शहरं
Join us  
Trending Stories
1
"चिंदबरम यांनी जो कायदा आणला, त्याला मी विरोध केला, मात्र..."; शरद पवारांनी सांगितली आठवण
2
व्हाईट हाऊसचे सल्लागार बनले २ जिहादी; एक लश्कर ए तोयबा तर दुसरा अल कायदाशी लिंक
3
ही गुंडगिरी संपुष्टात आणण्यासाठी मीच पुढाकार घेणार; मनोज जरांगेंनी घेतली शिवराज दिवटेची भेट
4
मुकेश अंबानींचा नवा डाव! आता ऑनलाइन मार्केटमध्ये घालणार धुमाकूळ, झेप्टो-ब्लिंकिटला थेट टक्कर
5
धक्कादायक खुलासा! ISI अधिकाऱ्यांच्या संपर्कात होती ज्योती, गुप्तचर नेटवर्क चालवतोय पाकिस्तान
6
पाकिस्तानच्या अडचणी वाढणार! कर्ज दिल्यानंतर IMFने दिला इशारा; ११ अटींचे पालनही बंधनकारक
7
भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी आता केवळ या दोन नावांची चर्चा, तर्कवितर्कांना उधाण, कधी होणार घोषणा  
8
केवळ ठाकरे गटाला नाही, मनसेलाही धक्का; दादरा नगर हवेलीसह ७ ठिकाणचे पदाधिकारी शिंदेसेनेत
9
“‘नरकातला स्वर्ग’चे श्रेय स्वप्ना पाटकरांना, संजय राऊत देशसेवेसाठी तुरुंगात गेले नव्हते”
10
ऑटो जगतात खळबळ! निस्सान भारतासह जगभरातील प्रकल्प बंद करण्याच्या तयारीत; पैकी जपानमधील दोन... 
11
भारतीय सैन्याच्या शौर्याला, धाडसाला कांदिवलीच्या नागरिकांचा सलाम; काढली 'तिरंगा पदयात्रा'
12
PM मोदींचा एअरबेस दौरा, डेलीगेशन अन् चॅनेल बॅन...शहबाज शरीफ करताहेत भारताची नक्कल
13
Ayodhya Temple : राम मंदिराच्या सुरक्षेत मोठा बदल, २५० सुरक्षा रक्षकांना कामावरून कमी केले! करण काय?
14
“मोदी २०० देश फिरले, पण एकही पाठिशी नाही; शिष्टमंडळाच्या वऱ्हाडावर बहिष्कार टाकला पाहिजे”
15
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
16
ज्या गर्लफ्रेंडशी गुलूगुलू बोलायचा ती निघाली त्याचीच पत्नी, रंगेल पतीची झाली अशी फजिती, त्यानंतर...
17
पीएमपीएमएलच्या ईलेक्ट्रीक बसची रेंज किती; कालच पाहिली, १,२४,००० किमी एवढे प्रचंड रनिंग झालेली बस...
18
अमेरिकेने ४ कोटी रुपये किमतीचे भारतीय आंबे का नष्ट केले? एक चूक सर्वांना महागात पडली
19
मिथुन चक्रवर्ती अडचणीत, BMC कडून सात दिवसांची 'डेडलाइन', काय आहे संपूर्ण प्रकरण?
20
बारावी शिकलेली रिसेप्शनिस्ट ज्योती पाकिस्तानपर्यंत पोहोचली कशी? 'या' देशांचीही केलीय वारी

जलयुक्तच्या निकषांवर आमदार नाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 00:54 IST

जलयुक्तच्या निकषांवर आमदार नाराज

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत बुधवारी जिल्ह्णातील आमदारांनी जलयुक्त शिवार योजनेचे निकष बदलण्याची जोरदार मागणी केली. ज्या गावांमध्ये जलयुक्त शिवार योजनांच्या कामांवर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले, त्याच गावांना उन्हाळ्यात पाणीटंचाई भासल्यामुळे केलेला खर्च वाया गेला असून, अलीकडेच या योजनेसाठी नव्याने काढण्यात आलेला आदेशही बदलण्यात यावा, अशा सूचनाही त्यांनी केल्या. नियोजन समितीच्या बैठकीत आमदार नरहरी झिरवाळ, जिवा पांडू गावित, निर्मला गावित यांनी हा मुद्दा उपस्थित केला. झिरवाळ यांनी जलयुक्त शिवार योजनेसाठी गावांची निवड केली जाते परंतु नाशिक जिल्ह्णातील पेठ, सुरगाणा, त्र्यंबक, इगतपुरी, दिंडोरी व कळवण या भागांची एकूणच भौगोलिक परिस्थिती पाहता याठिकाणी सिमेंटचे बंधारे बांधण्याजोगी भौगोलिक परिस्थिती नाही, त्यामुळे तेथे माती बंधारे योग्य आहेत परंतु अशा प्रकारची कामे करण्यास अधिकारी उत्सुक नाहीत. जलयुक्त शिवार योजनेची कामे सीएसआरमधून केली जातात, त्यासाठी निधीही खर्च केला जातो; मात्र त्याचा फारसा उपयोग होत नाही. या कामांसाठी स्थानिक लोकप्रतिनिधींचे मत विचारात घेतल्यास त्याचा उपयोग होईल, असे सांगितले. आमदार निर्मला गावित यांनी जलयुक्तच्या निकषांमुळे आदिवासी भागातील गावे, पाड्यांंवर कामे होत नाही.गेल्या वर्षात त्र्यंबकेश्वर व इगतपुरी तालुक्यात काय कामे झाली याची माहिती अद्यापही आपल्याला दिली गेली नसल्याची तक्रार केली. जलयुक्त शिवार योजनेचे निकष बदलावेत यासाठी येत्या पावसाळी अधिवेशनात मागणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार जिवा पांडू गावित यांनी, जिल्ह्णातील पश्चिम भाग खडकाळ व चढउताराचा असल्यामुळे या ठिकाणी जलयुक्तची कामे करूनही उपयोग नाही. जलयुक्तमध्ये एरिया ट्रीटमेंटला अधिक महत्त्व देण्यात आले असून, राज्यातील सपाट भूभागाचा विचार करून या योजनेचे निकष ठरविण्यात आले आहेत; मात्र जे भाग डोंगराळ व चढउताराचे आहेत तेथे ही योजना कशी राबविणार? असा सवाल त्यांनी केला. नाशिकचे तत्कालीन विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी अलीकडेच २३ जून रोजी जलयुक्त शिवार योजनेबाबत नवीन आदेश काढला आहे. त्या आदेशातील निकष व नियम पाहता आदिवासी भागात एकही काम होऊ शकणार नाही, त्यामुळे हा आदेश बदलण्यात यावा अशी मागणी केली. ज्या गावांमध्ये कामे केली तेथेच टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.