शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

समितीच्या दौऱ्याने कर्मचाऱ्यांच्या बदल्या थांबल्या

By admin | Updated: June 23, 2017 17:24 IST

आदिवासी विकास विभागाने गेल्या वर्षीही कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : अनुसूचित जमाती कल्याण समिती पुढच्या आठवड्यात नाशिक दौऱ्यावर येत असल्यामुळे आदिवासी विकास विभागाने चालू वर्षी बदल्या झालेल्या कर्मचाऱ्यांना सोडण्यास नकार दिला असून, त्यामुळे अनेक ठिकाणी कामकाजावर परिणाम जाणवू लागला आहे. आदिवासी विकास विभागाने गेल्या वर्षीही कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या, परंतु कर्मचाऱ्यांना त्यांच्या बदलीच्या जागी सोडण्यापूर्वीच अनूसूचित जमाती कल्याण समितीचा दौरा जाहीर झाल्यामुळे व समितीचे मुख्य काम आदिवासी विकास विभागाशीच निगडित असल्यामुळे कर्मचाऱ्यांना बदलीच्या ठिकाणी सोडण्यात आले नाही. समितीचा दौरा रद्द झाल्यानंतर या कर्मचाऱ्यांनी बदलीसाठी लकडा लावला, विशेषत: गैरसोय होणाऱ्या शिक्षकांनी आंदोलनही केले परंतु तोपर्र्यंत सहा महिन्यांचा कालावधी उलटून गेला. त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या बदल्या गैरलागू ठरल्या होत्या. यंदा मे महिन्यात बदल्या करण्यात आल्या, परंतु पुन्हा समितीचा दौरा लागल्यामुळे आदिवासी विकास विभागाने बदल्या झालेल्या कर्मचाऱ्यांना न सोडण्याची भूमिका घेतली आहे. त्यात लिपिक, गृहपाल, शिक्षकांचा समावेश आहे.