शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

वीज महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे न्यायालयाच्या निकालाकडे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2019 00:06 IST

महाराष्ट राज्य वीज मंडळातील निवृत्त कर्मचाऱ्यांच्या निवृत्तिवेतनाचा प्रश्न कायम असून, उच्च न्यायालयाची अंतिम सुनावणी टळल्याने कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय हवालदिल झाले आहेत. आता १९ डिसेंबर रोजी पुढील सुनावणी होणार असल्याने निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

नाशिक : महाराष्ट राज्य वीज मंडळातील निवृत्त कर्मचाऱ्यांच्या निवृत्तिवेतनाचा प्रश्न कायम असून, उच्च न्यायालयाची अंतिम सुनावणी टळल्याने कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय हवालदिल झाले आहेत. आता १९ डिसेंबर रोजी पुढील सुनावणी होणार असल्याने निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.वीज कंपनी स्थापन होण्याच्या आधी असलेल्या वीज मंडळातील कर्मचाºयांच्या निवृत्तिवेतनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यात हजारो कामगार निवृत्तिवेतनासाठी लढत आहेत. निवृत्त कर्मचाºयांना नियमित निवृत्तिवेतन मिळावे यासाठी कर्मचारी संघटनांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. शासनाने आधी वेतन देण्याची भूमिका घेतली आणि नंतर मात्र आर्थिक कारण पुढे केले. त्यामुळे उच्च न्यायालयाने यासंदर्भात १७ आॅक्टोबर रोजी अंतिम निकाल देण्याचे जाहीर केले होते. त्यामुळे कर्मचाºयांची त्याकडे अपेक्षा लागून होती. परंतु नंतर मात्र सुनावणी १९ डिसेंबर रोजी होणार असल्याचे जाहीर केल्याने कर्मचारी हवालदिल झाले आहेत.दिशाभूल केल्याचा आरोपसध्याचे मुख्यमंत्री विरोधी पक्षात असताना त्यांनी आणि त्यांच्या पक्षाने कर्मचाºयांची बाजू उचलून धरली होती. मात्र आता सत्तेवर आल्यानंतर तेच विरोध करीत आहेत. मंडळाशी आणि बोर्डाशी शासनाचा संंबंध नसल्याचे सांगून हात झटकत आहेत. परंतु बोर्ड आणि त्यांच्या संचालकांची निवड सरकार करते आणि बोर्ड शासनाचे धोरण अवलंबिते अशावेळी सरकारचा संबंध नाही म्हणणे म्हणजे दिशाभूल करण्यासारखे आहे, असे निवृत्त कर्मचाºयांचे म्हणणे आहे. आता १९ डिसेंबर रोजी काय होते, याकडे निवृत्त कर्मचाºयांचे लक्ष लागून आहे.राज्य शासन सेवेत असलेल्या कर्मचाºयांना वेतन वाढवून देते, मात्र निवृत्त कर्मचाºयांनी पैसे मागितल्यानंतर मात्र निधी नाही असे सांगून हात वर करते हे अत्यंत चुकीचे आहे. निवृत्त कर्मचाºयांवर अन्यायकारक आहे.- गो. भ. जामखेडकर,निवृत्त कर्मचारी

टॅग्स :electricityवीजCourtन्यायालय