शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
2
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
3
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
4
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
5
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
6
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
7
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
8
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
9
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
10
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
11
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
12
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
13
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
14
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
15
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
16
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
17
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
18
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
19
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
20
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
Daily Top 2Weekly Top 5

निकवेल परिसरातील वीजपुरवठा तीन दिवसांपासून खंडित

By admin | Updated: December 27, 2015 23:23 IST

निकवेल परिसरातील वीजपुरवठा तीन दिवसांपासून खंडित

निकवेल : बागलाण पश्चिम पट्ट्यातील निकवेलसह परिसरातील दहिंदुले, चाफापाडा, डांगसौदाणा ह्या गावांमध्ये तीन दिवसांपासून विद्युतपुरवठा खंडित असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. त्याचप्रमाणे रविवारी २७ रोजी डांगसौदाणे विद्युतपुरवठा कार्यालयावर शेतकऱ्यांनी, कर्मचाऱ्यांना घेराव घातल्याने काही काळ तणावाचे वातावरण होते. संबधित अधिकाऱ्यांनी ठोस आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. निकवेलसह परिसरात दहिंदुले, चाफापाडा, डांगसौदाणा आदि गावांना विद्युतपुरवठा कंपनीचे डांगसौंदाणा येथुन विद्युतपुरवठा होत असतो; मात्र डांगसौदाणे सबस्टेशन येथे तांत्रिक बिघाड झाल्याने शुक्रवारपासून ते रविवारपर्यंत जवळ जवळ ४८ तास वीजपुरवठा खंडित आहे. या कालावधीमध्ये विद्युतपुरवठा सुरळीत झाला का नाही याची खात्री करण्यासाठी १ ते २ तास वीजपुरवठा देण्यात आला; त्यानंतर परत वीजपुरवठा खंडित करण्यात आला. वीजपुरवठा सुरळीत नसल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विजपुरवठा सुरळीत नसल्याने लागवड झालेल्या कांद्याला पाणी मिळाले नसल्याने कांदा लागवडही वाया जाणार आहे. काल सकाळी ११ वाजता निकवेल येथील शेतकऱ्यांनी थेट विद्युत वितरण कंपनीचे डांगसौंदाणा येथील कार्यालयामध्ये जाऊन उपस्थित कर्मचाऱ्यांना घेराव घातला. यावेळी शेतकऱ्यांनी निकवेल परिसरात गेल्या तीन दिवसांपासून विद्युतपुरवठा नाही. सध्या कांदा लागवड सुरू आहे. लागवड झाल्यावर पाणी लागते, मात्र पाण्याला वीजपुरवठाच नाही तर पाणी शेतीला कसे देणार, असे अनेक प्रश्न उपस्थित शेतकऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी केला. यावेळी कार्यालयाचे उपयंत्रचालक एस. के. आहिरे यांनी शेतकऱ्यांना समजूतदारपणे सांगण्यात आले की, आम्ही मान्य करतो की, गेल्या शुक्रवारपासून तुमच्या गावाचा विद्युतपुरवठा बंद आहे. आज ४ वाजेपर्यंत तुमच्या गावाचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात येईल, असे ठोस आश्वासन मिळाल्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले.त्यानंतर डांगसौदाणा येथील तुळजाभवानी एज्युकेशनचे चेअरमन संजय सोनवणे यांनी तहसीलदार पोतदार यांना दूरध्वनी करून शेतकऱ्यांच्या भावना कळवल्या. तसेच अधिकाऱ्यांशी संपर्क करून तत्काळ वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. सध्या निकवेल परिसरात कांदा लागवड मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. मात्र गेल्या तीन दिवसंपासून विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान होत आहे. विद्युतपुरवठा कायमस्वरूपी सुरळीत करण्यात यावा, अशी मागणी बागलाण पंचायत समिती सदस्य भास्कर बच्छाव, भिका वाघ, नीलेश वाघ, रमेश वाघ, अभि महाजन, कृष्णा वाघ, गोकुळ वाघ, केवल सोनवणे, नाताजी वाघ, चिंतामण वाघ आदि शेतकऱ्यांनी केली आहे.(वार्ताहर)