शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
2
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
3
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'
4
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
5
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
6
शेवटच्या श्रावण गुरुवारी गुरुपुष्यामृत योग २०२५: सोने खरेदीसाठी शुभ वेळ काय? पाहा, मान्यता
7
Mumbai Rain Updates Live: मुंबईला उद्याही अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन!
8
शेवटचा श्रावण बुधवार: प्रदोष व्रतासह बुध पूजन; ‘अशी’ करा महादेवांची सेवा, शुभ-मंगल होईल!
9
सलग दुसऱ्या दिवशी बाजारात तेजी! रिलायन्स-टाटासह 'या' शेअर्स ठरले हिरो; कुठे झाली घसरण?
10
"तेजस्विनीचा रात्री ११ वाजता फोन आला अन्...", सुचित्रा बांदेकरांनी सांगितलं नक्की काय घडलं?
11
Mumbai Rains: मुंबईत अतिवृष्टीचा धोका; पालकमंत्री लोढांकडून आपत्ती विभागाला सज्ज राहण्याचे निर्देश
12
Thane Rain: कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ
13
व्लादिमीर पुतिन यांची ऑफर लीक झाली, डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचा प्लान जगाला सांगितला
14
४४ रुपयांच्या स्मॉलकॅप स्टॉकमध्ये तेजी; ५ वर्षात दिला ४०,०००% रिटर्न, FII नं वाढवला हिस्सा
15
नाथपंथीय दीक्षा, माऊलींची परंपरा, स्वामीकृपा; ‘सोऽहम’मंत्र देणारे पावसचे स्वामी स्वरुपानंद
16
विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या नेत्याचे निलंबन भाजपकडून रद्द, राणेंची डोकेदुखी वाढणार?
17
गणेश चतुर्थी २०२५: बाप्पाच्या आगमनाला उरले ८ दिवस, घराबाहेर काढा 'या' वस्तू; ज्यामुळे राहू केतू करतात अमंगल!
18
अनोखा विक्रम! फक्त एका दिवसात १८ लाखांहून अधिक महिलांचा बसमधून मोफत प्रवास
19
मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आहे महाराष्ट्राचं 'मिनी काश्मीर'! तुम्ही कधी फिरायला गेलात का?
20
नोकरी खाजगी, पैसा सरकारी! पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजनेचं पोर्टल सुरू, किती मिळणार पैसे?

विकासासाठी तातडीच्या उपाययोजना महत्त्वाच्या

By admin | Updated: June 24, 2014 00:29 IST

विकासासाठी तातडीच्या उपाययोजना महत्त्वाच्या

 

नाशिक : देशाचा आर्थिक विकास हा शेती, उद्योग, सेवाक्षेत्र व पायाभूत सुविधा यांवर अवलंबून असतो़ जागतिक मंदी व घसरता आर्थिक दर याचे नवीन सरकारला आव्हान आहे़ परंतु आर्थिक धोरणे व तातडीच्या उपाययोजनांद्वारे शाश्वत विकास साध्य करणे नवीन शासनाला शक्य असल्याचे मत अर्थतज्ज्ञ डॉ़ विनायक गोविलकर यांनी येथे केले़ गंगापूर रोडवरील शंकराचार्य संकुल येथे जेसीआय नाशिक संस्थेच्या वतीने आयोजित ‘मोदी सरकार आणि आर्थिक धोरणे’ या विषयावर ते बोलत होते़ डॉ़ गोविलकर म्हणाले, आपल्या राष्ट्रीय उत्पन्नात ५५ टक्के वाटा सेवा क्षेत्राचा आहे़ परंतु शेती व उद्योगांचा विकास व पायाभूत सुविधांची निर्मिती याशिवाय सेवा क्षेत्र काहीच करू शकत नाही़ नव्या सरकारला यावरच भर द्यावा लागेल़ आर्थिक दराच्या बाबतीत गेल्या पंचवार्षिकपेक्षा हा दर घसरला आहे़ २००६ मध्ये साडेआठ टक्के असलेला विकासदर साडेचार टक्क्यांवर आला आहे़ रोजगारविरहित विकास यामुळे वाढती बेरोजगारी, महागाईचा दर मागील तुलनेत खाली आला असला तरी सर्वसामान्यांना त्याचा लाभ होत नाही़ परदेशी गुंतवणूक वाढली; परंतु देशाच्या उत्पन्नात त्याची भर पडत नाही़ वसूल न होणाऱ्या कर्जांचा बोजा वाढत असल्याने बँका डबघाईला येत आहेत़ ही प्रमुख आव्हाने नव्या शासनापुढे आहेत़ देशातील कोट्यवधीच्या योजना राबविणारे नियोजन मंडळ संसदेच्या निर्णयाला बंधनकारक असावे आदि महत्त्वपूर्ण बाबींचा आढावा गोविलकर यांनी घेतला़ तसेच श्रोत्यांच्या शंकांचे समाधान केले़ जेसीआयचे अध्यक्ष समीर केदारे यांनी आभार मानले़ (प्रतिनिधी)