शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
4
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
5
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
6
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
7
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
8
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
9
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
10
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
11
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
12
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
13
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
14
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
15
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
16
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
17
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
18
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
19
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
20
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
Daily Top 2Weekly Top 5

शेतकर्‍यांनी तीव्र नाराजी

By admin | Updated: June 2, 2014 01:20 IST

सिन्नर : तालुक्याच्या पूर्वभागात मार्चमध्ये गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना अद्यापही शासनाची मदत मिळाली नसल्याची तक्रार शेतकर्‍यांनी केली आहे.

सिन्नर : तालुक्याच्या पूर्वभागात मार्चमध्ये गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना अद्यापही शासनाची मदत मिळाली नसल्याची तक्रार शेतकर्‍यांनी केली आहे. ज्या शेतकर्‍यांना मदत मिळाली ती तुटपुंजी असल्याने शेतकर्‍यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शासनाकडून मिळालेल्या नुकसानभरपाईची रक्कम तालुकास्तरावर पाठविण्यात आली आहे. तथापि, अद्यापही अनेक शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर जमा झाली नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. काही शेतकर्‍यांना ही रक्कम मिळाली असली तरी ती अत्यंत कमी असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. लाखोंचे नुकसान होऊनही पाच टक्के रक्कमही हाती लागू शकली नसल्याची तक्रार शेतकर्‍यांनी केली आहे. तालुक्यात मार्च महिन्याच्या आरंभीच जोरदार वादळीवार्‍यासह गारपिटीचा तडाखा बसल्याने कोट्यवधीची हानी झाली. पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येऊन शासनाकडे तालुक्यातून साडेबारा कोटी रुपयांच्या मागणीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. तालुक्यातील गारपिटीने बाधित क्षेत्रातील ३६ गावांचा समावेश असून, त्यातील सुमारे साडेअकरा हजार गारपीटग्रस्त शेतकर्‍यांंसाठी अनुदानाची रक्कम शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर अदा करण्यास सुरुवात केल्याचे सांगण्यात आले होते. त्यास दोन महिने उलटून गेले असतानाही अद्याप अनेक शेतकर्‍यांच्या खात्यावर रक्कम जमा झाली नसल्याने शेतकरी गावातील कामगार तलाठी, नाशिक जिल्हा बँकेच्या शाखांमध्ये हेलपाटे घालून कंटाळले आहेत. तलाठी म्हणतात याद्या पाठविण्यात आल्या तर बँकेतील कर्मचारी म्हणतात अद्याप खात्यावर रक्कम जमा झाल्याचे दिसत नाही. यापूर्वी रक्कम बँक खात्यावर अदा कण्याची कार्यवाही ३० एप्रिलपर्यंत सुरू राहणार असल्याचे तहसीलदार सुनील सौंदाणे यांनी सांगितले होते. मात्र मे महिना संपला असतानाही शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले आहेत. मे महिन्यात खरीप पूर्व मशागतींच्या कामांना प्रारंभ केला जातो. त्यापूर्वी अनुदानाची रक्कम मिळणे अपेक्षित आहे. मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात तालुक्याच्या पूर्वभागातील सांगवी, सोमठाणे, दहिवाडी, धनगरवाडी, शिंदेवाडी, उज्जनी तर पश्चिम भागातील ठाणगाव, पाडळी, कोनांबे, सोनांबे, आदि गावांमध्ये वादळीवार्‍यासह अवकाळी पाऊस व गारपीट झाली होती. त्यात द्राक्षासह डाळिंबाच्या बागा भुईसपाट झाल्या असून, कांदा वाफ्यातच सडून गेला. गहू, ज्वारी, हरभरा तसेच चारा पिकाची मका, गवत आदि पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी होऊन कोट्यवधींची हानी झाली आहे. त्यानंतर तहसील व तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्याकडून संयुक्तरीत्या पंचमाने करण्यात आले. त्यात एकूण ३६ गावांतील शेतकर्‍यांचे विविध पिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल तयार करण्यात आला. तो शासनाकडे पाठविला. सध्या काही शेतकर्‍यांना मदतीची रक्कम मिळाली असली तरी ती कमी असून, काहींना मदतच मिळाली नसल्याने शेतकर्‍यांना शासनाने वार्‍यावर सोडल्याची भावना शेतकर्‍यांनी व्यक्त केली आहे. (वार्ताहर)