनही विहिरींना पाणी नसल्याने लाल कांद्याची बियाणे घरात पडून आहेत. त्यामुळे अजूनही खामखेडा परिसरात जोरदार पाऊसाची अपेक्षा शेतकरी करीत आहे.