शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

हत्तीचे बळ आणि वाघाची चाल...

By admin | Updated: September 9, 2016 02:20 IST

बैठक : कार्यक्षमतेवर शंका घेणाऱ्या अधिकाऱ्यांना चुचकारले

श्याम बागुल  नाशिक‘असे म्हणतात, प्रशासन हा हत्ती आहे, तो आपल्या चालीने चालतो. पण हत्तीची कार्यक्षमताही तेवढीच असते. हत्ती जेव्हा मनात आणतो तेव्हा तो जेवढे वजन पेलू शकतो तेवढे वजन कोणीच पेलू शकत नाही. म्हणून आता यापुढे चाल वाघाची आणि ताकद हत्तीची जर प्रशासनाने आणली तर आपण हे परिवर्तन करू शकतो’ अशी आशादायक साद घालत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रारंभी शासकीय यंत्रणेला अकार्यक्षमतेबद्दल आडवे हात घेतल्यानंतर अधिकाऱ्यांना चुचकारले. शासकीय योजनांचा खुद्द मुख्यमंत्र्यांनी कनिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बसून आढावा घेण्याची ही पहिलीच वेळ असल्यामुळे फडणवीस यांचा दौरा निश्चित झाल्यापासून धाकधुकीत असलेली प्रशासन यंत्रणा जस-जशी बैठकीची घटिका समीप आली, त्या प्रमाणात धास्तावली. प्रत्यक्ष गुरुवारच्या बैठकीला सुरुवात होताच ज्या तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेच्या पहिल्या टप्प्यातील कामेच सुरू झालेली नाहीत त्या तालुक्याच्या कृषी अधिकारी, तहसीलदार व प्रांत अधिकाऱ्यालाच मुख्यमंत्र्यांनी जाब विचारल्यामुळे या बैठकीचे गांभीर्य आणखीच गडद झाले. गावनिहाय व कामनिहाय आढावा घेताना मुख्यमंत्र्यांनी प्रारंभापासूनच अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर शंका घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे संपूर्ण बैठकीचा नूर बदलून जलयुक्त शिवार असो वा अन्य योजनांच्या अंमलबजावणीत यंत्रणेने जे काही उत्स्फूर्त सहभाग घेऊन कामे केली त्याचे कौतुक होऊ शकले नाही. परिणामी मुख्यमंत्र्यांची बैठक निव्वळ झाडाझडतीसाठीच होती, असे चित्र निर्माण झाले.प्रशासन व्यवस्थेला मंदगतीने झुलणाऱ्या हत्तीची उपमा देतानाच, त्याच्यातील कार्यक्षमतेलाही हत्ती एवढे बळ असल्याचे सांगून चुचकारले. बदली- बढतीचा गोंधळ व राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधींकडून अधिकाऱ्यांवर होणारे हल्ले पाहता, त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी वाघाची चाल चालण्याचा सल्ला दिला. अर्थात एकीकडे हे करीत असताना विभागातील पालकमंत्र्यांनी यापुढे सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांचा सातत्याने आढावा घेण्याच्या सूचना करून शासकीय यंत्रणा हाताबाहेर जाणार नाही याची तजवीजही करून ठेवली. थोडक्यात, गुरुवारच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांची जशी जवळून मानसिकता चाचपडण्याचा प्रयत्न केला, त्याचप्रकारे अधिकाऱ्यांनीही सरकारची प्राथमिकता नेमकी काय हे ओळखून घेतली. प्रशासनातील अधिकाऱ्यांशिवाय सरकार काहीच करू शकत नाही हे हेरून असलेल्या मुख्यमंत्र्यांना सरते शेवटी उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सत्कार करण्याची घोषणाही करावी लागली, यातच सारे काही आले.