शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

कनेक्शन देण्यापूर्वीच शेतकऱ्याला वीजबिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 00:57 IST

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील साकूर येथील एका शेतकºयाला कुठल्याही प्रकारची वीजजोडणी न देता विजबील आल्याची घटना उघडकीस आली आहे. सध्याच्या स्थितीत सर्व विभागांचे सर्वच कारभार आॅनलाइन झाले आहेत. यामुळे पारदर्शकता अनुभवाला येत असली तरी वीज वितरण कंपनीचा कारभार अजूनही बदलाच्या प्रवाहात आल्याचे दिसत नाही.

ठळक मुद्देआजपर्यंत वीज मंडळाने तीन बिले आकारली आहेत.

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील साकूर येथील एका शेतकºयाला कुठल्याही प्रकारची वीजजोडणी न देता विजबील आल्याची घटना उघडकीस आली आहे. सध्याच्या स्थितीत सर्व विभागांचे सर्वच कारभार आॅनलाइन झाले आहेत. यामुळे पारदर्शकता अनुभवाला येत असली तरी वीज वितरण कंपनीचा कारभार अजूनही बदलाच्या प्रवाहात आल्याचे दिसत नाही.साकूर येथील आदिवासी शेतकरी गोपाळ सदू आवारी हे वयस्कर असून, त्यांना दोन मुली आहेत. एकीचे लग्न झाले तर एक उच्चशिक्षण घेत आहे. म्हातारपणात त्यांना कोणताही आधार नाही. शेतीशिवाय उदरनिर्वाहाचे दुसरे साधन नाही. त्यामुळे पडीक जमीन सिंचनाखाली आणण्यासाठी आवारी यांनी विज मंडळाकडे ३ अश्वशक्तीचे अधिकृत कनेक्शन मिळण्यासाठी अर्ज करून त्यासाठी आवश्यक ५ हजार २०० रु पयांची रक्कम २१ मे २०१५ रोजी भरली आहे. यानंतर कंपनीने त्यांना कागदोपत्री वीज कनेक्शन मंजूर केले. पण प्रत्यक्षात मात्र तब्बल तीन वर्षे उलटूनही शेतावर वीज कनेक्शन उपलब्ध झालेले नाही. मात्र आवारी यांचेकडून लाभ न दिलेल्या विजेच्या बिलाची आकारणी करून २० नोव्हेंबर २०१७ या तारखेला १ हजार ५८० रु पयांचे पहिले विजबिल दिले आहे. एवढेच नव्हे तर आजपर्यंत वीज मंडळाने तीन बिले आकारली आहेत.या अन्यायाविरूद्ध आवारी यांनी महावितरण कंपनीच्या नाशिक येथील वरिष्ठ कार्यालयात रीतसर अर्ज देऊन वरिष्ठ कार्यालयासह कार्यकारी अभियंता इगतपुरी ग्रामीण तालुका कार्यालयासही अर्जाची प्रत देऊन पोहोच घेतलेली आहे. परंतु यावर कुठलीही कार्यवाही झालेली नाही.  आवारी वृद्धापकाळात कार्यालयाचे उंबरठे झिजवून हतबल झाले आहेत. या प्रकरणात स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून मला न्याय मिळवुन द्यावा असे आवाहन गोपाळ आवारी यांनी केले आहे.