शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
3
IND vs WI : DSP सिराजची 'दबंगगिरी'! कमबॅकमध्ये दिग्गज स्टारच्या पोराच्या पदरी 'भोपळा'
4
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
5
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
6
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम
7
एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! संपत्ती ५०० बिलियन डॉलरवर, इतकी कमाई आली कोठून?
8
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
9
Success Story: १९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
10
वडील करणार होते पाचव्यांदा लग्न; संपत्तीसाठी लेकाने काढला काटा, पोलिसांची केली दिशाभूल अन्...
11
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
12
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
13
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
14
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
15
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
16
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
17
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
18
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
19
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
20
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?

नासर्डीपात्रात अतिक्रमण

By admin | Updated: February 2, 2016 23:07 IST

नासर्डीपात्रात अतिक्रमण

 इंदिरानगर : मुंबई नाका ते शिवाजीवाडी दरम्यान, नासर्डी नदीच्या पात्रात दिवसागणिक वाढणाऱ्या अतिक्रमणामुळे नदीचे पात्र अरुंद होत चालले आहे. तरीही संबंधित विभागाकडून नदीपात्रात वाढते अतिक्रमण काढण्यास मुहूर्त लागत नसल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.शिवाजीवाडी, नंदिनीनगर व भारतनगर परिसरात हातावर पोट भरणारी वसाहत म्हणून ओळखली जाते. शहरातील विविध भागातून झोपडपट्टी उठविण्यात येऊन शिवाजीवाडीत म्हाडा योजनेतून काही नागरिकांना घरे बांधून दिली आहेत. काही रहिवाशांना सुमारे आठ महिन्यांपूर्वीच भारतनगरलगत घरकुल योजनेत घरे देण्यात आली. तरीही परिसरात झोपड्या आणि अनधिकृत घरे कमी होण्याऐवजी दिवसागणिक वाढतच आहेत. परिसरात झोपड्या टाकण्यासाठी जागाच शिल्लक न राहिल्याने आणि सिंहस्थानिमित्ताने १०० फुटी रस्त्यावरच असलेल्या सुमारे ६० झोपड्या अतिक्रमण विभागाने हटविल्या होत्या. त्यापैकी काही रहिवाशांनी आणि सुमारे आठ वर्षांपासून एक एक करून मुंबई नाका ते शिवाजीवाडी नासर्डी नदीच्या पात्रात विटा व मातीची भर टाकून घरे बांधण्यात आली. आतापर्यंत सुमारे २५ घरे सर्रासपणे नदीपात्रात बांधण्यात आली आहेत. त्यामुळे नदीचे पात्र कमी झाले आहे. पावसाळ्यात नदी दुतर्फा वाहते तेव्हा या सर्व रहिवाशांना धोका निर्माण होऊन संसार उपयोगी वस्तूंसह जीवितहानी होण्याची शक्यता टाळता येत नाही. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी महापालिका प्रशासनाच्या वतीने फक्त धोक्याची घरे असल्याची नोटीस दिली जाते. परंतु नदीपात्रात असलेली धोक्याची घरे काढण्यासाठी कारवाई का करत नाहीत असा प्रश्न निर्माण होत आहे. जोपर्यंत मोठी दुर्घटना घडत नाही तोपर्यंत कारवाई करायची नाही अशी पद्धत केव्हा बंद होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. (वार्ताहर)