शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

बससेवेसंदर्भात आज तातडीची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2020 00:21 IST

राज्यातील सत्तांतरानंतर महापालिकेच्या बससेवेबाबत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी निर्माण केलेले प्रश्नचिन्ह आणि त्यानंतर महापालिकेने व्यक्त केलेली कायदेशीर अडचण या पार्श्वभूमीवर सर्व गटनेत्यांना विषयाची माहिती कळावी आणि विश्वासात घेऊन कामकाज करता यावे यासाठी महापौर सतीश कुलकर्णी यांनी मंगळवारी (दि.२८) तातडीने सर्व गटनेत्यांची बैठक बोलविली आहे.

ठळक मुद्देमहापौरांचा पुढाकार : सर्वांना विश्वासात घेऊन कामकाज

नाशिक : राज्यातील सत्तांतरानंतर महापालिकेच्या बससेवेबाबत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी निर्माण केलेले प्रश्नचिन्ह आणि त्यानंतर महापालिकेने व्यक्त केलेली कायदेशीर अडचण या पार्श्वभूमीवर सर्व गटनेत्यांना विषयाची माहिती कळावी आणि विश्वासात घेऊन कामकाज करता यावे यासाठी महापौर सतीश कुलकर्णी यांनी मंगळवारी (दि.२८) तातडीने सर्व गटनेत्यांची बैठक बोलविली आहे.महापालिकेच्या स्थापनेनंतर १९९६-९७ मध्ये केवळ बससेवा सुरू करण्याची तयारी केली होती. ती त्यावेळी कॉँग्रेस पक्षातील वादामुळे रद्द झाली असली तरी त्यानंतर आजपर्यंत तब्बल सहा वेळा नाकारण्यात आलेली बससेवा गेल्या भाजप-शिवसेना सरकारने महापालिकेच्या गळ्यात मारली. महापालिकेत आणि राज्यात याच पक्षाची सत्ता असल्याने हा विषय किरकोळ विरोध वगळता मंजूर झाला. त्यानंतर महापालिकेने बससेवेसाठी नाशिक महानगर परिवहन महामंडळ अशी कंपनी स्थापन केली असून बससेवा चालविण्यास देण्यासाठी निविदा मागवल्या त्यानुसार आलेल्या कंपनीच्या निविदांना मंजुरी देण्यात आली. फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात प्रत्यक्ष बससेवा सुरू होणार असतानाच राज्यात सत्तांतर झाले आणि पालकमंत्री छगन भुजबळ यांनी बससेवेबाबत प्रश्न निर्माण केले. गेल्या आठवड्यात यासंदर्भात नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री छगन भुजबळ यांनी बैठक बोलावली होती. त्यावेळी महापालिकेने तोट्यातील ही सेवा सुरू करण्यास भुजबळ यांनी विरोध केला तर ही सेवा सुरू करण्यासाठी सर्व प्रकारचे सोपस्कार पूर्ण झाले असून आता ही सेवा सुरू न झाल्यास ठेकेदाराला ८० टक्के भरपाई द्यावी लागेल, असे महापौर सतीश कुलकर्णी यांनी स्पष्ट केले. तर पालकमंत्र्यांनी यावर महापालिकेने आर्थिक श्वेतपत्रिका काढावी, अशी सूचना केली आहे.या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महापौर सतीश कुलकर्णी आणि आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी मंगळवारी (दि.२८) तातडीने गटनेत्यांची बैठक बोलावली आहे. सद्य स्थिती गटनेत्यांना सांगून त्यांना विश्वासात घेऊनच कामकाज करण्यात येणार आहे.महापालिकेने बससेवेची तयारी केली असून काही राजकीय पक्षांचा तात्त्विक विरोध आहे. तथापि, महापालिकेत भाजपची सत्ता असल्याने विरोध करून उपयोग झाला नव्हता. आता भुजबळ म्हणजे महाविकास आघाडीच्या नेत्यांनीच विरोध केल्याने याबाबत काय निर्णय होतो, याकडे महापालिकेचे लक्ष लागून आहे.

टॅग्स :nmmcनवी मुंबई महापालिका