शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
2
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
3
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
4
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
5
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
6
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
7
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
8
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
9
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
10
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
11
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
12
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
13
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
14
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
15
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
16
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
17
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
18
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
19
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
20
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा

महाराष्टÑ दिनी पुन्हा आम आदमीच्या उड्डाणाचा मुहूर्त !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 00:27 IST

नाशिक : गेल्या दीड महिन्यापासून रखडलेली नाशिक-मुंबई विमानसेवा आता महाराष्टÑ दिनी सुरू होण्याचे शुभवर्तमान आहे. कंपनीने संकेतस्थळावरून आॅनलाइन बुकिंगही सुरू केले आहे. तथापि, यापूर्वी वारंवार सेवा सुरू करून पुन्हा ती रद्द करण्याचे प्रकार घडल्याने या सेवेविषयी नागरिकच सांशक आहेत.

ठळक मुद्देएअर डेक्कनची बुकिंग सुरूनागरिक मात्र अद्यापही साशंक

नाशिक : गेल्या दीड महिन्यापासून रखडलेली नाशिक-मुंबई विमानसेवा आता महाराष्टÑ दिनी सुरू होण्याचे शुभवर्तमान आहे. कंपनीने संकेतस्थळावरून आॅनलाइन बुकिंगही सुरू केले आहे. तथापि, यापूर्वी वारंवार सेवा सुरू करून पुन्हा ती रद्द करण्याचे प्रकार घडल्याने या सेवेविषयी नागरिकच सांशक आहेत.केंद्र सरकारच्या उडान योजनेअंतर्गत नाशिक ते मुंबई आणि नाशिक ते पुणे अशा दोन शहरांसाठी एअर डेक्कनने विमानसेवा सुरू केली आहे. परंतु गेल्या डिसेंबर महिन्यापासून ही सेवा रडत खडत सुरू असून, मुंबई नाशिकच्या अनेक फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. नाशिक ते पुणे सेवा मात्र त्या प्रमाणात सुरुळीत असली तरी मुंबई सेवेला मात्र प्रतिसाद मिळत नाही. त्यातच कंपनीने १५ मार्चपासून आठ दिवसांसाठी सेवा बंद ठेवण्याची घोषणा केली. त्यानंतरदेखील एकेक मुहूर्त देणे सुरूच ठेवले परंतु सेवा सुरू झाली नाही. कंपनीने उड्डाणअंतर्गत प्रादेशिक हवाई जोडणीची अनेक मार्गांवर सेवा सुरू करण्याची तयारी केली असल्याने व्यवस्थापनात अडचणी येत असल्याचे सांगण्यात येत आहे. कोल्हापूर तसेच पुणे-जळगाव अशा अन्य मार्गांसाठी सेवा सुरू करण्यासाठी कंपनीकडे प्रशिक्षित वैमानिक नसल्याही प्रकार यादरम्यान चर्चेत आला आणि विमानसेवा स्थगित ठेवण्यात आली होती. आता मात्र ही सेवा महाराष्टÑ दिनी पूर्ववत होण्याची चिन्हे आहेत.कंपनीने संकेतस्थळावर बुकिंग सुरू केले असून, १ पासून बुकिंगसाठी १ हजार ३४९ रुपयांचे भाडे दर्शविले आहे. सुधारित वेळेनुसार म्हणजे सकाळी ६ वाजता ओझरच्या विमानतळावरून विमानोड्डाण होईल आणि ६ वाजून ५० मिनिटांनी ते मुंबईला पोहोचेले असे दाखवले जात आहे. त्यामुळे ही सेवा सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अर्थात, विमानसेवेसाठी आग्रह धरणाºयांना देखील याबाबत खात्री नाही. खासदार हेमंत गोडसे यांनी याबाबत शंका व्यक्त केली आहे. कंपनीने अनेकदा मुहूर्त घोषित केले असल्याने त्यांनी ही शंका ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली आहे.केंद्र सरकारची योजना, मग सुरळीत का नाही?नाशिकच्या विमानतळावरून सेवा सुरू करण्यासाठी अनेकदा प्रयत्न झाल्यानंतरदेखील यापूर्वी ही सेवा सुरू झाली नव्हती. मात्र, केंद्र सरकारने प्रादेशिक हवाई जोडणीसाठी उड्डाण योजना घोषित केली आणि विमान कंपन्यांना नुकसानभरपाई देण्याची तरतूद केली आहे. मात्र असे असेल तर मग योजना सुरळीत का नाही आणि स्पर्धात्मक बोलीतून रुट््स मिळवणाºया कंपन्यांनी दिरंगाई केली तर त्यांच्यावर काय कारवाई केली जाणार? असा प्रश्न केला जात आहे.