शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

एफआरपीच्या थकबाकीविरोधात स्वाभिमानाचा एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:13 IST

याबाबत संघटनेचे समन्वयक कुबेर जाधव यांनी म्हटले आहे, उत्तर प्रदेशसारख्या राज्यात दैनंदिन २० ते ४० हजार टन गाळप करणारे ...

याबाबत संघटनेचे समन्वयक कुबेर जाधव यांनी म्हटले आहे, उत्तर प्रदेशसारख्या राज्यात दैनंदिन २० ते ४० हजार टन गाळप करणारे खासगी साखर कारखाने हे उस उत्पादक शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लुबाडणूक करून फसवणूक करीत आहेत. देशभरातील १४ राज्यांतील शेकडो कारखान्यांनी गतवर्षीच्या गाळप हंगामातील थकीत एफ.आर.पी.ची रक्कम ३० दिवसांच्या आत अदा करण्यात याव्यात यासाठी माजी खासदार राजू शेट्टी यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान याचिका दाखल केली आहे. त्यामुळे सर्वच कारखानदारांच्या पोटात गोळा उठला आहे. कारखानदारांना पाठीशी घालण्याचे काम केंद्र व राज्य सरकार दोन्हीकडून केले जात आहे. कारखान्यात ऊस घातल्यानंतर १४ दिवसांच्या आत एफ.आर.पी. अदा करण्यात यावी. यासाठी सर्वोच्च न्यायालयात यापूर्वीच थकीत किमान आधारभूत किंमत रक्कम मिळणेसाठी याचिका दाखल केलेली आहे. त्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी मिस कॉल करून दबाव वाढवावा, असे आवाहन माजी खासदार राजू शेट्टी यांनी उस उत्पादक केले आहे. एफ.आर.पी.चे तीन तुकडे करण्याचा कट साखर कारखानदारांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या आडून केला असून त्याविरोधात राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र आंदोलन छेडणार आहे. महाराष्ट्रातील जास्तीत जास्त ऊस उत्पादकांसाठी १२ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२१ दरम्यान मिस्डकॉल मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेतून मिळालेला डेटा सुप्रीम कोर्टात या व्यापक कटाविरोधात वापरण्यात येणार आहे.

कोटे...

या अन्यायकारक निर्णयानुसार ६० टक्के रक्कम ऊस तुटल्यानंतर १५ दिवस ते १ महिन्यात, २० टक्के हंगाम संपल्यावर व उर्वरित २० टक्के पुढील हंगाम सुरू झाल्यावर आपल्याला बिल मिळणार आहे. शेतकऱ्यांचे एक रकमी एफ.आर.पी.चे कायदेशीर कवचच शासन काढून घेतले जाते आहे. आज आपण लढलो नाही तर पुढील भविष्य ऊस उत्पादकांचे ही अंधारात जाणार आहे. म्हणून जागृत व्हायला हवे.

- कुबेर जाधव, समन्वयक, स्वाभिमानी शेतकरी संघटना

120921\img_20210912_142903.jpg

माजी खा.राजू शेट्टी