शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

अकरावी प्र्रवेश शिल्लक; उपसंचालकांकडे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 18:00 IST

नाशिकरोड : बहुतांश ११ वीच्या विद्यार्थ्यांना घरापासून दूर असलेल्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळाल्याने त्यांची गैरसोय होत आहे. चार फेऱ्यांमध्ये १६ हजार विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला असून अद्यापही ११ हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश बाकी आहे. त्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची व्यवस्था शिक्षण उपसंचालक विभागाकडून करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.शिक्षण उपसंचालक कार्यालयातील कनिष्ठ प्रशासन ...

ठळक मुद्देअद्यापही ११ हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश बाकी

नाशिकरोड : बहुतांश ११ वीच्या विद्यार्थ्यांना घरापासून दूर असलेल्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळाल्याने त्यांची गैरसोय होत आहे. चार फेऱ्यांमध्ये १६ हजार विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला असून अद्यापही ११ हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश बाकी आहे. त्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची व्यवस्था शिक्षण उपसंचालक विभागाकडून करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.शिक्षण उपसंचालक कार्यालयातील कनिष्ठ प्रशासन अधिकारी संध्या भोर, अशोक बागुल यांना विभाग कृती समितीच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ज्या विद्यार्थ्यांना आवडीच्या विषयासाठी संबधीत महाविद्यालयात प्रवेश हवा आहे त्या ठिकाणी प्रवेशच मिळालेला नाही. ११ वी विद्यार्थ्यांच्या प्रवेशामध्ये पारदर्शकता यावी यासाठी आॅनलाईन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली. मात्र प्रत्यक्षात बहुतांश विद्यार्थी प्रवेशापासुन पासून वंचित आहे. पहिल्या चार फेºयांमध्ये १६ हजार ३४० विद्यार्थ्यांचे प्रवेश झाल्याचे निश्चित झाले आहे. पण अद्यापही ११ हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश बाकी आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल का याबाबत पालकामध्ये चिंतेचे वातावरण आहे. नाव नोंदविल्यानंतर आता शाखा बदलण्याची संधी दिली असली तरीही अनेक विद्यार्थी ग्रामीण, आदिवासी भागातील असल्याने त्यांना शिक्षण विभागाकडून एसएमएस मिळालेले नाही. त्यामुळे त्यांना प्रवेश मिळण्याची शक्यता कमी झाल्याने शिक्षण विभागाने त्वरीत प्रवेश देण्याची व्यवस्था करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर नाशिक युवा कृती समितीचे संस्थापक दिपक वाघ, अतुल कोठावदे, अशोक साळवे, आशिष काळे, तौफिक खान आदिंच्या सह्या आहेत.