शहरं
Join us  
Trending Stories
1
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
2
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
3
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले
4
विहिरीत पडलेल्या वासराला वाचवण्यासाठी उतरलेले तरुण एका पाठोपाठ एक बेशुद्ध पडले, पाच जणांचा मृत्यू, संपूर्ण गावावर शोककळा  
5
"हात लावशील तर ३५ तुकडे करेन"; मधुचंद्राच्या रात्रीच नवरीने दिली थेट धमकी! म्हणाली...
6
केदारनाथला देवाकडे काय मागितलं? चाहत्याचा प्रश्न, अमृताचं मन जिंकणारं उत्तर, म्हणाली- "खरं सांगू..."
7
अहमदाबाद विमान अपघात: ब्लॅक बॉक्सची माहिती कधीपर्यंत मिळेल? केंद्रीय मंत्री नायडू म्हणाले...
8
हिंदी मोफत शिकवत असतील तर त्यात गैर काय?; राष्ट्रवादी आमदार संग्राम जगतापांचा सवाल
9
ज्या कतारवर हल्ला केला, त्याच कतारच्या शेखने फोन केला...; अन् इराण सीझफायरसाठी तयारही झाला...
10
"अमेरिकेला गुडघे टेकायला लावले, इराण बनला मुस्लिम जगताचा नेता’’, महबूबा मुफ्ती यांनी केलं कौतुक  
11
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
12
युद्धबंदीच्या बातमीनंतर सेन्सेक्स-निफ्टी वधारले, पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
13
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
14
लग्नानंतर दरमहा १०,००० फिक्स! पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त एकदाच करा गुंतवणूक!
15
"शूट करुन मग सर्जरी करायची...", अपघातानंतर अलका कुबल यांना निर्मात्यांकडून आला कटू अनुभव
16
"आधार कार्ड अपडेट करून येते"; बहाणा सांगून लग्नाच्या १०व्या दिवशी पत्नी झाली फरार! सोबत नवऱ्याचे पैसेही नेले
17
ENG vs IND : भारतीय क्रिकेटमध्ये दुखवटा! मैदानात दोन्ही संघांतील खेळाडूंनी दिग्गज फिरकीपटूला वाहिली श्रद्धांजली
18
Gold Silver Price 24 June: एका झटक्यात सोनं झालं ₹२ हजारांपेक्षाही स्वस्त; Iran-Israel युद्ध थांबलं तर चांदीचीही चमक झाली कमी
19
मुख्यमंत्री फडणवीसांच्या मतदारसंघात ५ महिन्यात ८ टक्के मतदार वाढ ही मतचोरीच- हर्षवर्धन सपकाळ
20
पत्नीच्या हत्येचा आरोपी NSG कमांडो, 'ऑपरेशन सिंदूर'च्या नावाखाली बचाव करत होता, सुप्रीम कोर्ट काय म्हणाले?

कारखान्याचा वीजपुरवठा ‘कट’

By admin | Updated: February 5, 2015 00:15 IST

कार्यस्थळ अंधारात : थकीत बिलापोटी महावितरणने केली कारवाई

नाशिकरोड : नाशिक साखर कारखान्याचे वीजबिल थकल्याने महावितरणने वीजपुरवठा खंडित केल्याने नासाकाच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. नासाका कामगार युनियनने वीजबिल त्वरित भरावे व थांबलेली साखर विक्री करावी, या मागणीसाठी कारखान्याचे कार्यकारी संचालक डी. वाय. मोठे यांना बुधवारी सकाळी घेराव घातला होता. नाशिक साखर कारखान्याचे दोन लाख १७ हजार रुपयांचे वीजबिल थकल्याने गेल्या २० दिवसांपूर्वीच महावितरणने कारखान्याचा वीजपुरवठा खंडित केला आहे. चार महिन्यांपूर्वीदेखील वीजबिल थकल्याने महावितरणने कारखान्याचा वीजपुरवठा खंडित केला होता. तब्बल दोन महिन्यांनंतर वीजबिल भरण्यात आल्यानंतर वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला होता. पुन्हा २०-२२ दिवसांपूर्वी थकीत वीजबिलापोटी महावितरणने कारखान्याचा वीजपुरवठा खंडित केला आहे. यामुळे साखर कारखाना, कामगार वसाहत, कार्यस्थळ व कारखान्याचा संपूर्ण परिसर सायंकाळनंतर अंधारात बुडून जात आहे. कारखान्याच्या सुरक्षिततेबाबत संचालक मंडळ व व्यवस्थापन गांभीर्याने लक्ष देत नसल्याने कारखान्याच्या सुरक्षिततेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. मागण्यांसाठी घेरावनासाका कामगार युनियनच्या सदस्यांनी बुधवारी सकाळी कारखान्याचे कार्यकारी संचालक डी. वाय. मोठे यांच्या घराबाहेर घेराव घातला होता. थकीत वीजबिल त्वरित भरण्यात यावे, तसेच १३ हजार साखर पोते विक्रीचे टेंडर व्यापाऱ्यांना देण्यात आले आहे. त्यातील काही पोते साखर व्यापाऱ्यांनी उचलल्यानंतर गेल्या १०-१२ दिवसांपासून व्यापाऱ्यांनी साखर उचलणे बंद केले आहे. त्या व्यापाऱ्यांना त्वरित साखर पोते उचलण्यास भाग पाडावे, अशी मागणी नासाका कामगार युनियनच्या वतीने करण्यात आली. यावेळी विष्णुपंत गायखे, शिवराम गायधनी, एकनाथ आगळे, बबनराव कांगणे, मधुकर गायधनी, शंकर रोकडे, मधुकर मुठाळ, मदन गायकवाड, पंडित सोनवणे, रमेश गुळवे, गोपाळ गायधनी आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)