शहरं
Join us  
Trending Stories
1
झोप येत नव्हती म्हणून जागेवरून उठला अन्...; सौदी बस अपघातात एकमेव बचावलेल्या 'शोएब'ची कहाणी
2
आजचे राशीभविष्य - १८ नोव्हेंबर २०२५, या राशीसाठी आर्थिक, सामाजिक आणि कौटुंबिक दृष्टीने आजचा दिवस लाभदायी
3
रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन भारत दौऱ्यावर येण्याआधी मंत्री जयशंकर मॉस्कोत, काय झाली चर्चा?
4
CNG: मुंबई, ठाण्यात गॅसकोंडी, ४५ टक्के रिक्षा-टॅक्सी बंद; सीएनजीच्या तुटवड्याने प्रवाशांचे मोठे हाल!
5
हेट स्पीच: राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी करणारी याचिका, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले
6
saudi arabia: सौदी अरेबियात भीषण अपघात! मक्केहून मदिनेला जाणाऱ्या बसची टँकरला धडक; ४२ भारतीयांचा मृत्यू
7
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
8
Sheikh Hasina: बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मृत्युदंड!
9
रक्षाविसर्जनावेळी मयताचा सावत्र मुलगा आल्याने वाद; दोन गटांत हाणामारी 
10
Reservation: आरक्षण मर्यादा ओलांडू नका; अन्यथा निवडणुका स्थगित करणार, न्यायालयाचा महाराष्ट्र सरकारला इशारा
11
सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
12
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
13
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
14
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
15
थंडी सुरु झाली...! रात्री झोपण्यापूर्वी बेंबीमध्ये या तेलाचे दोन थेंब टाका, मिळतील ७ आरोग्यदायी फायदे...
16
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
17
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
18
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
19
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
20
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

रेमडेसिविरच्या रिकाम्या बाटल्याही जतन कराव्या लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:14 IST

नाशिक : रेमडेसिविर औषधांच्या संदर्भात असलेल्या तक्रारी तसेच गैरप्रकार दूर करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या असून, ...

नाशिक : रेमडेसिविर औषधांच्या संदर्भात असलेल्या तक्रारी तसेच गैरप्रकार दूर करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या असून, त्यानुसार आता रेमडेसिविर वापराबाबतची दररोजची माहिती जिल्हा प्रशासनाला द्यावी लागणार आहे. त्यानुसार आता रेमडेसिविरच्या वापरलेल्या बाटल्यादेखील जतन करून ठेवाव्या लागणार आहेत.

कोविड-१९ आजारावर रेमडेसिविर इंजेक्शनचा वापर केला जात असल्याने वाढत्या रुग्णसंख्येबरोबरच या इंजेक्शनची मागणीदेखील तितकीच वाढली आहे. रुग्णांच्या नातेवाइकांची इंजेक्शन मिळविण्यासाठी धावपळ होत आहे तर औषधांअभावी रुग्णांची परवडदेखील होताना दिसते, अशी एकूणच परिस्थिती असताना रेमडेसिविरचा काळबाजार होत असल्याची बाबदेखील उघड झाल्याने जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्यात आले आहेत. रेमडेसिविर इंजेक्शन पुरवठा व वितरणाची जबाबदारी असलेले तहसीलदार तथा घटना व्यवस्थापक शिवकुमार आवळकंठे यांनी याबाबत रुग्णालयांनी माहिती संकलित करण्यासाठीचा तक्ता तयार केला आहे.

त्यानुसार ज्या रुग्णाला इंजेक्शन वापरले जाणार आहे त्या रुग्णाचे नाव इंजेक्शनवर लिहिणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. इंजेक्शन वितरित होतानाच मार्कर पेनने नाव लिहिले जाणार आहे. भरारी पथक केव्हाही रेमडेसिविरसंदर्भात चौकशी करणार असल्याने रुग्णाला वापरलेल्या इंजेक्शनच्या रिकाम्या बाटल्या रुग्णालयाला जतन करून ठेवाव्या लागणार आहेत. पथकाने मागणी केल्यानंतर या बाटल्या सादर कराव्या लागणार आहेत.

--इन्फो--

रुग्णाच्या गरजेनुसार रेमडेसिविरची मागणी

कोविड रुग्णाला रेमडेसिविर देण्याची गरज असली तरी रुग्णालयात दाखल रुग्णांना त्यांच्या गंभीरतेनुसार इंजेक्शनची उतरत्या क्रमाने मागणी नेांदविण्याची सूचना करण्यात आलेली आहे. त्याबाबतचा तक्ता सकाळी ९ वाजेपर्यंत रेमडेसिविर वितरण व पुरवठा विभागाकडे पाठविण्याची सक्ती करण्यात आलेली आहे. वेळेत प्राप्त झालेल्या मागणीपत्रानुसारच निवासी वैद्यकीय अधिकारी यांच्या शिफारसीनुसार उपलब्ध औषधांच्या प्रमाणात रुग्णालयांना कोटा मंजूर केला जाणार आहे. त्यावर संपूर्णपणे जिल्हा प्रशासनाची नजर असणार आहे.