शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
3
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
4
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ महत्वाच्या समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
5
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
6
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
7
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
8
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
9
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
10
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
12
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
13
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक
14
T20 Mumbai League : कॅप्टन पृथ्वीची फसलेली चाल; सलामीवीर जोडीदाराला Retire Out करून स्वत:ही परतला तंबूत
15
“निवडणूक आयोग हा भाजपा आयोग, मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी का करत नाही?”: नाना पटोले
16
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
17
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
18
कोलंबियात भाषण देताना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या डोक्यात झाडली गोळी; हल्लेखोराला अटक
19
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
20
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती

नासर्डीपात्रात अतिक्रमण

By admin | Updated: February 2, 2016 23:07 IST

नासर्डीपात्रात अतिक्रमण

 इंदिरानगर : मुंबई नाका ते शिवाजीवाडी दरम्यान, नासर्डी नदीच्या पात्रात दिवसागणिक वाढणाऱ्या अतिक्रमणामुळे नदीचे पात्र अरुंद होत चालले आहे. तरीही संबंधित विभागाकडून नदीपात्रात वाढते अतिक्रमण काढण्यास मुहूर्त लागत नसल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.शिवाजीवाडी, नंदिनीनगर व भारतनगर परिसरात हातावर पोट भरणारी वसाहत म्हणून ओळखली जाते. शहरातील विविध भागातून झोपडपट्टी उठविण्यात येऊन शिवाजीवाडीत म्हाडा योजनेतून काही नागरिकांना घरे बांधून दिली आहेत. काही रहिवाशांना सुमारे आठ महिन्यांपूर्वीच भारतनगरलगत घरकुल योजनेत घरे देण्यात आली. तरीही परिसरात झोपड्या आणि अनधिकृत घरे कमी होण्याऐवजी दिवसागणिक वाढतच आहेत. परिसरात झोपड्या टाकण्यासाठी जागाच शिल्लक न राहिल्याने आणि सिंहस्थानिमित्ताने १०० फुटी रस्त्यावरच असलेल्या सुमारे ६० झोपड्या अतिक्रमण विभागाने हटविल्या होत्या. त्यापैकी काही रहिवाशांनी आणि सुमारे आठ वर्षांपासून एक एक करून मुंबई नाका ते शिवाजीवाडी नासर्डी नदीच्या पात्रात विटा व मातीची भर टाकून घरे बांधण्यात आली. आतापर्यंत सुमारे २५ घरे सर्रासपणे नदीपात्रात बांधण्यात आली आहेत. त्यामुळे नदीचे पात्र कमी झाले आहे. पावसाळ्यात नदी दुतर्फा वाहते तेव्हा या सर्व रहिवाशांना धोका निर्माण होऊन संसार उपयोगी वस्तूंसह जीवितहानी होण्याची शक्यता टाळता येत नाही. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी महापालिका प्रशासनाच्या वतीने फक्त धोक्याची घरे असल्याची नोटीस दिली जाते. परंतु नदीपात्रात असलेली धोक्याची घरे काढण्यासाठी कारवाई का करत नाहीत असा प्रश्न निर्माण होत आहे. जोपर्यंत मोठी दुर्घटना घडत नाही तोपर्यंत कारवाई करायची नाही अशी पद्धत केव्हा बंद होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. (वार्ताहर)