शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

अकरावी प्रवेशप्रक्रियेचे मिशन सोमवारपासून सुरू

By admin | Updated: June 15, 2015 01:53 IST

अकरावी प्रवेशप्रक्रियेचे मिशन

नाशिक : अकरावी प्रवेशप्रक्रियेचे मिशन सोमवारपासून सुरू होणार असून, दुपारी ३ वाजेनंतर महाविद्यालयांमध्ये तसेच आॅनलाइन पद्धतीने प्रवेशअर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. दुपारी ३ वाजेनंतर विद्यार्थ्यांना आपापल्या शाळांमधून दहावीचे मूळ गुणपत्रक मिळणार आहे. दरम्यान, यंदा नाशिक जिल्ह्याचा निकाल ९४ टक्के लागल्याने विज्ञान शाखेसाठी विक्रमी अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे. शिक्षण उपसंचालक कार्यालयाने अकरावी प्रवेशाचा वेळापत्रक जाहीर केल्यानुसार सोमवार (दि. १५) ते गुरुवार (दि. १८) तारखेपर्यंत महाविद्यालयांमध्ये अर्ज विक्री आणि स्वीकृती केली जाणार आहे. अर्ज दाखल करण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेता महाविद्यालयांनी अर्ज विक्रीसाठी विशेष व्यवस्था केली आहे. शाखा निहाय अर्ज तसेच मुले आणि मुलींसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली आहे. विशेषत: विद्यार्थ्यांची गर्दी होणाऱ्या ठिकाणी अशा प्रकारची व्यवस्था असून, अर्ज घेतेवेळी गोंधळ होऊ नये तसेच इतर बाह्य व्यक्तींचा उपद्रव होऊ नये यासाठी पोलीस बंदोबस्त काही महाविद्यालयांंनी मागविला असल्याचे समजते. नाशिक जिल्ह्यातील सुमारे साडेतीनशे महाविद्यालयांमधून ७१ हजार इतकी प्रवेश क्षमता असून, दहावीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ७९ हजार इतकी आहे, तर शहरातील ५३ महाविद्यालयांमध्ये २० हजार इतकी प्रवेश क्षमता आहे. त्यामध्ये विज्ञानच्या ८०२० जागा आहेत. त्यामुळे प्रवेशाचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवेशासाठी मोठी कसरत होणार असल्याचे चित्र आहे. पॉलिटेक्निक , आयटीआय तसेच इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या काही टक्केच विद्यार्थ्यांनंतरही अकरावी प्रवेशाचा प्रश्न कायम राहण्याची शक्यता आहे. विशेषत: विज्ञान शाखेसाठी चढाओढ असल्याने विद्यार्थ्यांनी विज्ञान शाखेचाच आग्रह धरू नये यासाठी विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्याची व्यवस्थादेखील महाविद्यालयांनी केलेली आहे. तीन हजारांपेक्षा अधिक जागांचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता असली तरी गुणवत्ता यादीच्या अखेरच्या दिवसापर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित ठेवले जाणार नसल्याचा दावा शिक्षण विभागाने केला आहे. जिल्ह्यात कला शाखेच्या ३४,२४०, वाणिज्य शाखेच्या १३,१६०, तर विज्ञान शाखेच्या २१,९६० इतक्या जागा आहेत. (प्रतिनिधी)