शहरं
Join us  
Trending Stories
1
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
2
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
3
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
4
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
5
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
6
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
7
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
8
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
9
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
10
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
11
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
12
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
13
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
14
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
15
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
16
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
17
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
18
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
19
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धविरामानंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
20
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video

गोदाघाटावर अतिक्रमण

By admin | Updated: February 10, 2017 00:44 IST

कचऱ्याचे साम्राज्य : भिकारी, फेरीवाल्यांचा त्रास, पर्यटकांची नाराजी

नाशिक : एखाद्या शहराला नदीचा काठ लाभणे ही त्या शहराच्या उत्कर्षाचा पाया मानला जातो. नदीमुळेच शहराचा विकास घडून येतो, असे इतिहासातून दिसते. परंतु ज्या नदीमुळे शहराचा विकास झाला त्याच गोदावरीकडे नाशिककरांचे आणि प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष झालेले दिसून येते. गोदाघाटावरील वाढता अतिक्रमणांचा विळखा, कचऱ्याचे साम्राज्य, भिकाऱ्यांचा आणि फेरीवाल्यांचा त्रास यामुळे बाहेर गावाहून येणाऱ्या पर्यटक आणि भाविकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. एकीकडे नाशिक महापालिका निवडणुकीची धामधूम सुरू असताना दुसरीकडे मनपा प्रशासनाचे विकासकामांमुळे अक्षम्य दुर्लक्ष झालेले दिसते. त्यातच शहर स्वच्छतेचा तर बोजबारा उडालेला दिसतो. रस्त्याच्या कडेला ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचलेले दिसतात. विशेषत: गोदाघाटावर घाणीचे साम्राज्य पसरलेले दिसते. रामकुंडाच्या आजूबाजूला फूलविक्रेते आणि प्रसादविके्रत्यांचा गराडा पडलेला असतो. त्यातच खाद्य पदार्थ स्टॉल, हातगाडीवाल्यांचे अतिक्रमण अहल्याबाई होळकर पुलापासून ते गाडगेमहाराज पटांगणापर्यंत सर्वत्र दिसते. गोदाघाटाची गेल्या अनेक दिवसांपासून स्वच्छता झालेली दिसत नाही. याबाबत मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष झालेले असल्याचे नागरिक व भाविकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)