शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

विविध योजनांच्या माध्यमातून शेती व्यवसायाचे सबलीकरण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:19 IST

एस.आर. शिंदे /लोकमत न्यूज नेटवर्क पेठ - तालुका हा नाशिक जिल्ह्याच्या पश्चिमेस असलेला आदिवासीबहुल तालुका असून, सह्याद्री पर्वत उपरांगांमध्ये ...

एस.आर. शिंदे /लोकमत न्यूज नेटवर्क

पेठ - तालुका हा नाशिक जिल्ह्याच्या पश्चिमेस असलेला आदिवासीबहुल तालुका असून, सह्याद्री पर्वत उपरांगांमध्ये दुर्गम व डोंगराळ भागात वसलेला आहे. तालुक्यात खरीप हंगामात प्रामुख्याने भात, नागली, वरई ही पारंपरिक पिके घेतली जातात, तर रबी हंगामात पाण्याच्या उपलब्धतेनुसार गहू व हरभरा ही पिके घेतली जातात. जास्त पर्जन्यमान सरासरी दोन हजार मिमी असल्यामुळे भात हे तालुक्यातील महत्त्वाचे प्रमुख पूक असून शेतीचे अर्थकारण याच पिकावर प्रामुख्याने अवलंबून आहे. तालुक्यातलील ९० टक्के क्षेत्र जिरायत असून शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. वहितीलायक एकूण २६ हजार हेक्टर क्षेत्रापैकी १२ हजार हेक्टर (सुमारे ४६ टक्के) क्षेत्रावर भात हे पीक घेतले जाते. भाताखालोखाल नागली (५.५० हजार हेक्टर), वरई (२ हजार हेक्टर), कडधान्य (३ हजार हेक्टर) व गळीतधान्य (२ हजार हेक्टर) क्षेत्रावर घेतली जातात. बदलत्या काळात शेतीपासून अधिकाधिक उत्पन्न घेताना शेतकरी नवनवीन पर्याय शोधत असून, त्यासाठी कृषी विभागामार्फत विशेष प्रयत्न केले जात आहेत. भाजीपाला पिकांमध्ये टोमॅटो व भोपळा पिकांची लागवड तालुक्यात वाढत असल्याचे दिसून येत आहे, तर फळपिकांमध्ये आंबा लागवडीकडे शेतकऱ्यांचा विशेष कल दिसून येत आहे.

पेठ तालुक्यात शेतमाल विक्रीसाठी बाजार समिती आवार उपलब्ध नाही. भात, नागली व इतर पिकांची शेतकऱ्यांमार्फत स्थानिक बाजारात विक्री केली जाते, त्याचप्रमाणे आदिवासी विकास महामंडळामार्फत शासकीय दराने शेतमाल खरेदी केला जातो. पेठ तालुक्यासाठी भाजीपाला विक्री मुख्यत: गुजरात राज्यातील जवळच्या बाजारात केली जाते, तर आंबा व इतर फळ पिकांची विक्री नाशिक बाजारात केली जाते.

---------------------

पीक प्रात्यक्षिक

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान योजनेंतर्गत तालुक्यात भात पिकाचे 40 हेक्टर क्षेत्रावर, तर नागली पिकाचे 300 हेक्टर क्षेत्रावर पीक प्रात्यक्षिके घेण्यात येत आहेत. सदर प्रात्यक्षिकासाठी ३४ गावांतील ८५० शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे व प्रति शेतकरी ०.४० हेक्टर क्षेत्रावर सुधारित बियाणे वापर, बीजप्रक्रिया, एकात्मिक कीड-रोग व्यवस्थापन, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन या बाबी राबविण्यात येत आहेत.

---------------------------

पेठ तालुक्यात यावर्षी खरीप हंगामाच्या प्रारंभी काही काळ पावसाने दडी मारली असली तरी नंतरच्या काळात सातत्य राखल्याने सरासरीपर्यंत पर्जन्यमान गेले आहे. भात व इतर पिकांच्या योग्य वाढीसाठी शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या संपर्कात राहून योग्य मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे. दोन-तीन दिवसांपासून मुसळधार पावसाने पिकांचे नुकसान झाले असल्यास कृषी सहायक किंवा पीक विमा प्रतिनिधी यांच्याशी संपर्क साधावा.

-अरविंद पगारे, तालुका कृषी अधिकारी पेठ (१५ पेठ खबरबात)

150921\15nsk_4_15092021_13.jpg

१५ पेठ खबरबात