शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
3
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
4
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
5
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
6
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
7
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
8
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
11
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
12
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
13
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
14
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
15
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
20
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका

विल्होळीला चिठ्ठी पद्धतीने सरपंचाची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:16 IST

निवडणूक निर्णय अधिकारी रमेश मोरे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी बाबुराव रिकामे, ग्रामविकास अधिकारी रवींद्र जाधव, लिपिक मोतीराम भावनाथ यांनी ...

निवडणूक निर्णय अधिकारी रमेश मोरे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी बाबुराव रिकामे, ग्रामविकास अधिकारी रवींद्र जाधव, लिपिक मोतीराम भावनाथ यांनी ही प्रक्रिया पार पाडली. सरपंचपदासाठी परिवर्तन पॅनल व विकास पॅनलने उमेदवार उभे केेले होते. परिवर्तन पॅनलच्या जानकाबाई चव्हाण यांच्यात व विकास पॅनलच्या गायत्री थोरात यांच्यात लढत होऊन दोन्ही उमेदवारांना समसमान मते पडली. विल्होळी ग्रामपंचायतची सदस्य संख्या १५ असून, नवनाथ गाडेकर दोन्ही ठिकाणी निवडून आल्याने एका ठिकाणी त्यांना राजीनामा द्यावा लागल्याने ही परिस्थिती निर्माण झाली. समान मते पडल्याने अखेर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी लहान मुलाच्या हस्ते चिठ्ठी काढली असता जानकाबाई चव्हाण यांच्या नावाची चिठ्ठी काढण्यात आली व त्यांची सरपंचपदी निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. उपसरपंच पदासाठी परिवर्तन पॅनलचे भास्कर थोरात व विकास पॅनलचे संजय गायकवाड यांच्यामध्ये निवडणूक होऊन भास्कर थोरात यांची निवड करण्यात आली.

यावेळी नवनिर्वाचित सदस्य विष्णू घेळ, नवनाथ गाडेकर, चंद्रभागा कदम, सुरेखा थोरात, सुजाता रूपवते, बाजीराव गायकवाड, संजय गायकवाड, समाधान आल्हाट, निशा गाडेकर, जयश्री आंडे, शोभा वाघ, गायत्री थोरात सर्व सदस्य उपस्थित होते. यावेळी मनोहर भावनाथ, भास्कर थोरात, सुरेश भावनाथ, पुंजा निंबेकर, ज्ञानेश्वर भावनाथ, बबन गायकवाड, शिवाजी चव्हाण, पोलीस पाटील संजय चव्हाण, भाऊसाहेब भावनाथ, बंडूनाना चव्हाण, बाबुराव रूपवते, बाळू भावनाथ आदी उपस्थित होते.

(फोटो १५ विल्होळी)