शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

कारखान्याचा वीजपुरवठा ‘कट’

By admin | Updated: February 5, 2015 00:15 IST

कार्यस्थळ अंधारात : थकीत बिलापोटी महावितरणने केली कारवाई

नाशिकरोड : नाशिक साखर कारखान्याचे वीजबिल थकल्याने महावितरणने वीजपुरवठा खंडित केल्याने नासाकाच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. नासाका कामगार युनियनने वीजबिल त्वरित भरावे व थांबलेली साखर विक्री करावी, या मागणीसाठी कारखान्याचे कार्यकारी संचालक डी. वाय. मोठे यांना बुधवारी सकाळी घेराव घातला होता. नाशिक साखर कारखान्याचे दोन लाख १७ हजार रुपयांचे वीजबिल थकल्याने गेल्या २० दिवसांपूर्वीच महावितरणने कारखान्याचा वीजपुरवठा खंडित केला आहे. चार महिन्यांपूर्वीदेखील वीजबिल थकल्याने महावितरणने कारखान्याचा वीजपुरवठा खंडित केला होता. तब्बल दोन महिन्यांनंतर वीजबिल भरण्यात आल्यानंतर वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला होता. पुन्हा २०-२२ दिवसांपूर्वी थकीत वीजबिलापोटी महावितरणने कारखान्याचा वीजपुरवठा खंडित केला आहे. यामुळे साखर कारखाना, कामगार वसाहत, कार्यस्थळ व कारखान्याचा संपूर्ण परिसर सायंकाळनंतर अंधारात बुडून जात आहे. कारखान्याच्या सुरक्षिततेबाबत संचालक मंडळ व व्यवस्थापन गांभीर्याने लक्ष देत नसल्याने कारखान्याच्या सुरक्षिततेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. मागण्यांसाठी घेरावनासाका कामगार युनियनच्या सदस्यांनी बुधवारी सकाळी कारखान्याचे कार्यकारी संचालक डी. वाय. मोठे यांच्या घराबाहेर घेराव घातला होता. थकीत वीजबिल त्वरित भरण्यात यावे, तसेच १३ हजार साखर पोते विक्रीचे टेंडर व्यापाऱ्यांना देण्यात आले आहे. त्यातील काही पोते साखर व्यापाऱ्यांनी उचलल्यानंतर गेल्या १०-१२ दिवसांपासून व्यापाऱ्यांनी साखर उचलणे बंद केले आहे. त्या व्यापाऱ्यांना त्वरित साखर पोते उचलण्यास भाग पाडावे, अशी मागणी नासाका कामगार युनियनच्या वतीने करण्यात आली. यावेळी विष्णुपंत गायखे, शिवराम गायधनी, एकनाथ आगळे, बबनराव कांगणे, मधुकर गायधनी, शंकर रोकडे, मधुकर मुठाळ, मदन गायकवाड, पंडित सोनवणे, रमेश गुळवे, गोपाळ गायधनी आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)