शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

अतिक्रमण हटले; पुनर्विकास सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 00:41 IST

नेहरू उद्यान : सहा महिन्यांत बदलणार रुपडे नाशिक : महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने बुधवारी (दि. १३) सकाळी नेहरू उद्यानातील बहुचर्चित खाद्यपदार्थ व्यावसायिकांनी केलेले अतिक्रमण हटविले आणि लगोलग उद्यानाच्या पुनर्विकासाच्या कामाचा श्रीगणेशा करण्यात आला. त्यामुळे मार्च २०१८ अखेर नेहरू उद्यानाचे रुपडे बदलणार आहे.

नेहरू उद्यान : सहा महिन्यांत बदलणार रुपडे

नाशिक : महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने बुधवारी (दि. १३) सकाळी नेहरू उद्यानातील बहुचर्चित खाद्यपदार्थ व्यावसायिकांनी केलेले अतिक्रमण हटविले आणि लगोलग उद्यानाच्या पुनर्विकासाच्या कामाचा श्रीगणेशा करण्यात आला. त्यामुळे मार्च २०१८ अखेर नेहरू उद्यानाचे रुपडे बदलणार आहे.दीर्घ काळापासून नेहरू उद्यानातील अतिक्रमणाचा प्रश्न भिजत पडला होता. नेहरू उद्यानातील जागेचा कब्जा चायनीज खाद्यपदार्थांची विक्री करणाºया व्यावसायिकांनी घेतला होता. या व्यावसायिकांना राजकीय पाठबळ लाभल्याने त्यांच्याविरुद्ध कारवाईत महापालिकेला अडथळे निर्माण होत होते. त्यातच, अगोदर शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता भाजपात दाखल झालेल्या एका राजकीय नेत्याचा वरदहस्त लाभल्याने संबंधित व्यावसायिकांची मुजोरीही वाढीस लागलेली होती. याच उद्यानात संबंधित नेत्याने स्थापन केलेल्या संघटनेचा फलक उभारण्यात आला होता. असा होणार पुनर्विकास!नेहरू उद्यानाच्या पुनर्विकासासाठी स्मार्ट सिटी कंपनीने निधी देऊ केला आहे. त्यासाठी १ कोटी २० लाख रुपये खर्च येणार आहे. स्कायलर कन्स्ट्रक्शन या मक्तेदाराला पुनर्विकासाचे काम देण्यात आले असून, त्यात प्रामुख्याने अत्याधुनिक पद्धतीचे विद्युतीकरण, सुशोभीत पाथवे, शोभिवंत झाडे, कर्बवॉल, अत्याधुनिक पद्धतीची आसनव्यवस्था, आकर्षक कारंजे आदी सुविधा पुरविल्या जाणार आहेत. मक्तेदाराला सहा महिन्यांची मुदत देण्यात आली असून, मार्च २०१८ अखेर उद्यान कात टाकणार आहे.