शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

नासर्डीपात्रात अतिक्रमण

By admin | Updated: February 2, 2016 23:07 IST

नासर्डीपात्रात अतिक्रमण

 इंदिरानगर : मुंबई नाका ते शिवाजीवाडी दरम्यान, नासर्डी नदीच्या पात्रात दिवसागणिक वाढणाऱ्या अतिक्रमणामुळे नदीचे पात्र अरुंद होत चालले आहे. तरीही संबंधित विभागाकडून नदीपात्रात वाढते अतिक्रमण काढण्यास मुहूर्त लागत नसल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.शिवाजीवाडी, नंदिनीनगर व भारतनगर परिसरात हातावर पोट भरणारी वसाहत म्हणून ओळखली जाते. शहरातील विविध भागातून झोपडपट्टी उठविण्यात येऊन शिवाजीवाडीत म्हाडा योजनेतून काही नागरिकांना घरे बांधून दिली आहेत. काही रहिवाशांना सुमारे आठ महिन्यांपूर्वीच भारतनगरलगत घरकुल योजनेत घरे देण्यात आली. तरीही परिसरात झोपड्या आणि अनधिकृत घरे कमी होण्याऐवजी दिवसागणिक वाढतच आहेत. परिसरात झोपड्या टाकण्यासाठी जागाच शिल्लक न राहिल्याने आणि सिंहस्थानिमित्ताने १०० फुटी रस्त्यावरच असलेल्या सुमारे ६० झोपड्या अतिक्रमण विभागाने हटविल्या होत्या. त्यापैकी काही रहिवाशांनी आणि सुमारे आठ वर्षांपासून एक एक करून मुंबई नाका ते शिवाजीवाडी नासर्डी नदीच्या पात्रात विटा व मातीची भर टाकून घरे बांधण्यात आली. आतापर्यंत सुमारे २५ घरे सर्रासपणे नदीपात्रात बांधण्यात आली आहेत. त्यामुळे नदीचे पात्र कमी झाले आहे. पावसाळ्यात नदी दुतर्फा वाहते तेव्हा या सर्व रहिवाशांना धोका निर्माण होऊन संसार उपयोगी वस्तूंसह जीवितहानी होण्याची शक्यता टाळता येत नाही. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी महापालिका प्रशासनाच्या वतीने फक्त धोक्याची घरे असल्याची नोटीस दिली जाते. परंतु नदीपात्रात असलेली धोक्याची घरे काढण्यासाठी कारवाई का करत नाहीत असा प्रश्न निर्माण होत आहे. जोपर्यंत मोठी दुर्घटना घडत नाही तोपर्यंत कारवाई करायची नाही अशी पद्धत केव्हा बंद होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. (वार्ताहर)