शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

काळखोडे परिसरात अतिक्रमण

By admin | Updated: September 14, 2015 22:31 IST

दुष्काळ : पाण्याचे टँकर येण्यास अडचण

तळेगावरोही : चांदवड तालुक्यातील काळखोडे येथे रस्त्यावर अतिक्रमण तसेच झुडपे वाढल्यामुळे पाण्याचे टँकर गावात येण्यास अडचण निर्माण होत आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे सरपंच विलास शेळके, संगीता वाघ यांच्या मागणीनुसार गावाला पाणी टॅँकर सुरू करण्यात आला; मात्र काळखोडे मार्गावर काही भागात अतिक्रमण व झाडेझुडपे वाढल्याने टॅँकर गावात जाऊ न शकल्याने अखेर पाणी रस्त्यावरच ओतून द्यावे लागले. टॅँकरला गावात जाण्यासाठी रस्ता नसल्याने संबंधित अधिकारी व तहसीलदारांनी या रस्त्याच्या रुंदीकरणाकडे लक्ष द्यावे, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. काळखोडे येथे दुष्काळी परिस्थितीमुळे वाडी-वस्त्यांना पाणीपुरवठा व्हावा, या उद्देशाने पाण्याचा टॅँकर सुरू झाला. रोटेशन पद्धतीने काळखोडे ते समिटरोड दीड किमीपर्यंत जाताना बाजूच्या वस्त्यांना पाणी देण्यात आले. माजी उपसरपंच अण्णा शेळके यांच्या वस्तीपर्यंत पाणीवाटप झाले; परंतु पुढे भास्कर शेळके यांच्या वस्तीजवळ अरुंद रस्ता असल्याने व झाडे, झुडपे तसेच शेतकऱ्यांनी अतिक्रमणे केली आहेत. तसेच लाकडे, दगड, वैगेरे रस्त्यात असल्याने दोन वाहने या रस्त्याने जाऊ शकत नाही. टॅँकरचालक महादेव शिरसाठ यांनी भरलेला टॅँकर अगदी रस्त्यावरच खाली केला. कारण चालकानेही यापूर्वी सांगितले होते की, टॅँकर पुढे जाणार नाही. चालकाने प्रसंगावधान राखल्याने अपघातापासून वाचले असले तरी पुढील वस्त्यासाठी पाणी कसे मिळणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. (वार्ताहर)