शहरं
Join us  
Trending Stories
1
‘हिंडेनबर्ग’ने भारतीयांच्या स्वप्नांवरच घातला घाला; गौतम अदानींचं भागधारकांना पत्र, म्हणाले...
2
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
3
आजचे राशीभविष्य- २५ सप्टेंबर २०२५, प्रगतीच्या संधी चालून येतील, आर्थिक लाभ होईल
4
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
5
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
6
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
7
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
8
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
9
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
10
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
11
"माझ्या बेडरुममध्ये ये, तुला परदेशात फिरायला घेऊन जातो"; स्वयंघोषित बाबानं केला १७ मुलींचा छळ
12
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
13
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
14
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
15
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
16
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
17
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
18
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
19
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
20
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ

अकरा हजार शेतकऱ्यांना अवकाळीचा फटका

By admin | Updated: May 7, 2017 01:47 IST

नाशिक : गेल्या रविवारी जिल्ह्णातील सात ते आठ तालुक्यांना झोडपून काढणाऱ्या अवकाळी पावसाचा फटका अकरा हजार शेतकऱ्यांना बसला आहे.

 लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : गेल्या रविवारी जिल्ह्णातील सात ते आठ तालुक्यांना झोडपून काढणाऱ्या अवकाळी पावसाचा फटका अकरा हजार शेतकऱ्यांना बसला असून, सुमारे ७१ गावांतील साडेतीन हजार हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्क्याहून अधिक नुकसान झाल्याचा अहवाल शासनास पाठविण्यात आला आहे. रविवारी दुपारनंतर वादळी वाऱ्यासह जोरदार कोसळलेल्या अवकाळी पावसाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांची दाणादाण उडवून दिली. खळ्यात काढून ठेवलेला कांदा भिजला तर द्राक्ष व डाळिंबाच्या बागा कोसळून पडल्या, त्याचबरोबर भाजीपाला पिकाच्या शेतात गारपिटीने तळे साचल्यामुळे उभी पिके नष्ट झाली.राज्य शासनाने दोन वर्षांपूर्वी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या निकषात बदल केले असून, पूर्वी पन्नास टक्क्यापेक्षा अधिक नुकसान झाल्यास शासनाच्या मदतीला शेतकरी पात्र ठरत असे, आता मात्र ३३ टक्क्यापेक्षा अधिक नुकसान झाल्यास शासनाकडून मदत दिली जाते. या अवकाळी पावसाने ३१७३ शेतकऱ्यांच्या १२३९ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्क्यापेक्षा कमी नुकसान केल्याचेही या पंचनाम्यातून स्पष्ट झाले आहे. त्यात सर्वाधिक कांदा, टमाटा व मका या तीन पिकांचे नुकसान झाल्याचे म्हटले आहे.अवकाळी पावसाच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाल्यामुळे त्याचा अहवाल राज्य शासनास पाठविण्यात आला असून, गेल्या आठवड्यात संपूर्ण राज्यातच ठिकठिकाणी अवकाळी पावसाने झोडपून काढल्याने राज्य सरकारने पंचनामे करण्याचे आदेश दिले, मात्र त्याची भरपाईची कोणतीही घोषणा केलेली नाही.