शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
3
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
4
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
5
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
6
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
7
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
8
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
9
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
10
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
11
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
12
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
13
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
14
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
15
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
16
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
17
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
18
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
19
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
20
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले

समितीच्या दौऱ्याने कर्मचाऱ्यांच्या बदल्या थांबल्या

By admin | Updated: June 23, 2017 17:24 IST

आदिवासी विकास विभागाने गेल्या वर्षीही कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : अनुसूचित जमाती कल्याण समिती पुढच्या आठवड्यात नाशिक दौऱ्यावर येत असल्यामुळे आदिवासी विकास विभागाने चालू वर्षी बदल्या झालेल्या कर्मचाऱ्यांना सोडण्यास नकार दिला असून, त्यामुळे अनेक ठिकाणी कामकाजावर परिणाम जाणवू लागला आहे. आदिवासी विकास विभागाने गेल्या वर्षीही कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या, परंतु कर्मचाऱ्यांना त्यांच्या बदलीच्या जागी सोडण्यापूर्वीच अनूसूचित जमाती कल्याण समितीचा दौरा जाहीर झाल्यामुळे व समितीचे मुख्य काम आदिवासी विकास विभागाशीच निगडित असल्यामुळे कर्मचाऱ्यांना बदलीच्या ठिकाणी सोडण्यात आले नाही. समितीचा दौरा रद्द झाल्यानंतर या कर्मचाऱ्यांनी बदलीसाठी लकडा लावला, विशेषत: गैरसोय होणाऱ्या शिक्षकांनी आंदोलनही केले परंतु तोपर्र्यंत सहा महिन्यांचा कालावधी उलटून गेला. त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या बदल्या गैरलागू ठरल्या होत्या. यंदा मे महिन्यात बदल्या करण्यात आल्या, परंतु पुन्हा समितीचा दौरा लागल्यामुळे आदिवासी विकास विभागाने बदल्या झालेल्या कर्मचाऱ्यांना न सोडण्याची भूमिका घेतली आहे. त्यात लिपिक, गृहपाल, शिक्षकांचा समावेश आहे.