शहरं
Join us  
Trending Stories
1
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
2
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
3
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
4
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
5
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
6
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
7
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
8
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
9
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
10
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
11
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
12
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
13
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
14
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
16
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
17
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
18
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
19
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
20
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्टÑ दिनी पुन्हा आम आदमीच्या उड्डाणाचा मुहूर्त !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 00:27 IST

नाशिक : गेल्या दीड महिन्यापासून रखडलेली नाशिक-मुंबई विमानसेवा आता महाराष्टÑ दिनी सुरू होण्याचे शुभवर्तमान आहे. कंपनीने संकेतस्थळावरून आॅनलाइन बुकिंगही सुरू केले आहे. तथापि, यापूर्वी वारंवार सेवा सुरू करून पुन्हा ती रद्द करण्याचे प्रकार घडल्याने या सेवेविषयी नागरिकच सांशक आहेत.

ठळक मुद्देएअर डेक्कनची बुकिंग सुरूनागरिक मात्र अद्यापही साशंक

नाशिक : गेल्या दीड महिन्यापासून रखडलेली नाशिक-मुंबई विमानसेवा आता महाराष्टÑ दिनी सुरू होण्याचे शुभवर्तमान आहे. कंपनीने संकेतस्थळावरून आॅनलाइन बुकिंगही सुरू केले आहे. तथापि, यापूर्वी वारंवार सेवा सुरू करून पुन्हा ती रद्द करण्याचे प्रकार घडल्याने या सेवेविषयी नागरिकच सांशक आहेत.केंद्र सरकारच्या उडान योजनेअंतर्गत नाशिक ते मुंबई आणि नाशिक ते पुणे अशा दोन शहरांसाठी एअर डेक्कनने विमानसेवा सुरू केली आहे. परंतु गेल्या डिसेंबर महिन्यापासून ही सेवा रडत खडत सुरू असून, मुंबई नाशिकच्या अनेक फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. नाशिक ते पुणे सेवा मात्र त्या प्रमाणात सुरुळीत असली तरी मुंबई सेवेला मात्र प्रतिसाद मिळत नाही. त्यातच कंपनीने १५ मार्चपासून आठ दिवसांसाठी सेवा बंद ठेवण्याची घोषणा केली. त्यानंतरदेखील एकेक मुहूर्त देणे सुरूच ठेवले परंतु सेवा सुरू झाली नाही. कंपनीने उड्डाणअंतर्गत प्रादेशिक हवाई जोडणीची अनेक मार्गांवर सेवा सुरू करण्याची तयारी केली असल्याने व्यवस्थापनात अडचणी येत असल्याचे सांगण्यात येत आहे. कोल्हापूर तसेच पुणे-जळगाव अशा अन्य मार्गांसाठी सेवा सुरू करण्यासाठी कंपनीकडे प्रशिक्षित वैमानिक नसल्याही प्रकार यादरम्यान चर्चेत आला आणि विमानसेवा स्थगित ठेवण्यात आली होती. आता मात्र ही सेवा महाराष्टÑ दिनी पूर्ववत होण्याची चिन्हे आहेत.कंपनीने संकेतस्थळावर बुकिंग सुरू केले असून, १ पासून बुकिंगसाठी १ हजार ३४९ रुपयांचे भाडे दर्शविले आहे. सुधारित वेळेनुसार म्हणजे सकाळी ६ वाजता ओझरच्या विमानतळावरून विमानोड्डाण होईल आणि ६ वाजून ५० मिनिटांनी ते मुंबईला पोहोचेले असे दाखवले जात आहे. त्यामुळे ही सेवा सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अर्थात, विमानसेवेसाठी आग्रह धरणाºयांना देखील याबाबत खात्री नाही. खासदार हेमंत गोडसे यांनी याबाबत शंका व्यक्त केली आहे. कंपनीने अनेकदा मुहूर्त घोषित केले असल्याने त्यांनी ही शंका ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली आहे.केंद्र सरकारची योजना, मग सुरळीत का नाही?नाशिकच्या विमानतळावरून सेवा सुरू करण्यासाठी अनेकदा प्रयत्न झाल्यानंतरदेखील यापूर्वी ही सेवा सुरू झाली नव्हती. मात्र, केंद्र सरकारने प्रादेशिक हवाई जोडणीसाठी उड्डाण योजना घोषित केली आणि विमान कंपन्यांना नुकसानभरपाई देण्याची तरतूद केली आहे. मात्र असे असेल तर मग योजना सुरळीत का नाही आणि स्पर्धात्मक बोलीतून रुट््स मिळवणाºया कंपन्यांनी दिरंगाई केली तर त्यांच्यावर काय कारवाई केली जाणार? असा प्रश्न केला जात आहे.