शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

औष्णिक केंद्रातील वीज निर्मितीही घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 17:34 IST

नाशिक : राज्यातील कोळशाची टंचाई अजूनही कायम असल्याने औष्णिक वीज: निर्मिती केंद्रातील विजेचे उत्पादन घटले आहे. नाशिकमधील औष्णिक केंद्रातही यापेक्षा वेगळी परिस्थिती नसून कोळशाच्या तुटवड्यामुळे केवळ १६० मेगावॅट विजेची निर्मिती होत आहे. कोळशाचा पुरवठा पूर्ववत कधी होईल याबाबत मुख्य कार्यालयाकडून कोणतीही सूचना नसल्याने केंद्र चालविण्यावरील टांगती तलवार कायम आहे.कोळशाच्या तुटवड्यामुळे ...

ठळक मुद्देअवघी १६० मेगावॅट निर्मितीकोळसा तुटवड्याचा परिणाम

नाशिक : राज्यातील कोळशाची टंचाई अजूनही कायम असल्याने औष्णिक वीज: निर्मिती केंद्रातील विजेचे उत्पादन घटले आहे. नाशिकमधील औष्णिक केंद्रातही यापेक्षा वेगळी परिस्थिती नसून कोळशाच्या तुटवड्यामुळे केवळ १६० मेगावॅट विजेची निर्मिती होत आहे. कोळशाचा पुरवठा पूर्ववत कधी होईल याबाबत मुख्य कार्यालयाकडून कोणतीही सूचना नसल्याने केंद्र चालविण्यावरील टांगती तलवार कायम आहे.कोळशाच्या तुटवड्यामुळे राज्यातील सात औष्णिक वीज निर्मिती केंद्रांतील वीज निर्मिती कमी झाली असून, कोळशाअभावी एकलहरे येथील वीज निर्मितीही संकटात सापडली आहे. भुसावळ, खापरखेडा आणि परळी पाठोपाठ एकलहºयातही केवळ तीन दिवस पुरेल इतकाच कोळसा शिल्लक ठेवला जात आहे. त्यामुळे दर दोन दिवसांनी उपलब्ध होणाºया कोळशाच्या प्रमाणावर वीज निर्मितीचे प्रमाण अवलंबून आहे. वास्तविक औष्णिक केंद्रांकडे सात दिवस पुरेल इतका कोळसा शिल्लक ठेवणे अपेक्षित असताना या केंद्रांकडे केवळ तीन दिवसांचाच कोळसा शिल्लक राहत असून, दोन दिवसांत हा कोळसाही संपत असल्याने तिसºया दिवसाची चिंता मुख्य अभियंत्यांना असते.नाशिकमधील एकलहरे येथील औष्णिक वीज निर्मिती केंद्रात केवळ तीन दिवस पुरेल इतकाच स्टॉक मेन्टेन केला जात आहे. उपलब्ध कोळशाची मर्यादा लक्षात घेता २१० मेगावॅटच्या दोन संचांमधून एकूण १६० मेगावॅट इतकीच वीज निर्माण केली जात आहे. तिसरा २१० मेगावॅटचा संच सध्या वार्षिक देखभाल दुरुस्तीमुळे बंद ठेवण्यात आलेला आहे.२१० मेगावॅटचे दोन संच सुरू असले तरी कोळशाअभावी या संचामधूनही कमी प्रमाणात वीज निर्मिती होत आहे. संच चालविण्यासाठी प्रतिदिन कोळशाची मागणी नोंदविली जाते, परंतु मुख्य कार्यालयाकडून कोणतीही हमी दिली जात नसल्याने असलेल्या कोळशाचा मर्यादित वापर करून वीज निर्मिती करावी लागत आहे. राज्यातील कोळशाची ही बिकट परिस्थिती पाहता काही औष्णिक केंद्र बंद होण्याची शक्यता आहे. नाशिकचे सध्या दोनच संच सुरू असून, या केंद्राला जर वेळेवर कोळसा पुरवठा झाला नाही तर दोन्ही संच बंद ठेवण्याची नामुष्की नाशिकवर येण्याची शक्यता आहे. नाशिकचे सध्या दोनच संच सुरू असून, दोन्ही संच प्रत्येकी २१० मेगावॅट निर्मिती करतात. पुरेसा कोळसा मिळाला तर आणखी काही मेगावॅट वीज निर्माण होऊ शकेल प्रसंगी २१० चे दोन्ही संच पूर्ण क्षमतेचे चालविलेही जाऊ शकतात. मात्र कोळशामुळे दोन्ही संच मिळून केवळ १६० मेगावॅट इतकीच वीज निर्माण करीत आहेत.