शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

विकासासाठी तातडीच्या उपाययोजना महत्त्वाच्या

By admin | Updated: June 24, 2014 00:29 IST

विकासासाठी तातडीच्या उपाययोजना महत्त्वाच्या

 

नाशिक : देशाचा आर्थिक विकास हा शेती, उद्योग, सेवाक्षेत्र व पायाभूत सुविधा यांवर अवलंबून असतो़ जागतिक मंदी व घसरता आर्थिक दर याचे नवीन सरकारला आव्हान आहे़ परंतु आर्थिक धोरणे व तातडीच्या उपाययोजनांद्वारे शाश्वत विकास साध्य करणे नवीन शासनाला शक्य असल्याचे मत अर्थतज्ज्ञ डॉ़ विनायक गोविलकर यांनी येथे केले़ गंगापूर रोडवरील शंकराचार्य संकुल येथे जेसीआय नाशिक संस्थेच्या वतीने आयोजित ‘मोदी सरकार आणि आर्थिक धोरणे’ या विषयावर ते बोलत होते़ डॉ़ गोविलकर म्हणाले, आपल्या राष्ट्रीय उत्पन्नात ५५ टक्के वाटा सेवा क्षेत्राचा आहे़ परंतु शेती व उद्योगांचा विकास व पायाभूत सुविधांची निर्मिती याशिवाय सेवा क्षेत्र काहीच करू शकत नाही़ नव्या सरकारला यावरच भर द्यावा लागेल़ आर्थिक दराच्या बाबतीत गेल्या पंचवार्षिकपेक्षा हा दर घसरला आहे़ २००६ मध्ये साडेआठ टक्के असलेला विकासदर साडेचार टक्क्यांवर आला आहे़ रोजगारविरहित विकास यामुळे वाढती बेरोजगारी, महागाईचा दर मागील तुलनेत खाली आला असला तरी सर्वसामान्यांना त्याचा लाभ होत नाही़ परदेशी गुंतवणूक वाढली; परंतु देशाच्या उत्पन्नात त्याची भर पडत नाही़ वसूल न होणाऱ्या कर्जांचा बोजा वाढत असल्याने बँका डबघाईला येत आहेत़ ही प्रमुख आव्हाने नव्या शासनापुढे आहेत़ देशातील कोट्यवधीच्या योजना राबविणारे नियोजन मंडळ संसदेच्या निर्णयाला बंधनकारक असावे आदि महत्त्वपूर्ण बाबींचा आढावा गोविलकर यांनी घेतला़ तसेच श्रोत्यांच्या शंकांचे समाधान केले़ जेसीआयचे अध्यक्ष समीर केदारे यांनी आभार मानले़ (प्रतिनिधी)