शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

आयुर्विमा महामंडळातील कर्मचारी, अधिकाऱ्यांचा संप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 01:36 IST

नाशिक : केंद्र सरकारने देशातील कोट्यवधी विमाधारकांच्या विरोधाला न जुमानता आयुर्विमा महामंडळातील निर्गुंतवणुकीसंबंधीचे विधेयक लोकसभेमध्ये मांडले असून त्यामुळे आयुर्विमा महामंडळाची खासगीकरणाच्या दिशेने वाटचाल सुरू करण्यात आलेली आहे. तसेच विमा क्षेत्रात थेट परकीय गुंतवणुकीची मर्यादा ४९ टक्क्यांवरून ७४ टक्के करण्यासंबंधीचे विधेयकही राज्यसभेमध्ये मांडलेले आहे. ही दोन्ही विधेयके देशातील कोट्यवधी विमाधारकांची गुंतवणूक व त्यांचे भवितव्य असुरक्षित करणारे असल्याचा आरोप करीत सरकारच्या या धोरणास विरोध करीत आयुर्विमा महामंडळातील कर्मचारी व अधिकाऱ्यांनी गुरुवारी (दि. १८) संप पुकारत सर्व कामकाज बंद ठेवत शहरातील एलआयसी कार्यालयांमध्ये सरकारविरोधात घोषणाबाजी केली.

ठळक मुद्देघोषणाबाजी : निर्गुंतवणुकीकरण विमाधारकांसह अर्थव्यवस्थेलाही घातक असल्याची भूमिका

नाशिक : केंद्र सरकारने देशातील कोट्यवधी विमाधारकांच्या विरोधाला न जुमानता आयुर्विमा महामंडळातील निर्गुंतवणुकीसंबंधीचे विधेयक लोकसभेमध्ये मांडले असून त्यामुळे आयुर्विमा महामंडळाची खासगीकरणाच्या दिशेने वाटचाल सुरू करण्यात आलेली आहे. तसेच विमा क्षेत्रात थेट परकीय गुंतवणुकीची मर्यादा ४९ टक्क्यांवरून ७४ टक्के करण्यासंबंधीचे विधेयकही राज्यसभेमध्ये मांडलेले आहे. ही दोन्ही विधेयके देशातील कोट्यवधी विमाधारकांची गुंतवणूक व त्यांचे भवितव्य असुरक्षित करणारे असल्याचा आरोप करीत सरकारच्या या धोरणास विरोध करीत आयुर्विमा महामंडळातील कर्मचारी व अधिकाऱ्यांनी गुरुवारी (दि. १८) संप पुकारत सर्व कामकाज बंद ठेवत शहरातील एलआयसी कार्यालयांमध्ये सरकारविरोधात घोषणाबाजी केली.सरकारच्या या जनहितविरोधी धोरणाच्या विरुद्ध आयुर्विमा मंडळातील कर्मचारी व अधिकाऱ्यांनी हा देशव्यापी संप पुकारला आहे. या संपात वर्ग एक अधिकारी फेडरेशन,नॅशनल फेडरेशन ऑफ वर्कर्स ऑफ इंडिया तसेच विमा कर्मचारी संघटना,नाशिक या संघटनांचे कर्मचारी तथा अधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवत सर्व कामकाज पूर्णपणे बंद ठेवले. रिझर्व्ह बँकेने बँकांना त्यांच्या विमा कंपन्यांमधील हिस्सा कमाल तीस टक्क्यांवर आणण्याचे निर्देश दिलेले आहेत. याचा विचार करता विमा क्षेत्रात थेट परकीय गुंतवणुकीची मर्यादा ४९ टक्क्यांवरून ७४ टक्के केल्यास देशातील अशा विमा कंपन्यांवर मालकी, नियंत्रण व व्यवस्थापन परकीय विमा कंपन्यांचे निर्माण होऊन देशी विमा कंपन्यांकडून विमा घेतलेले लाखो विमाधारक त्यांची इच्छा असो वा नसो, ते आपोआप विदेशी विमा कंपन्यांचे विमाधारक होणार असल्याचा धोका यावेळी कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या प्रतिनिधींनी व्यक्त करतानाच देशातील कोट्यवधी विमाधारकांची गुंतवणूक व त्यांचे भवितव्य असुरक्षित करणाऱ्या आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला घातक अशा दोन्ही विधेयकांना तसेच सरकारच्या या अन्यायकारक धोरणाला सर्वस्तरातून विरोध करण्याचे आवाहन यावेळी नाशिक विमा कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष ॲड कांतिलाल तातेड यांनी केले. याप्रसंगी विमा कर्मचारी संघटनेचे अनिरुद्ध देशपांडे, वर्ग एक अधिकारी फेडरेशनचे जितेंद्र भाटिया, नरेंद्र नागराज , सुदाम मस्के आदी उपस्थित होते.सरकारच्या विधेयकामुळे 'आयुर्विमा महामंडळा'चे रूपांतर 'कंपनी'मध्ये केले जाणार आहे. त्यामुळे विमाधारकांना सध्या प्राप्त असलेले घटनात्मक अधिकार संपुष्टात येणार असून हे धोरण देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करणारे आहे. विम्यामधील दीर्घकालीन गुंतवणूक असुरक्षित होणार आहे.-ॲड. कांतिलाल तातेड, अध्यक्ष विमा कर्मचारी संघटना ,नाशिक.

टॅग्स :LIC - Life Insurance CorporationएलआयसीStrikeसंप