शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
3
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
4
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
5
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
6
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
7
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
8
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
9
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
10
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
11
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
12
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
13
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
14
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
15
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
16
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
17
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
18
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
19
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
20
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…

जुलै महिना संपतआला तरी विहिरी अजून कोरड्याच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 19:59 IST

खामखेडा : चालू वर्षी जूलै महिना संपतआला तरी खामखेडा परिसरातील विहिरी अजूनही पाण्याच्या पातळीत वाढ न झाल्याने कोरड्या आहेत.

ठळक मुद्देखामखेडा : परिसरातील शेती पावसावर अवलंबून असल्याने शेतकरी हवालदिल

खामखेडा : चालू वर्षी जूलै महिना संपतआला तरी खामखेडा परिसरातील विहिरी अजूनही पाण्याच्या पातळीत वाढ न झाल्याने कोरड्या आहेत.खामखेडा, सावकी, पिळकोस, विसापूर, भादवन, चाचेर आदी गावे बागायती शेतीसाठी ओळखले जातात. या गावातील शेतकरी लाल कांदा, उन्हाळी कांद्याबरोबर टमाटे, कोबी, मिरची आदी पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घतात. त्यामुळे परराज्यातील बाजारपेठेत नाव घेतले जाते. परंतु या गावाची शेती ही पावसावरच अवलंबून आहे. कारण या गावाच्या परिसरात एकही मोठ्या धरण नाही. तेव्हा डोंगर उतारावर पडणारे पाऊसाचे पाणी नाला-बांध मघ्ये जमा होऊन जमिनीत मुरणाऱ्या पाण्यावर या गावांना वरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. दर वर्षी जून माहिन्यामघ्ये पाऊस पडल्यावर त्या पाऊसावर शेतकरी आपल्या खरीप पिकाची पेरणी करीत असे. त्यानंतर जुलै महिन्यात झालेल्या पावसात विहिरीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होते असे.चालू वर्षी सुरवातीचे तिन्ही नक्षत्र कोरडी गेली.आद्रा नक्षत्राच्या शेवटच्या दोन दिवस जेमतेम पाऊस झाला.या पाऊसावर शेतकर्याने खरीप पिकाच्या पेरण्या केल्या.त्यानंतर पाऊसाने दिंडी मारली.आण िपिके पाण्याअभावी करपू लागली होती.पुन्हा दुबार पेरणीच्या करावी लागते कि काय याची चिंता शेतकºयाला लागली होती. परंतु शुक्र वारी २० तारखेला पुन्हा पाऊसाने हजेरी लावल्याने पिकांना जीवदान मिळाले होते. परंतु त्यांनतर पुन्हा सोमवारी पासून प्रचंड प्रमाणात ऊन पडू लागले होते. त्या ऊनाची तीव्रता मोठ्या प्रमाणात होतीकी त्यामुळे प्रचंड उखाडा जाणवत होता.त्यामुळे पिके पुन्हा कोमजू लागली होती.परंतु गेल्या तीन दिवसांपासून रिमझिम पावसाला सुरु वात झाल्याने पिकांना जीवदान मिळाले आहे.परंतु खामखेडा डोगर परिसरात अजूनही दमदार पाऊस न झाल्यामुळे अजून डोंगर उतारावर पाऊसाचे पाणी वाहिले नसल्याने नाला बांध, केटीवेर अजून कोरडे आहेत. जमिनीत पाणी न मुरल्यामुळे भूगर्भातील पाण्याच्या पातळीत अजून वाढ झालेली नसल्यामुळे अजून विहिरीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झालेली नाही. त्यामुळे खामखेडा शिवारातील विहिरी जुलै मिहना संपत आला तरी अजूनही कोरड्याचं आहेत. दर वर्षी खामखेडा परिसरातील शेतकरी लाल कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात करतो. लाल कांद्याचे बियाणे जुलै महिन्यात टाकली जातात, कारण जुलै महिन्यात पाऊस पडल्यावर विहिरींना पाणी उतरलेले असते. तेव्हा शेतकरी लाल कांद्याची लागवड आॅगस्ट महिन्यात करतो. तेव्हा नोंहेबर महिन्यात लाल कांदा तयार होऊन मार्केट मघ्ये येतो. परंतु अजूनही विहिरींना पाणी नसल्याने लाल कांद्याची बियाणे घरात पडून आहेत. त्यामुळे अजूनही खामखेडा परिसरात जोरदार पाऊसाची अपेक्षा शेतकरी करीत आहे.