शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

जुलै महिना संपतआला तरी विहिरी अजून कोरड्याच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 19:59 IST

खामखेडा : चालू वर्षी जूलै महिना संपतआला तरी खामखेडा परिसरातील विहिरी अजूनही पाण्याच्या पातळीत वाढ न झाल्याने कोरड्या आहेत.

ठळक मुद्देखामखेडा : परिसरातील शेती पावसावर अवलंबून असल्याने शेतकरी हवालदिल

खामखेडा : चालू वर्षी जूलै महिना संपतआला तरी खामखेडा परिसरातील विहिरी अजूनही पाण्याच्या पातळीत वाढ न झाल्याने कोरड्या आहेत.खामखेडा, सावकी, पिळकोस, विसापूर, भादवन, चाचेर आदी गावे बागायती शेतीसाठी ओळखले जातात. या गावातील शेतकरी लाल कांदा, उन्हाळी कांद्याबरोबर टमाटे, कोबी, मिरची आदी पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घतात. त्यामुळे परराज्यातील बाजारपेठेत नाव घेतले जाते. परंतु या गावाची शेती ही पावसावरच अवलंबून आहे. कारण या गावाच्या परिसरात एकही मोठ्या धरण नाही. तेव्हा डोंगर उतारावर पडणारे पाऊसाचे पाणी नाला-बांध मघ्ये जमा होऊन जमिनीत मुरणाऱ्या पाण्यावर या गावांना वरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. दर वर्षी जून माहिन्यामघ्ये पाऊस पडल्यावर त्या पाऊसावर शेतकरी आपल्या खरीप पिकाची पेरणी करीत असे. त्यानंतर जुलै महिन्यात झालेल्या पावसात विहिरीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होते असे.चालू वर्षी सुरवातीचे तिन्ही नक्षत्र कोरडी गेली.आद्रा नक्षत्राच्या शेवटच्या दोन दिवस जेमतेम पाऊस झाला.या पाऊसावर शेतकर्याने खरीप पिकाच्या पेरण्या केल्या.त्यानंतर पाऊसाने दिंडी मारली.आण िपिके पाण्याअभावी करपू लागली होती.पुन्हा दुबार पेरणीच्या करावी लागते कि काय याची चिंता शेतकºयाला लागली होती. परंतु शुक्र वारी २० तारखेला पुन्हा पाऊसाने हजेरी लावल्याने पिकांना जीवदान मिळाले होते. परंतु त्यांनतर पुन्हा सोमवारी पासून प्रचंड प्रमाणात ऊन पडू लागले होते. त्या ऊनाची तीव्रता मोठ्या प्रमाणात होतीकी त्यामुळे प्रचंड उखाडा जाणवत होता.त्यामुळे पिके पुन्हा कोमजू लागली होती.परंतु गेल्या तीन दिवसांपासून रिमझिम पावसाला सुरु वात झाल्याने पिकांना जीवदान मिळाले आहे.परंतु खामखेडा डोगर परिसरात अजूनही दमदार पाऊस न झाल्यामुळे अजून डोंगर उतारावर पाऊसाचे पाणी वाहिले नसल्याने नाला बांध, केटीवेर अजून कोरडे आहेत. जमिनीत पाणी न मुरल्यामुळे भूगर्भातील पाण्याच्या पातळीत अजून वाढ झालेली नसल्यामुळे अजून विहिरीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झालेली नाही. त्यामुळे खामखेडा शिवारातील विहिरी जुलै मिहना संपत आला तरी अजूनही कोरड्याचं आहेत. दर वर्षी खामखेडा परिसरातील शेतकरी लाल कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात करतो. लाल कांद्याचे बियाणे जुलै महिन्यात टाकली जातात, कारण जुलै महिन्यात पाऊस पडल्यावर विहिरींना पाणी उतरलेले असते. तेव्हा शेतकरी लाल कांद्याची लागवड आॅगस्ट महिन्यात करतो. तेव्हा नोंहेबर महिन्यात लाल कांदा तयार होऊन मार्केट मघ्ये येतो. परंतु अजूनही विहिरींना पाणी नसल्याने लाल कांद्याची बियाणे घरात पडून आहेत. त्यामुळे अजूनही खामखेडा परिसरात जोरदार पाऊसाची अपेक्षा शेतकरी करीत आहे.