शहरं
Join us  
Trending Stories
1
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
2
आजचे राशीभविष्य- ६ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस आनंददायी, नोकरी व्यवसायात फायदाच फायदा!
3
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
4
उपचारांवरचा खर्च नाकारणे म्हणजेच हक्काचे उल्लंघन; केरळ हायकोर्टाने एलआयसीला सुनावले
5
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
6
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
7
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
8
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
9
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
10
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
11
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
12
खोकल्याच्या औषधात होते विषारी रसायन; महाराष्ट्रासह सहा राज्यांत सीडीएससीओची तपासणी
13
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
14
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
15
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
16
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत
17
आफ्रिकेतील टांझानियाच्या घनदाट जंगलांतली जादूगार
18
नेपाळमध्ये दोन वर्षांची आर्यतारा नवी देवी!
19
कुशीवली धरणाचा मोबदला संतप्त शेतकऱ्यांनी नाकारला; प्रतिगुंठा २० हजार; रक्कम नाशिक लवादाकडे जमा करण्याच्या हालचाली
20
अतिवृष्टीमुळे डोंगर खचून २० ठार; १२ तासांत ३०० मिमीपेक्षा जास्त पावसाने हाहाकार; घरे वाहून गेली, शेकडो पर्यटक अडकले

एल्गार सभेने ‘समृद्धी’ विरोधकांना बळ

By admin | Updated: July 10, 2017 23:22 IST

राज्यव्यापी आंदोलन : जागा न देण्यावर ठाम

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शेतकरी कर्जमुक्तीच्या निमित्ताने नाशकात दाखल झालेल्या किसान मुक्ती मोर्चा या राष्ट्रव्यापी यात्रेत ‘समृद्धी’ महामार्गाचा विषय समाविष्ट करून त्यासाठी शेतकरी नेत्यांचे समर्थन मिळविण्यात आंदोलक शेतकरी यशस्वी झाल्याने समृद्धी विरोधकांच्या लढ्याला बळ मिळाले आहे. सोमवारी सिन्नर व इगतपुरी तालुक्यांतील शेतकऱ्यांनी एल्गार सभेत लक्षणीय हजेरी लावली. हातात समृद्धीच्या विरोधातील फलक व डोक्यावर ‘समृद्धी महामार्ग रद्द झालाच पाहिजे’ अशा मजकुराच्या पांढऱ्या टोप्या घालून हे शेतकरी आले होते. खासदार राजू शेट्टी यांनी समृद्धीचा मुद्दा भाषणात मांडून सरकार भूमिसंपादन कायद्याची मोडतोड करीत असल्याचा आरोप केला. सत्ताधाऱ्यांच्या नवनवीन स्वप्नवत प्रकल्पासाठी शेतकऱ्यांना देशोधडीला लावले जात असून, शेतकऱ्यांच्या जमिनी हडप करण्याचा प्रयत्न केल्यास गप्प बसणार नसल्याचा इशाराही दिला. त्यामुळे समृद्धी बाधित शेतकऱ्यांना बळ मिळाले आहे. शुक्रवारी जिल्हा प्रशासनाने समृद्धी महामार्गासाठी जमिनींचे दर जाहीर केल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद सिन्नर व इगतपुरी तालुक्यांत उमटले असून, शेतकऱ्यांनी दर पत्रकाची होळी करण्याबरोबरच शेतात सरण रचून ठेवले आहे. शेतकऱ्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे प्रशासनातील अधिकाऱ्यांची झोप उडाली आहे. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी जमिनी संपादित केल्या जाणाऱ्या राज्यातील दहाही जिल्ह्णांतील बाधित शेतकऱ्यांना एकत्र आणण्याची घोषणाही जाहीर सभेत करण्यात आल्याने सिन्नर आंदोलनाची व्याप्ती वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.