शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
2
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
3
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
4
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
5
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
6
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
7
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
8
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
9
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
10
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
11
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
12
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
13
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
14
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
15
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
16
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
17
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?
18
“आज BJP आहे, उद्या बाजी पलटेल, काँग्रेस सत्तेत येईल”; कोणत्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास?
19
VIRAL : खोदकाम करताना सापडलं १९९७चं जलजीऱ्याचं पाकिट; पण सोशल मीडियावर का होतंय व्हायरल?
20
BCCI नं श्रेयस अय्यरला दिलं कॅप्टन्सीचं गिफ्ट; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ

कॉलेज जीएसच्या १० आॅगस्टला निवडणुका

By admin | Updated: July 31, 2015 23:46 IST

गुणवत्तेचा निकष : विद्यार्थी संघटनांमध्ये चुरस

नाशिक : विद्यार्थ्यांच्या दृष्टीने उत्सुकता असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाअंतर्गत विविध महाविद्यालायांच्या जनरल सेक्रेटरी अर्थात जीएस पदासाठीच्या निवडणुका १० आॅगस्ट रोजी घेण्यात येणार आहेत. त्यामुळे विद्यार्थी संघटनांमध्ये चुरस वाढली आहे. अर्थात, या निवडणुका लोकशाही पद्धतीने घेण्यासंदर्भात यापूर्वी विधी मंडळातही चर्चा झाली असली तरी याबाबत अंतिम निर्णय न झाल्याने यंदाची निवडणूकही शैक्षणिक गुणवत्तेवर आधारितच होणारआहे.शहरातील विविध महाविद्यालयांमार्फत देण्यात आलेल्या माहितीनुसार, या निवडणुका विद्यापीठाकडून प्राप्त झालेल्या अध्यादेशानुसार पुणे विद्यापीठाअंतर्गत सर्व महाविद्यालयांमध्ये एकाच दिवशी राबविण्यात येणार आहे. या निवडणुकांसाठी सगळ्याच महाविद्यालयांमध्ये मोर्चेबांधणी सुरू असून आहे.या निवडणुकांसाठी सांस्कृतिक, क्रीडा, भारतीय छात्र सेना (एनसीसी), राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस), विद्यार्थिनी प्रतिनिधी (एलआर) आणि वर्ग प्रतिनिधी (सीआर) अशा सहा गटांतील मुख्य प्रतिनिधी या निवडणुकीस पात्र असतात. या सहा प्रतिनिधींमधून एक किंवा दोन प्रतिनिधी निवडणूक लढवितात. सामान्य निवडणुकांप्रमाणेच प्रचार, विद्यार्थी प्रतिनिधी आणि वर्ग प्रतिनिधींच्या भेटीगाठी घेऊन मते मागतात. या निवडणुकीत महाविद्यालयातील प्रत्येक वर्गातील शैक्षणिक गुणवत्तेत अव्वल विद्यार्थ्यांना मतदान करण्याचा हक्क असतो. निवडून येणाऱ्या विद्यार्थी प्रतिनिधींनी विद्यापीठ स्तरावर महाविद्यालयांचे, विद्यार्थ्यांचे विविध प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी तसेच विद्यापीठ आणि महाविद्यालय यांच्यातला महत्त्वाचा दुवा म्हणून कार्य करणे अपेक्षित असल्याचे मत एचपीटीचे प्राचार्य व्ही. एन. सूर्यवंशी आणि बिटको कॉलेजचे प्राचार्य राम कुलकर्णी यांनी सांगितले.गुणवत्तेवर आधारित ही निवडणूक पद्धत बदलावी आणि लोकशाही मागाने विद्यार्थी प्रतिनिधी निवडले जावेत अशी गेल्या काही वर्षांपासून मागणी आहे. महाविद्यालयातील या निवडणुका आणि नेतृत्व लोकशाहीतील सार्वत्रिक निवडणुकींचे धडे देणारी पाठशाळा मानली जाते. त्यामुळे लोकशाही पद्धतीने निवडणुका घ्याव्या, अशी मागणी असून विधी मंडळात तशी चर्चा झाली. परंतु अद्याप निर्णय झालेला नसल्याने यंदाही गुणवत्तेवर आधारित कार्यक्रम होणार आहे.