शहरं
Join us  
Trending Stories
1
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
2
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
3
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
4
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
5
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
6
Delhi: नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सुटकेसमध्ये केलं बंद; रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती चिमुकली
7
मुलाच्या पिंडदानासाठी गेलेल्या आईसह तिघींचा कोरणी घाटात बुडून मृत्यू
8
भारतीय इंजिनिअरचा दुबईमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू, पाण्यात उतरल्यानंतर काय झाले की गेला जीव?
9
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
10
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!
11
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
12
धक्कादायक! 'लुटेरी दुल्हन' गँगचा धुमाकूळ, जो समोर आला त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
13
Rinku Singh अन् Priya Saroj यांच्या साखरपुड्यातील थाट; त्या महागड्या हॉटेलात सर्वात स्वस्त थाळी हजारात
14
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 
15
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
16
पुतिन आर्मीने आणखी एका शहरावर फडकावला झेंडा; युक्रेनच्या 20 टक्के भूमिवर मिळवला ताबा
17
टोल मागितल्यावर कर्मचाऱ्याच्या अंगावर घातली गाडी, फरफटत नेत काढला पळला; चंद्रपुरातील घटना
18
Raja Raghuvanshi : सोनम-राजाचा पाठलाग करत होती 'लाल' कार? नव्या CCTV फुटेजमध्ये दिसली संशयास्पद हालचाल
19
“एकनाथ शिंदेंना नकोत, आदित्य-उद्धव ठाकरेंना त्रास दिला, एकनिष्ठ व्यक्ती हवी”: चंद्रकांत खैरे
20
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण

शेतकर्‍यांनी तीव्र नाराजी

By admin | Updated: June 2, 2014 01:20 IST

सिन्नर : तालुक्याच्या पूर्वभागात मार्चमध्ये गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना अद्यापही शासनाची मदत मिळाली नसल्याची तक्रार शेतकर्‍यांनी केली आहे.

सिन्नर : तालुक्याच्या पूर्वभागात मार्चमध्ये गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना अद्यापही शासनाची मदत मिळाली नसल्याची तक्रार शेतकर्‍यांनी केली आहे. ज्या शेतकर्‍यांना मदत मिळाली ती तुटपुंजी असल्याने शेतकर्‍यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शासनाकडून मिळालेल्या नुकसानभरपाईची रक्कम तालुकास्तरावर पाठविण्यात आली आहे. तथापि, अद्यापही अनेक शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर जमा झाली नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. काही शेतकर्‍यांना ही रक्कम मिळाली असली तरी ती अत्यंत कमी असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. लाखोंचे नुकसान होऊनही पाच टक्के रक्कमही हाती लागू शकली नसल्याची तक्रार शेतकर्‍यांनी केली आहे. तालुक्यात मार्च महिन्याच्या आरंभीच जोरदार वादळीवार्‍यासह गारपिटीचा तडाखा बसल्याने कोट्यवधीची हानी झाली. पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येऊन शासनाकडे तालुक्यातून साडेबारा कोटी रुपयांच्या मागणीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. तालुक्यातील गारपिटीने बाधित क्षेत्रातील ३६ गावांचा समावेश असून, त्यातील सुमारे साडेअकरा हजार गारपीटग्रस्त शेतकर्‍यांंसाठी अनुदानाची रक्कम शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर अदा करण्यास सुरुवात केल्याचे सांगण्यात आले होते. त्यास दोन महिने उलटून गेले असतानाही अद्याप अनेक शेतकर्‍यांच्या खात्यावर रक्कम जमा झाली नसल्याने शेतकरी गावातील कामगार तलाठी, नाशिक जिल्हा बँकेच्या शाखांमध्ये हेलपाटे घालून कंटाळले आहेत. तलाठी म्हणतात याद्या पाठविण्यात आल्या तर बँकेतील कर्मचारी म्हणतात अद्याप खात्यावर रक्कम जमा झाल्याचे दिसत नाही. यापूर्वी रक्कम बँक खात्यावर अदा कण्याची कार्यवाही ३० एप्रिलपर्यंत सुरू राहणार असल्याचे तहसीलदार सुनील सौंदाणे यांनी सांगितले होते. मात्र मे महिना संपला असतानाही शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले आहेत. मे महिन्यात खरीप पूर्व मशागतींच्या कामांना प्रारंभ केला जातो. त्यापूर्वी अनुदानाची रक्कम मिळणे अपेक्षित आहे. मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात तालुक्याच्या पूर्वभागातील सांगवी, सोमठाणे, दहिवाडी, धनगरवाडी, शिंदेवाडी, उज्जनी तर पश्चिम भागातील ठाणगाव, पाडळी, कोनांबे, सोनांबे, आदि गावांमध्ये वादळीवार्‍यासह अवकाळी पाऊस व गारपीट झाली होती. त्यात द्राक्षासह डाळिंबाच्या बागा भुईसपाट झाल्या असून, कांदा वाफ्यातच सडून गेला. गहू, ज्वारी, हरभरा तसेच चारा पिकाची मका, गवत आदि पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी होऊन कोट्यवधींची हानी झाली आहे. त्यानंतर तहसील व तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्याकडून संयुक्तरीत्या पंचमाने करण्यात आले. त्यात एकूण ३६ गावांतील शेतकर्‍यांचे विविध पिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल तयार करण्यात आला. तो शासनाकडे पाठविला. सध्या काही शेतकर्‍यांना मदतीची रक्कम मिळाली असली तरी ती कमी असून, काहींना मदतच मिळाली नसल्याने शेतकर्‍यांना शासनाने वार्‍यावर सोडल्याची भावना शेतकर्‍यांनी व्यक्त केली आहे. (वार्ताहर)