शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

निवडणूक मोबाइल व्हॅन पोहोचणार मतदारांपर्यंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 00:27 IST

मतदार याद्यांच्या शुद्धीकरण आणि दोषरहित याद्या करण्यासाठी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार सुरू असलेल्या विविध प्रकारच्या मोहिमांनंतर आता निवडणूक शाखेची मोबाइल व्हॅन थेट मतदारांपर्यंत पोहोचणार आहे.

नाशिक : मतदार याद्यांच्या शुद्धीकरण आणि दोषरहित याद्या करण्यासाठी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार सुरू असलेल्या विविध प्रकारच्या मोहिमांनंतर आता निवडणूक शाखेची मोबाइल व्हॅन थेट मतदारांपर्यंत पोहोचणार आहे. नावे वगळणे आणि नोंदणी करण्यासाठी अनेकदा आवाहने करूनही राहिलेल्या मतदारांपर्यंत आता निवडणूक शाखाच पोहोचणार आहे. यासाठी ‘नाम मे क्या रखा हैं’ असे घोषवाक्य असलेली व्हॅन मतदारांपर्यंत पोहोचून अर्ज भरून घेणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सूरज मांढरे यांनी दिली.मतदार याद्यांच्या शुद्धीकरण आणि दोषरहित याद्या करण्यासाठी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार सुरू असलेल्या विविध प्रकारच्या मोहिमांनंतर आता निवडणूक शाखेची मोबाइल व्हॅन थेट मतदारांपर्यंत पोहोचणार आहे. नावे वगळणे आणि नोंदणी करण्यासाठी अनेकदा आवाहने करूनही राहिलेल्या मतदारांपर्यंत आता निवडणूक शाखाच पोहोचणार आहे. यासाठी ‘नाम मे क्या रखा हैं’ असे घोषवाक्य असलेली व्हॅन मतदारांपर्यंत पोहोचून अर्ज भरून घेणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सूरज मांढरे यांनी दिली. शहर परिसरात मंगळवार (दि.२३) पासून सदर मोहिमेला सुरुवातदेखील झाली आहे.नाशिक सिटीझन फोरम या संस्थेबरोबर झालेल्या बैठकीत मयत आणि दुबार मतदारांची नावे वगळण्यासाठी करावयाच्या उपाय-योजनांसंदर्भात चर्चा करण्यात आली. त्यावेळी बहुतांश मतदारांना त्यांच्या नावातील बदल अथवा मतदार यादीतील अन्य दुरुस्तांसाठी कार्यालयात येण्यासाठी वेळ होत नसल्याने त्या दुरुस्त्या तशाच राहून जातात, असे सर्वसाधारण मत व्यक्त झाले. त्यामुळे मतदारांपर्यंत पोहोचण्याची काही व्यवस्था करता येईल काय यावर चर्चा झाली. त्यानुसार प्रशासनाच्या वतीने काही मोबाइल व्हॅन शहरातील वेगवेगळ्या भागांमध्ये कार्यालयीन वेळेनंतर फिरवल्यास व त्या मोबाइल व्हॅनद्वारे मतदारांकडून अर्ज स्वीकारले गेल्यास मतदारांना मतदार यादीतील दुरुस्तीबाबत अर्ज सादर करणे सोपे होणार आहे. दि.२३ पासून शहरातील चार शहरी विधानसभा मतदारसंघ आणि मालेगाव शहर या मतदारसंघांमध्ये निवडणूक शाखेकडून नाम में क्या रखा हैं या वाहनाद्वारे मतदार आणि नागरिकांमध्ये मतदार यादीसंदर्भात जागृती केली जात आहे.निर्दोष आणि परिपूर्ण मतदार याद्या यशस्वी निवडणूक संचलनाचा पाया असल्यामुळे मतदार यादी अधिकाधिक परिपूर्ण करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व नागरिक आणि मतदारांच्या सहकार्याची अपेक्षा आहे. या मोहिमेचा लाभ घेऊन आपल्या कुटुंबातील तसेच परिचयातील कुटुंबातील व्यक्ती मृत्यू झालेली असेल, तर अशा मयत व्यक्तीच्या नावांची मतदार यादीमधून वगळणी करावी आणि मतदार यादी अधिकाधिक परिपूर्ण बनविण्याच्या नाशिक जिल्हा निवडणूक प्रशासनाच्या मोहीमेस सर्व सहकार्य करावे.- सूरज मांढरे, जिल्हाधिकारी, नाशिक

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयElectionनिवडणूक