शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

नियमावलीच्या घोळात रखडल्या निवडणुका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 01:02 IST

नवीन विद्यापीठ कायद्यातील महाविद्यालयीन विद्यार्थी निवडणुकांच्या तरतुदीनुसार महाविद्यालयीन निवडणुका कशा पद्धतीने घ्याव्यात या विषयीचे परिनियम राज्य शासनाने जाहीर केले आहे;

नाशिक : नवीन विद्यापीठ कायद्यातील महाविद्यालयीन विद्यार्थी निवडणुकांच्या तरतुदीनुसार महाविद्यालयीन निवडणुका कशा पद्धतीने घ्याव्यात या विषयीचे परिनियम राज्य शासनाने जाहीर केले आहे; परंतु नवीन विद्यापीठ कायदा अस्तित्वात आल्यानंतर सुरू असलेल्या घोळात महाविद्यालयीन निवडणुका अजूनही रखडल्या असून, याविरोधात विद्यार्थी संघटनांमध्ये रोष व्यक्त होत आहे.  महाविद्यालयीन निवडणुका कशा पद्धतीने घ्यावेत, त्याविषयीचे परिनियम राज्य शासनाने ३१ आॅक्टोबरला जाहीर केल्याने महाविद्यालयीन निवडणुका घेण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले आहे; परंतु गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या घोळात गेल्या वर्षी महाविद्यालयांनी निवड पद्धतीने विद्यार्थी प्रतिनिधी निवडून कार्यवाहीची पूर्तता केली; मात्र यावर्षीही महाविद्यालयांना विद्यापीठाकडून कोणत्याही स्पष्ट सूचना मिळालेल्या नसल्याने अद्यापही महाविद्यालयीन निवडणुकांची प्रक्रिया रखडली आहे. दरम्यानच्या काळात सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार निवडणुका घेण्यास उशीर झालेला असल्याने काही महाविद्यालयांनी गेल्यावर्षाप्रमाणेच गुणवत्तेच्या आधारे निवडप्रक्रियेतून विद्यार्थी प्रतिनिधींची नियुक्ती केली असली तरी विविध विद्यार्थी संघटनांना आता लोकशाही पद्धतीने निवडणुकांचे वेध लागले आहे. दरम्यान, यावर्षी सरकारने नियमावली जाहीर करण्यास उशीर केल्याने निवडणुकांच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थी संघटनांकडून सरकारच्या शिक्षण विभागासह विद्यापीठ प्रशासनाविरोधात रोष व्यक्त होत आहे.महाविद्यालयीन निवडणुकांची नियमावलीनवीन विद्यापीठ कायदा अर्थात महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक १ मार्च २०१७ रोजी लागू झाल्यानंतर विद्यापीठाच्या अधिकार मंडळाच्या निर्णयात विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी महाविद्यालय स्तरावर विद्यार्थी निवडणुका घेण्याची तरतूद करण्यात आली; मात्र या निवडणुकांविषयी स्पष्टता नसल्याने कोणत्या निकषावर निवडणुका घ्यायच्या? असा प्रश्न उपस्थित झाला होता. त्या पार्श्वभूमीवर उच्च शिक्षण विभागाने परिनियम जाहीर करीत निवडणुकांचा मार्ग केला आहे. त्यानुसार पुढील शैक्षणिक वर्षात महाविद्यालयांनी ३० जुलैपूर्वी विद्यार्थी निवडणूक कार्यक्रम जाहीर करणे अनिवार्य आहे. प्राचार्य किंवा संस्थेचा संचालक हा विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकीसाठी प्राधिकारी म्हणून कु लगुरुंशी चर्चा करून विद्यार्थी निवडणुकीचा कार्यक्रम तयार करतील. यात निवडणुका घेणे, अधिसूचना काढणे, प्रसिद्धी आणि निवेदने यासंबंधीचे वेळापत्रक ३० जुलैपूर्वी जाहीर करून ३० सप्टेंबरपूर्वी मतपत्रिकेद्वारे ही सर्व निवडणूक प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.

टॅग्स :collegeमहाविद्यालयElectionनिवडणूक