शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

जलयुक्तच्या निकषांवर आमदार नाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 00:54 IST

जलयुक्तच्या निकषांवर आमदार नाराज

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत बुधवारी जिल्ह्णातील आमदारांनी जलयुक्त शिवार योजनेचे निकष बदलण्याची जोरदार मागणी केली. ज्या गावांमध्ये जलयुक्त शिवार योजनांच्या कामांवर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले, त्याच गावांना उन्हाळ्यात पाणीटंचाई भासल्यामुळे केलेला खर्च वाया गेला असून, अलीकडेच या योजनेसाठी नव्याने काढण्यात आलेला आदेशही बदलण्यात यावा, अशा सूचनाही त्यांनी केल्या. नियोजन समितीच्या बैठकीत आमदार नरहरी झिरवाळ, जिवा पांडू गावित, निर्मला गावित यांनी हा मुद्दा उपस्थित केला. झिरवाळ यांनी जलयुक्त शिवार योजनेसाठी गावांची निवड केली जाते परंतु नाशिक जिल्ह्णातील पेठ, सुरगाणा, त्र्यंबक, इगतपुरी, दिंडोरी व कळवण या भागांची एकूणच भौगोलिक परिस्थिती पाहता याठिकाणी सिमेंटचे बंधारे बांधण्याजोगी भौगोलिक परिस्थिती नाही, त्यामुळे तेथे माती बंधारे योग्य आहेत परंतु अशा प्रकारची कामे करण्यास अधिकारी उत्सुक नाहीत. जलयुक्त शिवार योजनेची कामे सीएसआरमधून केली जातात, त्यासाठी निधीही खर्च केला जातो; मात्र त्याचा फारसा उपयोग होत नाही. या कामांसाठी स्थानिक लोकप्रतिनिधींचे मत विचारात घेतल्यास त्याचा उपयोग होईल, असे सांगितले. आमदार निर्मला गावित यांनी जलयुक्तच्या निकषांमुळे आदिवासी भागातील गावे, पाड्यांंवर कामे होत नाही.गेल्या वर्षात त्र्यंबकेश्वर व इगतपुरी तालुक्यात काय कामे झाली याची माहिती अद्यापही आपल्याला दिली गेली नसल्याची तक्रार केली. जलयुक्त शिवार योजनेचे निकष बदलावेत यासाठी येत्या पावसाळी अधिवेशनात मागणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार जिवा पांडू गावित यांनी, जिल्ह्णातील पश्चिम भाग खडकाळ व चढउताराचा असल्यामुळे या ठिकाणी जलयुक्तची कामे करूनही उपयोग नाही. जलयुक्तमध्ये एरिया ट्रीटमेंटला अधिक महत्त्व देण्यात आले असून, राज्यातील सपाट भूभागाचा विचार करून या योजनेचे निकष ठरविण्यात आले आहेत; मात्र जे भाग डोंगराळ व चढउताराचे आहेत तेथे ही योजना कशी राबविणार? असा सवाल त्यांनी केला. नाशिकचे तत्कालीन विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी अलीकडेच २३ जून रोजी जलयुक्त शिवार योजनेबाबत नवीन आदेश काढला आहे. त्या आदेशातील निकष व नियम पाहता आदिवासी भागात एकही काम होऊ शकणार नाही, त्यामुळे हा आदेश बदलण्यात यावा अशी मागणी केली. ज्या गावांमध्ये कामे केली तेथेच टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.