शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
2
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
3
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
4
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
5
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
6
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
7
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
8
Operation Sindoor Live Updates: शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक
9
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
10
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
11
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
12
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
13
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
14
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
15
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
16
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
17
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
18
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
19
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
20
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य

शहरात तातडीचे भारनियमन सुरू

By admin | Updated: June 3, 2014 02:21 IST

नाशिक : राज्यातील अनेक वीजनिर्मिती केंद्रांमध्ये अचानक तांत्रिक बिघाड उद्भवल्याने राज्याच्या विजेत सुमारे तीन हजार मेगावॉटची तूट निर्माण झाल्यामुळे सर्वत्र तातडीचे भारनियमन लागू करण्यात आले आहे.

नाशिक : राज्यातील अनेक वीजनिर्मिती केंद्रांमध्ये अचानक तांत्रिक बिघाड उद्भवल्याने राज्याच्या विजेत सुमारे तीन हजार मेगावॉटची तूट निर्माण झाल्यामुळे सर्वत्र तातडीचे भारनियमन लागू करण्यात आले आहे. त्यामुळे शहरातही तातडीचे भारनियमन करण्यात आल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला. उद्या सायंकाळपर्यंत वीजनिर्मिती पूर्ववत होण्याची शक्यता असल्याने उद्या म्हणजे सोमवारीही शहरात भारनियमन केले जाणार आहे. शहरातील ‘ए’ ते ‘डी’ पर्यंतच्या सर्व ग्राहकांना या भारनियमनाचा फटका बसला. दरम्यान, सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास परळी आणि इंडिया बुल्स वीजनिर्मिती केंद्रातील वीजनिर्मिती सुरळीत झाल्याने काहीअंशी दिलासा मिळाला आहे. राज्यात उष्णतेची लाट असताना, अचानक वीजनिर्मिती केंद्रेही बंद पडल्यामुळे राज्यभर तातडीचे भारनियमन करावे लागले. एकदम तीन हजार मेगावॉट विजेचा तुटवडा झाल्यामुळे मोठी बिकट परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे राज्यभर तातडीचे भारनियमन करण्याचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार नाशिक शहरातही दुपारच्या सुमारास सक्तीचे भारनियमन करण्यात आले. दुपारी बारा वाजेनंतरही भारनियमन करण्यात आले. शहरातील सुमारे ९० टक्के भाग हा ‘ए’ गटात मोडत असल्याने शहरात सुमारे तीन तास पंधरा मिनिटे इतके भारनियमन करावे लागले. अचानक वीज गायब झाल्याने नेमके काय झाले याविषयी नागरिकांना कोणतीही माहिती नसल्याने त्यांनी याबाबत कॉल सेंटरकडे विचारणा केली; मात्र त्यांनाही याची पुरेसी माहिती नसल्याने गोंधळात अधिकच भर पडली. इतक्या मोठ्या प्रमाणात विजेचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे नाशिक शहरात ‘ए’ ते ‘डी’ पर्यंतच्या ग्रुपमध्ये भारनियमन करण्यात आले. ग्रुप ‘बी’मध्ये तब्बल चार तास भारनियमन करण्यात आले. ग्रुप ‘सी’मध्ये चार तास ४५ मिनिटे, तर ग्रुप ‘डी’ मध्ये सुमारे साडेपाच तास इतक्या मोठ्या प्रमाणात भारनियमन करावे लागले. अद्यापही वीजनिर्मितीला अडचणी येत असल्याने उद्या सायंकाळपर्यंत शहरात भारनियमन होण्याची शक्यता महावितरणने वर्तविली आहे. दरम्यान, सायंकाळी परळी येथून २१०, तर इंडिया बुल्स येथून २४५ मेगावॉट विजेचे उत्पादन पूर्ववत झाले. दरम्यान, विजेची तूट मोठ्या प्रमाणात असल्याने राज्य सरकारने केंद्रीय ग्रीडमधून १००० मेगावॉट वीज घेण्याचा निर्णय घेतला आहे. (प्रतिनिधी)